शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

अमरावती बाजार समितीतील सॉफ्टवेअरने नाकारली शेतमालाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 09:22 IST

नाफेडच्या सोयाबीन आणि इतर धान्य खरेदीत शेतकऱ्यांची फरफट सुरु आहे. एकरी उत्पादनाच्या अटीमुळे सॉफ्टवेअर जादा शेतमाल मान्य करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासनच व्यापाऱ्यांच्या दारी पाठवित असल्याचे संतापजनक चित्र अचलपूर बाजार समितीमध्ये पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देनाफेडच्या खरेदीत शेतकऱ्यांची फरफट विक्री व्यापाऱ्यांच्या दारी, शेतकऱ्यांत संताप

आॅनलाईन लोकमतअमरावती : नाफेडच्या सोयाबीन आणि इतर धान्य खरेदीत शेतकऱ्यांची फरफट सुरु आहे. एकरी उत्पादनाच्या अटीमुळे सॉफ्टवेअर जादा शेतमाल मान्य करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासनच व्यापाऱ्यांच्या दारी पाठवित असल्याचे संतापजनक चित्र अचलपूर बाजार समितीमध्ये पाहावयास मिळत आहे.नाफेडमार्फत १८ आॅक्टोबर २०१७ पासून करण्यात आली. शासनाने आधाभूत किंमत जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये शेतमाल आणला. मात्र, बाजार समितीने अटी ठेवल्या. यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतमाल व्यापाऱ्यांना विकावा लागला. बाजार समितीत आतापर्यंत १४०० क्विंटल सोयाबीन, उडीद १०० क्विंटल, तर ६०० क्विंटल ज्वारीची खरेदी झाली आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांपुढे शेकडो पोते धान्य रचून असल्याचे चित्र आहे.

काय आहे नेमका प्रकार?सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी आदी धान्याच्या खरेदीसाठी एकरी उत्पादनाचा नियम ठरविण्यात आला आहे. सोयाबीन एकरी पाच क्विंटल तर उडीद १ क्विंटल २० किलो ग्राह्य धरून याउपर झालेले उत्पादन व्यापाऱ्यांना विकण्याचा सल्ला शासनच देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बुधवारी अचलपूर बाजार समिती आवारात असलेल्या खरेदी विक्री कार्यालयात शेतकऱ्यांनी याचा जाब विचारण्यासाठी गर्दी केली होती.

शासनच म्हणते, उत्पादन वाढवाशासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उत्पादन वाढविण्याचा सल्ला देते; मात्र वाढीव उत्पादन खरेदी करीत नसल्याचा हा प्रकार आहे. बाजार समितीमध्ये शेतमाल घेऊन आलेले काकडा येथील नीलेश बोंडे, नायगाव येथील मोहन हुड, इसापूरचे मोहन जुनघरे, रवींद्र बोंडे यांनी नाफेडमार्फत खरेदी सुरू असलेल्या खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात येऊन संताप व्यक्त केला.नाफेडमार्फत खरेदीसाठी मर्यादा ठेवल्याने एकूण शेती व त्यामध्ये उपरोक्त निकषानुसार धान्याचीच खरेदी सॉफ्टवेअर घेत आहे. शासनाने अट टाकल्याने शेतकरी अर्धे धान्य व्यापाऱ्यांकडे विकत आहेत.- मंगेश हुड, मानद सचिव, खरेदी विक्री संस्था, अचलपूरसोयाबीन-उडिदासाठी एकरी उत्पादनाचे लादलेले नियम अन्यायकारक आहेत. शासन शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे शेतमाल विक्री करण्यास पाठवित असल्याने नुकसान होत आहे.- दामोधर पाटील, शेतकरी, चाचोंडी

टॅग्स :Farmerशेतकरी