शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
5
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
6
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
7
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
8
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
9
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
10
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
11
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
12
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
13
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
14
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
15
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
16
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
17
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
18
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
19
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?

भाजीपाल्यासोबत डाळीही आवाक्याबाहेर; महागाईचा चटका सोसवेना, सणासुदीला प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:10 IST

पावसाळ्यात भाजीपाल्यांचे नुकसान होत असते. त्यामुळे त्याचे दर वधारले आहेत. सणासुदीच्या महिन्याला सुरुवात झाल्याने विविध डाळींचे भावदेखील कडाडण्यास सुरुवात ...

पावसाळ्यात भाजीपाल्यांचे नुकसान होत असते. त्यामुळे त्याचे दर वधारले आहेत. सणासुदीच्या महिन्याला सुरुवात झाल्याने विविध डाळींचे भावदेखील कडाडण्यास सुरुवात झाली आहे. वाढती महागाई सामान्यांच्या आवाक्याबाहेरची झाल्याने आधीच कोरोना महामारीमुळे आर्थिक संकटात असणाऱ्यांना पोटाची भूक भागवावी तरी कशी, अशी विवंचना सतावते आहे.

पावसाळ्यात विशेषत: हिरवा भाजीपाला लवकर सडतो. ठोक व चिल्लर विक्रेत्यांसह भाजीपाल्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते. उत्पादनाच्या तुलनेत भाजीपाला अधिक प्रमाणात खराब होत असल्याने फेकावा लागतो. पर्यायाने याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरवाढीवर होत आहे. त्याचप्रमाणे सणासुदीला सुरुवात झाली आहे. गुरुपौर्णिमेनंतर नागपंचमी, रक्षाबंधन असे सण आहेत. आतापर्यंत स्थिर असणाऱ्या सर्वच डाळींच्या भावात गेल्या काही दिवसांत दरवाढ झाली आहे. महागाई लोकांचा पिच्छाच पुरवित असल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे अनेकांचे रोजगार, उद्योगधंदे बुडाले. अशातच सणासुदीच्या काळात भाजीपाला व डाळींच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्यांपुढे मोठा आर्थिक पेच उभा ठाकला आहे.

रोजच्या जेवणामध्ये भाजीपाला तसेच डाळींचा वापर करावाच लागतो. तेव्हा मसुराची डाळ जेवणामध्ये वापरून भूक भागवली जात असल्याच्या प्रतिक्रिया आहेत. सर्वसामान्यांना महागाईचे चटके सोसेनासे झाले आहेत. सध्या भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्याचप्रमाणे आगामी सणांमुळे डाळींचे दर अधिक भडकणार असल्याचे संकेत मिळत आहेत. अजूनही गोरगरीब सर्वांत स्वस्त असणाऱ्या मसूर डाळीचा जेवणामध्ये वापर करीत आहेत.

-------------------------

डाळींचे दर (प्रति किलो )

* हरभऱ्याची डाळ- ६५ रु.

* तुरीची दाळ - १०० रु.

* मूग डाळ - ९० रु.

* उडीद डाळ - १०० रु.

* बरबटी डाळ - ६५ रु.

* मसूर डाळ - ६५ रु.

-----------------------

भाजीपाल्यांचे दर (प्रति किलो )

*पालक - ४० रु.

*गवार - ४० रु.

* कोथिंबीर - ८० रु.

* फूलकोबी - ४० रु.

* पत्ताकोबी - ३० रु.

*कांदा - २५ रु.

*मेथी - ८० रु.

*कारले - ४० रु.

*बटाटे - २५ रु.

-----------------------

* म्हणून भाजीपाला कडाडला.....

पावसाळ्यात शेतजमिनीमध्ये पाणी साचलेले असते. त्यामुळे हिरव्या पालेभाज्या जास्त वेळ टिकत नाहीत. बाहेरगावाहून येणाऱ्या भाजीपाल्यांच्या वाहतूकखर्चात वाढ होते. पावसाळा सुरू होण्याआधीच दरवाढ होते. पावसाळ्यात भाजीपाल्याची आवकदेखील कमी असते. गत महिन्याच्या तुलनेत या महिन्यात भाजीपाल्याचे दर काहीसे कमी झाले आहेत. पावसाळ्यातील भाजीपाला सर्वांनाच फटका देणारा असतो. प्रामुख्याने यादरम्यान हिरव्या पालेभाज्यांचे दर वाढलेले असतात.

--------------------

* म्हणून डाळ महागली.....

सणासुदीला सुरुवात झाली आहे. स्थिर असणारे डाळींच्या भाव काहीसे वाढले आहेत. सहा महिन्यांपूर्वी डाळींचे भाव प्रचंड वाढले होते. काहीसा दिलासा मिळाल्यानंतर आता पुन्हा काही दिवसांपासून डाळींच्या दरांमध्ये झालेली वाढ सर्वसामान्यांचे आर्थिक संकट वाढविणारी आहे. नवीन तुरीची दाळ येण्यासाठी अजून बराच कालावधी आहे. सध्या डाळींच्या दरवाढीचे कुठलेही ठोस कारण नसताना दरवाढ कशामुळे, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

-------------------------

सर्वसामान्यांचे हाल

1) कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून आम्ही आर्थिक संकटात सापडलो आहोत. महागाईने कळस गाठला आहे. भाजीपाल्यांचे तसेच किराणा मालाचे दर प्रचंड वाढल्याने पोटाची खळगी भरावी कशी, ही विवंचना अनेक कुटुंबांना सतावत आहे. महागाईवर नियंत्रण आणले पाहिजे.

- ममता मेश्राम, गृहिणी, बडनेरा.

2) जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये प्रचंड दरवाढ झाली आहे भाजीपाला, किराणा आवाक्याबाहेर गेला आहे. कोरोना महामारीमुळे आधीच लोक त्रस्त आहेत. अशातच झालेली प्रचंड दरवाढ भेडसावणारी आहे. सगळ्याच प्रकारच्या दरवाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

- कमलाबाई बडगे, गृहिणी, बडनेरा.

-------------------------