शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

भोंग्यापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाची, हे यांना कधी कळणार? यशोमती ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2022 11:37 IST

अमरावती, तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.

अमरावती : काही लोक विनाकारण भोंग्याचे राजकारण करून या माध्यमातून राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण भोंग्यांच्या आवाजापेक्षा जनतेच्या सेवेचे आणि कामाचे अधिक महत्त्व आहे, हे यांना कधी कळणार? असा प्रश्न उपस्थित करीत अगदी राजकारण्यांचे भोंगे काढले, तर जनतेची चार कामे अधिक होतील, असे सूचक विधान पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे.

अमरावती, तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य आरोग्य शिबिराचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. आजपर्यंत आपण कधीही जातीपातीत, धर्माधर्मात भेदभाव केला नाही. कोण कुठल्या जातीचे आहे, समाजाचे आहे, धर्माचे आहे, हे आपण कधीच पाहिले नाही आणि तुमच्यापैकीही कुणी असे वर्तन करीत नाही, याची मला खात्री आहे. कारण आपल्याला सर्वांच्या हिताचे आणि विकासाचे काम करायचे आहे. समाजाच्या हिताचा आणि विकासाचा विचार करताना कधीही जात आडवी येत नाही किंवा धर्म आडवा येत नाही. पण ज्यांना केवळ राजकारण करायचे आहे, त्यांना धर्माधर्मात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे.

भोंग्यावरून राजकारण करून सामाजिक शांतता बिघडवायची आहे. वास्तविक अशा राजकारण्यांचे भोंगे काढून घ्यायला पाहिजेत. त्याने जनतेची चार कामे अधिक होतील, जनतेची सेवा अधिक होईल आणि कुणाला त्रास होणार नाही, असा उपरोधिक टोलाही यावेळी ॲड. यशोमती ठाकूर यांनी लगावला. सामाजिक शांतता, सलोखा आणि धार्मिक एकात्मतेला कधीही तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत अमरावतीतील जनता अशा लोकांच्या कारस्थानाला बळी पडणार नाही, असेही ॲड. ठाकूर यावेळी म्हणाल्या.

तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात तालुकास्तरीय भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी विशेष तज्ज्ञांच्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला यामुळे एकाच दिवशी विविध आरोग्य तपासण्या करता आल्या. तिवसा पंचायत समितीच्या सभापती शिल्पा रवींद हांडे यांच्या पुढाकाराने हा अतिशय स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला होता. या शिबिराचा बहुसंख्य नागरिकांनी लाभ घेतला.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरSocialसामाजिक