शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

वस्तापूर येथे घरांच्या पंचनाम्याला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:00 IST

रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वस्तापूर येथील जवळपास ८३ घरांना झळ पोहोचली. त्यातील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काहींचे अंशत: नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देचक्रीवादळाचा तडाखा : आदिवासी लागले दुरुस्तीला, आमदारांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : तालुक्यातील वस्तापूर येथे रविवारी दुपारी चक्रीवादळाच्या तडाख्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. ज्या भागात क्षती पोहचली येथे पंचनामे सोमवारी सकाळी महसूल व ग्रामपंचायत कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून करायला सुरुवात झाली आहे. ५० लाखांपेक्षा अधिक नुकसान असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.रविवारी दुपारी अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह पावसाने लावलेल्या हजेरीमुळे वस्तापूर येथील जवळपास ८३ घरांना झळ पोहोचली. त्यातील काही घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, काहींचे अंशत: नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे सोमवारी सकाळपासून तलाठी पी. व्ही. भुयार, ए. एल. देशमुख, एस. वाय. चव्हाण मंडळ अधिकारी कृषी सहायक एन. बी. जामकर, ग्रामसेवक सुधीर भागवत, सरपंच सरस्वती झामरकर, उपसरपंच गजानन येवले, ग्रा. प. सदस्य लक्ष्मण बेलसरे, ग्रा. प.सदस्य पोलीस पाटील शामराव सोमा झामरकर, पोलीस पाटील किसन बारवे, विजय उके आदी कर्मचाऱ्यांद्वारा दिवसभर करण्यात आला. यामध्ये अनेक घरांचे छत उडाले, कवेलू वादळाने फुटले, झाडे उन्मळून पडली. पावसामुळे घरातील धान्य व कपडे, तसेच जीवनावश्यक वस्तू पूर्णत: भिजल्याचे निदर्शनास आले आहे.महसूल व ग्रामपंचायतींमार्फत पंचनामे करण्यात येत आहे. सदर पंचनामे पंचायत समितीकडे पाठवण्यात येतील. बांधकाम अभियंता नुकसानाच्या रकमेचा आकडा काढतील.- सुधीर भागवत,सचिव, ग्रामपंचायत, वस्तापूरआदिवासी लागले दुरुस्तीलामान्सूनपूर्व मशागतीची कामे करण्यात मग्न असलेल्या आदिवासीं शेतकºयांसाठी रविवार हा दिवस काळा दिवस म्हणून आला. पेरणीचे नियोजन करीत असताना अचानक आलेल्या या अस्मानी संकटाचा सामना त्यांना करावा लागत आहे. रविवारच्या चक्रीवादळानंतर सोमवारी सकाळपासूनच घरावरील उडालेले छत. फुटलेले कवेलू दुरुस्तीच्या कामात आदिवासी मग्न झाल्याचे दिसून येत आहे.सरकार मायबाप, जल्दी मदत दे'इतवार के दिन हमारा पुरा घर का नुकसान हुआ. सरकार मायबाप जल्दी हम गरीब को मदत दे', अशी विनवणी वस्तापूर येथील आदिवासी महिला गंगा नानू जामकर यांनी केली आहे. पंचनामे तर होतच राहतील. पण त्यातून मिळणारा मोबदला लवकर देण्याची मागणी तिने नुकसानग्रस्तांसाठी केली आहे.

 

टॅग्स :Rainपाऊस