शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

वस्तापूर येथे घरांच्या पंचनाम्याला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST

रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वस्तापूर येथील जवळपास ८३ घरांना झळ पोहोचली. त्यातील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काहींचे अंशत: नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देचक्रीवादळाचा तडाखा : आदिवासी लागले दुरुस्तीला, आमदारांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील वस्तापूर येथे रविवारी दुपारी चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. ज्या भागात क्षती पोहचली येथे पंचनामे सोमवारी सकाळी महसूल व ग्रामपंचायत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करायला सुरुवात झाली आहे. ५० लाखांपेक्षा अधिक नुकसान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वस्तापूर येथील जवळपास ८३ घरांना झळ पोहोचली. त्यातील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काहींचे अंशत: नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे सोमवारी सकाळपासून तलाठी पी. व्ही. भुयार, ए. एल. देशमुख, एस. वाय. चव्हाण मंडळ अधिकारी कृषी सहायक एन. बी. जामकर, ग्रामसेवक सुधीर भागवत, सरपंच सरस्वती झामरकर, उपसरपंच गजानन येवले, ग्रा. प. सदस्य लक्ष्मण बेलसरे, ग्रा. प.सदस्य पोलीस पाटील शामराव सोमा झामरकर, पोलीस पाटील किसन बारवे, विजय उके आदी कर्मचाऱ्यांद्वारा दिवसभर करण्यात आला. यामध्ये अनेक घरांचे छत उडाले, कवेलू वादळाने फुटले, झाडे उन्मळून पडली. पावसामुळे घरातील धान्य व कपडे, तसेच जीवनावश्यक वस्तू पूर्णत: भिजल्याचे निदर्शनास आले आहे.महसूल व ग्रामपंचायतींमार्फत पंचनामे करण्यात येत आहे. सदर पंचनामे पंचायत समितीकडे पाठवण्यात येतील. बांधकाम अभियंता नुकसानाच्या रकमेचा आकडा काढतील.- सुधीर भागवत,सचिव, ग्रामपंचायत, वस्तापूरआदिवासी लागले दुरुस्तीलामान्सूनपूर्व मशागतीची कामे करण्यात मग्न असलेल्या आदिवासीं शेतकºयांसाठी रविवार हा दिवस काळा दिवस म्हणून आला. पेरणीचे नियोजन करीत असताना अचानक आलेल्या या अस्मानी संकटाचा सामना त्यांना करावा लागत आहे. रविवारच्या चक्रीवादळानंतर सोमवारी सकाळपासूनच घरावरील उडालेले छत. फुटलेले कवेलू दुरुस्तीच्या कामात आदिवासी मग्न झाल्याचे दिसून येत आहे.सरकार मायबाप, जल्दी मदत दे'इतवार के दिन हमारा पुरा घर का नुकसान हुआ. सरकार मायबाप जल्दी हम गरीब को मदत दे', अशी विनवणी वस्तापूर येथील आदिवासी महिला गंगा नानू जामकर यांनी केली आहे. पंचनामे तर होतच राहतील. पण त्यातून मिळणारा मोबदला लवकर देण्याची मागणी तिने नुकसानग्रस्तांसाठी केली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस