शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

अमरावती बाजार समितीतील सॉफ्टवेअरने नाकारली शेतमालाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 09:22 IST

नाफेडच्या सोयाबीन आणि इतर धान्य खरेदीत शेतकऱ्यांची फरफट सुरु आहे. एकरी उत्पादनाच्या अटीमुळे सॉफ्टवेअर जादा शेतमाल मान्य करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासनच व्यापाऱ्यांच्या दारी पाठवित असल्याचे संतापजनक चित्र अचलपूर बाजार समितीमध्ये पाहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देनाफेडच्या खरेदीत शेतकऱ्यांची फरफट विक्री व्यापाऱ्यांच्या दारी, शेतकऱ्यांत संताप

आॅनलाईन लोकमतअमरावती : नाफेडच्या सोयाबीन आणि इतर धान्य खरेदीत शेतकऱ्यांची फरफट सुरु आहे. एकरी उत्पादनाच्या अटीमुळे सॉफ्टवेअर जादा शेतमाल मान्य करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना शासनच व्यापाऱ्यांच्या दारी पाठवित असल्याचे संतापजनक चित्र अचलपूर बाजार समितीमध्ये पाहावयास मिळत आहे.नाफेडमार्फत १८ आॅक्टोबर २०१७ पासून करण्यात आली. शासनाने आधाभूत किंमत जाहीर केल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये शेतमाल आणला. मात्र, बाजार समितीने अटी ठेवल्या. यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतमाल व्यापाऱ्यांना विकावा लागला. बाजार समितीत आतापर्यंत १४०० क्विंटल सोयाबीन, उडीद १०० क्विंटल, तर ६०० क्विंटल ज्वारीची खरेदी झाली आहे. दुसरीकडे व्यापाऱ्यांच्या प्रतिष्ठानांपुढे शेकडो पोते धान्य रचून असल्याचे चित्र आहे.

काय आहे नेमका प्रकार?सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी आदी धान्याच्या खरेदीसाठी एकरी उत्पादनाचा नियम ठरविण्यात आला आहे. सोयाबीन एकरी पाच क्विंटल तर उडीद १ क्विंटल २० किलो ग्राह्य धरून याउपर झालेले उत्पादन व्यापाऱ्यांना विकण्याचा सल्ला शासनच देत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बुधवारी अचलपूर बाजार समिती आवारात असलेल्या खरेदी विक्री कार्यालयात शेतकऱ्यांनी याचा जाब विचारण्यासाठी गर्दी केली होती.

शासनच म्हणते, उत्पादन वाढवाशासन शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उत्पादन वाढविण्याचा सल्ला देते; मात्र वाढीव उत्पादन खरेदी करीत नसल्याचा हा प्रकार आहे. बाजार समितीमध्ये शेतमाल घेऊन आलेले काकडा येथील नीलेश बोंडे, नायगाव येथील मोहन हुड, इसापूरचे मोहन जुनघरे, रवींद्र बोंडे यांनी नाफेडमार्फत खरेदी सुरू असलेल्या खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात येऊन संताप व्यक्त केला.नाफेडमार्फत खरेदीसाठी मर्यादा ठेवल्याने एकूण शेती व त्यामध्ये उपरोक्त निकषानुसार धान्याचीच खरेदी सॉफ्टवेअर घेत आहे. शासनाने अट टाकल्याने शेतकरी अर्धे धान्य व्यापाऱ्यांकडे विकत आहेत.- मंगेश हुड, मानद सचिव, खरेदी विक्री संस्था, अचलपूरसोयाबीन-उडिदासाठी एकरी उत्पादनाचे लादलेले नियम अन्यायकारक आहेत. शासन शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे शेतमाल विक्री करण्यास पाठवित असल्याने नुकसान होत आहे.- दामोधर पाटील, शेतकरी, चाचोंडी

टॅग्स :Farmerशेतकरी