शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यासोबत डाळीही आवाक्याबाहेर; महागाईचा चटका सोसवेना, सणासुदीला प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

पावसाळ्यात भाजीपाल्यांचे नुकसान होत असते. त्यामुळे त्याचे दर वधारले आहेत. सणासुदीच्या महिन्याला सुरुवात झाल्याने विविध डाळींचे भावदेखील कडाडण्यास सुरुवात ...

पावसाळ्यात भाजीपाल्यांचे नुकसान होत असते. त्यामुळे त्याचे दर वधारले आहेत. सणासुदीच्या महिन्याला सुरुवात झाल्याने विविध डाळींचे भावदेखील कडाडण्यास सुरुवात झाली आहे. वाढती महागाई सामान्यांच्या आवाक्याबाहेरची झाल्याने आधीच कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात असणाऱ्यांना पोटाची भूक भागवावी तरी कशी, अशी विवंचना सतावते आहे.

पावसाळ्यात विशेषत: हिरवा भाजीपाला लवकर सडतो. ठोक व चिल्लर विक्रेत्यांसह भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. उत्पादनाच्या तुलनेत भाजीपाला अधिक प्रमाणात खराब होत असल्याने फेकावा लागतो. पर्यायाने याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरवाढीवर होत आहे. त्याचप्रमाणे सणासुदीला सुरुवात झाली आहे. गुरुपौर्णिमेनंतर नागपंचमी, रक्षाबंधन असे सण आहेत. आतापर्यंत स्थिर असणाऱ्या सर्वच डाळींच्या भावात गेल्या काही दिवसांत दरवाढ झाली आहे. महागाई लोकांचा पिच्छाच पुरवित असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार, उद्योगधंदे बुडाले. अशातच सणासुदीच्या काळात भाजीपाला व डाळींच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांपुढे मोठा आर्थिक पेच उभा ठाकला आहे.

रोजच्या जेवणामध्ये भाजीपाला तसेच डाळींचा वापर करावाच लागतो. तेव्हा मसुराची डाळ जेवणामध्ये वापरून भूक भागवली जात असल्याच्या प्रतिक्रिया आहेत. सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसेनासे झाले आहेत. सध्या भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्याचप्रमाणे आगामी सणांमुळे डाळींचे दर अधिक भडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अजूनही गोरगरीब सर्वांत स्वस्त असणाऱ्या मसूर डाळीचा जेवणामध्ये वापर करीत आहेत.

-------------------------

डाळींचे दर (प्रति किलो )

* हरभऱ्याची डाळ- ६५ रु.

* तुरीची दाळ - १०० रु.

* मूग डाळ - ९० रु.

* उडीद डाळ - १०० रु.

* बरबटी डाळ - ६५ रु.

* मसूर डाळ - ६५ रु.

-----------------------

भाजीपाल्यांचे दर (प्रति किलो )

*पालक - ४० रु.

*गवार - ४० रु.

* कोथिंबीर - ८० रु.

* फूलकोबी - ४० रु.

* पत्ताकोबी - ३० रु.

*कांदा - २५ रु.

*मेथी - ८० रु.

*कारले - ४० रु.

*बटाटे - २५ रु.

-----------------------

* म्हणून भाजीपाला कडाडला.....

पावसाळ्यात शेतजमिनीमध्ये पाणी साचलेले असते. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या जास्त वेळ टिकत नाहीत. बाहेरगावाहून येणाऱ्या भाजीपाल्यांच्या वाहतूकखर्चात वाढ होते. पावसाळा सुरू होण्याआधीच दरवाढ होते. पावसाळ्यात भाजीपाल्याची आवकदेखील कमी असते. गत महिन्याच्या तुलनेत या महिन्यात भाजीपाल्याचे दर काहीसे कमी झाले आहेत. पावसाळ्यातील भाजीपाला सर्वांनाच फटका देणारा असतो. प्रामुख्याने यादरम्यान हिरव्या पालेभाज्यांचे दर वाढलेले असतात.

--------------------

* म्हणून डाळ महागली.....

सणासुदीला सुरुवात झाली आहे. स्थिर असणारे डाळींच्या भाव काहीसे वाढले आहेत. सहा महिन्यांपूर्वी डाळींचे भाव प्रचंड वाढले होते. काहीसा दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा काही दिवसांपासून डाळींच्या दरांमध्ये झालेली वाढ सर्वसामान्यांचे आर्थिक संकट वाढविणारी आहे. नवीन तुरीची दाळ येण्यासाठी अजून बराच कालावधी आहे. सध्या डाळींच्या दरवाढीचे कुठलेही ठोस कारण नसताना दरवाढ कशामुळे, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

-------------------------

सर्वसामान्यांचे हाल

1) कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून आम्ही आर्थिक संकटात सापडलो आहोत. महागाईने कळस गाठला आहे. भाजीपाल्यांचे तसेच किराणा मालाचे दर प्रचंड वाढल्याने पोटाची खळगी भरावी कशी, ही विवंचना अनेक कुटुंबांना सतावत आहे. महागाईवर नियंत्रण आणले पाहिजे.

- ममता मेश्राम, गृहिणी, बडनेरा.

2) जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये प्रचंड दरवाढ झाली आहे भाजीपाला, किराणा आवाक्याबाहेर गेला आहे. कोरोना महामारीमुळे आधीच लोक त्रस्त आहेत. अशातच झालेली प्रचंड दरवाढ भेडसावणारी आहे. सगळ्याच प्रकारच्या दरवाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

- कमलाबाई बडगे, गृहिणी, बडनेरा.

-------------------------