शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जाहिरातीचा गाजावाजा हमीभाव कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:04 IST

‘शेतमालास हमीभावाचे संरक्षण’ आदी शासन जाहिरातीचा गाजावाजा सर्वत्र सुरू असताना नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांचा माल नाकारला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

ठळक मुद्देशासनाची पोलखोल : शेतकऱ्यांचा माल केंद्रावरून माघारी

आॅनलाईन लोकमतअमरावती : ‘शेतमालास हमीभावाचे संरक्षण’ आदी शासन जाहिरातीचा गाजावाजा सर्वत्र सुरू असताना नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांचा माल नाकारला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर दोन महिन्यात २४ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली, याच कालावधीत व्यापाऱ्यांनी सात लाख क्विंटल सोयाबीनची बेभाव खरेदी केली असल्याने शासनाच्या धोरणाची पोलखोल झाली आहे.जिल्ह्यात नाफेडद्वारा शासन खरेदीचे १२ केंद्र तालुकास्तरावर सुरू करण्यात आले. मात्र या ठिकाणी शासन निकषानुसार असलेल्या अटी व शर्तींनुसारच सोयाबीनची खरेदी करण्यात येते. यामध्ये प्रमुख अट आर्द्रतेची आहे. त्यानुसार १२ टक्के आर्द्रता ग्राह्य धरण्यात येते. हमीभाव म्हणजेच ३ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतो. मात्र, यापेक्षा थोडा जरी फरक असल्यास सोयाबीन नाकारले जाते. त्यामुळे शेतकºयांना स्थानिक बाजारात व्यापाऱ्यांना सोयाबीन विकल्याशिवाय पर्याय नाही. याठिकाणी मात्र शेतकऱ्यांची नड पाहून अगदी १५०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सोयाबीनची खरेदी यंदाच्या हंगामात झाली आहे. नॉन एफएक्यू सोयाबीनच्या बाबतीत ग्रेडेशन कसे करावे तसेच या प्रतवारीच्या सोयाबीनमध्ये दरात तफावत किती असावी, याविषयी कोणतेच शासन धोरण नसल्यामुळेच व्यापाऱ्यांद्वारा शेतकऱ्यांची हजार ते दीड हजारांच्या फरकाने शेतकऱ्यांची लूट होत आहे. आणि शासनाद्वारा शेतकऱ्यांचा माल आधारभूत किमतीत खरेदी केल्याविषयीचे आश्वासन देत असल्याचे विसंगत चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. यंदाच्या हंगामात कापूस वगळता सर्वच शेतमाल आधारभूत किमतीपेक्षा हजार रुपये प्रतिक्विंटल या भावाने विकला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मुगाची १७६ शेतकºयांकडून १ हजार ४४९ क्विंटल, उडीदाची ३०२ शेतकऱ्यांची २ हजार ३१५ क्विंटल, ज्वारीची ३१ शेतकºयांची १ हजार ६९ क्विंटल, मक्याची ४ शेतकऱ्यांकडून १३९ क्विंटल तर कापसाची १ हजार १० क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे. नाफेडची खरेदी मंद गतीने होत असल्यामुळे सद्यस्थिीतीत ७ हजार ५२० शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असतानासुद्धा १ हजार २१९ शेतकºयांचीच मोजणी करण्यात आली आहे.केंद्रांवर सोयाबीनची शासन खरेदीयंदाच्या हंगामात १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात शासनाद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू झाली, यामध्ये अचलपूर केंद्रावर १,५१९ क्विंटल, अमरावती ३८३, अंजनगाव सुर्जी १,०५१, चांदूर बाजार ३१४, चांदूर रेल्वे ५०४२, दर्यापूर १४७, धामणगाव रेल्वे ९,५०२,धारणी २३०, मोर्शी १,७७३, नांदगाव खंडेश्वर १,९४२, तिवसा २,४६३, तर वरूड केंद्रावर खरेदी निरंक आहे. अशी एकूण १२१९ शेतकऱ्यांची २४ हजार ३५० क्विंटलची खरेदी मंगळवारपर्यंत करण्यात आली.स्थानिक बाजारात व्यापाऱ्यांची खरेदीमंगळवारपर्यंत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ७ लाख ८ हजार ४४० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली.यामध्ये अमरावती ४,६४,७०५, नांदगाव खंडेश्वर १९,९४६, चांदूर रेल्वे २१,१३६, धामणगाव रेल्वे ८९,१७६, चांदूर बाजार २४,२०८, तिवसा ६५, मोर्शी २६,४४१, वरूड १७,३३९, दर्यापूर १७,३३९, अंजनगाव सुर्जी १५,७२९, अचलपूर २०,३७९, तर धारणी येथे ८,४६० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली.