शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

अमरावती बाजार समितीतील सॉफ्टवेअरने नाकारली शेतमालाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 09:22 IST

नाफेडच्या सोयाबीन आणि इतर धान्य खरेदीत शेतकऱ्यांची फरफट सुरु आहे. एकरी उत्पादनाच्या अटीमुळे सॉफ्टवेअर जादा शेतमाल मान्य करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासनच व्यापाऱ्यांच्या दारी पाठवित असल्याचे संतापजनक चित्र अचलपूर बाजार समितीमध्ये पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देनाफेडच्या खरेदीत शेतकऱ्यांची फरफट विक्री व्यापाऱ्यांच्या दारी, शेतकऱ्यांत संताप

आॅनलाईन लोकमतअमरावती : नाफेडच्या सोयाबीन आणि इतर धान्य खरेदीत शेतकऱ्यांची फरफट सुरु आहे. एकरी उत्पादनाच्या अटीमुळे सॉफ्टवेअर जादा शेतमाल मान्य करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासनच व्यापाऱ्यांच्या दारी पाठवित असल्याचे संतापजनक चित्र अचलपूर बाजार समितीमध्ये पाहावयास मिळत आहे.नाफेडमार्फत १८ आॅक्टोबर २०१७ पासून करण्यात आली. शासनाने आधाभूत किंमत जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये शेतमाल आणला. मात्र, बाजार समितीने अटी ठेवल्या. यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतमाल व्यापाऱ्यांना विकावा लागला. बाजार समितीत आतापर्यंत १४०० क्विंटल सोयाबीन, उडीद १०० क्विंटल, तर ६०० क्विंटल ज्वारीची खरेदी झाली आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांपुढे शेकडो पोते धान्य रचून असल्याचे चित्र आहे.

काय आहे नेमका प्रकार?सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी आदी धान्याच्या खरेदीसाठी एकरी उत्पादनाचा नियम ठरविण्यात आला आहे. सोयाबीन एकरी पाच क्विंटल तर उडीद १ क्विंटल २० किलो ग्राह्य धरून याउपर झालेले उत्पादन व्यापाऱ्यांना विकण्याचा सल्ला शासनच देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बुधवारी अचलपूर बाजार समिती आवारात असलेल्या खरेदी विक्री कार्यालयात शेतकऱ्यांनी याचा जाब विचारण्यासाठी गर्दी केली होती.

शासनच म्हणते, उत्पादन वाढवाशासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उत्पादन वाढविण्याचा सल्ला देते; मात्र वाढीव उत्पादन खरेदी करीत नसल्याचा हा प्रकार आहे. बाजार समितीमध्ये शेतमाल घेऊन आलेले काकडा येथील नीलेश बोंडे, नायगाव येथील मोहन हुड, इसापूरचे मोहन जुनघरे, रवींद्र बोंडे यांनी नाफेडमार्फत खरेदी सुरू असलेल्या खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात येऊन संताप व्यक्त केला.नाफेडमार्फत खरेदीसाठी मर्यादा ठेवल्याने एकूण शेती व त्यामध्ये उपरोक्त निकषानुसार धान्याचीच खरेदी सॉफ्टवेअर घेत आहे. शासनाने अट टाकल्याने शेतकरी अर्धे धान्य व्यापाऱ्यांकडे विकत आहेत.- मंगेश हुड, मानद सचिव, खरेदी विक्री संस्था, अचलपूरसोयाबीन-उडिदासाठी एकरी उत्पादनाचे लादलेले नियम अन्यायकारक आहेत. शासन शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे शेतमाल विक्री करण्यास पाठवित असल्याने नुकसान होत आहे.- दामोधर पाटील, शेतकरी, चाचोंडी

टॅग्स :Farmerशेतकरी