शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

जाहिरातीचा गाजावाजा हमीभाव कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:04 IST

‘शेतमालास हमीभावाचे संरक्षण’ आदी शासन जाहिरातीचा गाजावाजा सर्वत्र सुरू असताना नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांचा माल नाकारला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

ठळक मुद्देशासनाची पोलखोल : शेतकऱ्यांचा माल केंद्रावरून माघारी

आॅनलाईन लोकमतअमरावती : ‘शेतमालास हमीभावाचे संरक्षण’ आदी शासन जाहिरातीचा गाजावाजा सर्वत्र सुरू असताना नाफेडच्या केंद्रावर शेतकऱ्यांचा माल नाकारला जात असल्याचे धक्कादायक चित्र आहे. जिल्ह्यात नाफेडच्या केंद्रांवर दोन महिन्यात २४ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली, याच कालावधीत व्यापाऱ्यांनी सात लाख क्विंटल सोयाबीनची बेभाव खरेदी केली असल्याने शासनाच्या धोरणाची पोलखोल झाली आहे.जिल्ह्यात नाफेडद्वारा शासन खरेदीचे १२ केंद्र तालुकास्तरावर सुरू करण्यात आले. मात्र या ठिकाणी शासन निकषानुसार असलेल्या अटी व शर्तींनुसारच सोयाबीनची खरेदी करण्यात येते. यामध्ये प्रमुख अट आर्द्रतेची आहे. त्यानुसार १२ टक्के आर्द्रता ग्राह्य धरण्यात येते. हमीभाव म्हणजेच ३ हजार ५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतो. मात्र, यापेक्षा थोडा जरी फरक असल्यास सोयाबीन नाकारले जाते. त्यामुळे शेतकºयांना स्थानिक बाजारात व्यापाऱ्यांना सोयाबीन विकल्याशिवाय पर्याय नाही. याठिकाणी मात्र शेतकऱ्यांची नड पाहून अगदी १५०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे सोयाबीनची खरेदी यंदाच्या हंगामात झाली आहे. नॉन एफएक्यू सोयाबीनच्या बाबतीत ग्रेडेशन कसे करावे तसेच या प्रतवारीच्या सोयाबीनमध्ये दरात तफावत किती असावी, याविषयी कोणतेच शासन धोरण नसल्यामुळेच व्यापाऱ्यांद्वारा शेतकऱ्यांची हजार ते दीड हजारांच्या फरकाने शेतकऱ्यांची लूट होत आहे. आणि शासनाद्वारा शेतकऱ्यांचा माल आधारभूत किमतीत खरेदी केल्याविषयीचे आश्वासन देत असल्याचे विसंगत चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. यंदाच्या हंगामात कापूस वगळता सर्वच शेतमाल आधारभूत किमतीपेक्षा हजार रुपये प्रतिक्विंटल या भावाने विकला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत मुगाची १७६ शेतकºयांकडून १ हजार ४४९ क्विंटल, उडीदाची ३०२ शेतकऱ्यांची २ हजार ३१५ क्विंटल, ज्वारीची ३१ शेतकºयांची १ हजार ६९ क्विंटल, मक्याची ४ शेतकऱ्यांकडून १३९ क्विंटल तर कापसाची १ हजार १० क्विंटल खरेदी करण्यात आलेली आहे. नाफेडची खरेदी मंद गतीने होत असल्यामुळे सद्यस्थिीतीत ७ हजार ५२० शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली असतानासुद्धा १ हजार २१९ शेतकºयांचीच मोजणी करण्यात आली आहे.केंद्रांवर सोयाबीनची शासन खरेदीयंदाच्या हंगामात १० आॅक्टोबरपासून जिल्ह्यात शासनाद्वारा सोयाबीनची खरेदी सुरू झाली, यामध्ये अचलपूर केंद्रावर १,५१९ क्विंटल, अमरावती ३८३, अंजनगाव सुर्जी १,०५१, चांदूर बाजार ३१४, चांदूर रेल्वे ५०४२, दर्यापूर १४७, धामणगाव रेल्वे ९,५०२,धारणी २३०, मोर्शी १,७७३, नांदगाव खंडेश्वर १,९४२, तिवसा २,४६३, तर वरूड केंद्रावर खरेदी निरंक आहे. अशी एकूण १२१९ शेतकऱ्यांची २४ हजार ३५० क्विंटलची खरेदी मंगळवारपर्यंत करण्यात आली.स्थानिक बाजारात व्यापाऱ्यांची खरेदीमंगळवारपर्यंत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये ७ लाख ८ हजार ४४० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली.यामध्ये अमरावती ४,६४,७०५, नांदगाव खंडेश्वर १९,९४६, चांदूर रेल्वे २१,१३६, धामणगाव रेल्वे ८९,१७६, चांदूर बाजार २४,२०८, तिवसा ६५, मोर्शी २६,४४१, वरूड १७,३३९, दर्यापूर १७,३३९, अंजनगाव सुर्जी १५,७२९, अचलपूर २०,३७९, तर धारणी येथे ८,४६० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली.