शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भोंग्यापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची, हे यांना कधी कळणार? यशोमती ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 11:37 IST

अमरावती, तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

अमरावती : काही लोक विनाकारण भोंग्याचे राजकारण करून या माध्यमातून राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण भोंग्यांच्या आवाजापेक्षा जनतेच्या सेवेचे आणि कामाचे अधिक महत्त्व आहे, हे यांना कधी कळणार? असा प्रश्न उपस्थित करीत अगदी राजकारण्यांचे भोंगे काढले, तर जनतेची चार कामे अधिक होतील, असे सूचक विधान पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

अमरावती, तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. आजपर्यंत आपण कधीही जातीपातीत, धर्माधर्मात भेदभाव केला नाही. कोण कुठल्या जातीचे आहे, समाजाचे आहे, धर्माचे आहे, हे आपण कधीच पाहिले नाही आणि तुमच्यापैकीही कुणी असे वर्तन करीत नाही, याची मला खात्री आहे. कारण आपल्याला सर्वांच्या हिताचे आणि विकासाचे काम करायचे आहे. समाजाच्या हिताचा आणि विकासाचा विचार करताना कधीही जात आडवी येत नाही किंवा धर्म आडवा येत नाही. पण ज्यांना केवळ राजकारण करायचे आहे, त्यांना धर्माधर्मात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.

भोंग्यावरून राजकारण करून सामाजिक शांतता बिघडवायची आहे. वास्तविक अशा राजकारण्यांचे भोंगे काढून घ्यायला पाहिजेत. त्याने जनतेची चार कामे अधिक होतील, जनतेची सेवा अधिक होईल आणि कुणाला त्रास होणार नाही, असा उपरोधिक टोलाही यावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी लगावला. सामाजिक शांतता, सलोखा आणि धार्मिक एकात्मतेला कधीही तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत अमरावतीतील जनता अशा लोकांच्या कारस्थानाला बळी पडणार नाही, असेही ॲड. ठाकूर यावेळी म्हणाल्या.

तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी विशेष तज्ज्ञांच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला यामुळे एकाच दिवशी विविध आरोग्य तपासण्या करता आल्या. तिवसा पंचायत समितीच्या सभापती शिल्पा रवींद हांडे यांच्या पुढाकाराने हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता. या शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरSocialसामाजिक