शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

शासकीय टँकरला खासगी मुंडके; नादुरुस्त दाखवून उकळले पैसे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 17:29 IST

शासनाला चुना, वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी पाण्यासारखा व्यर्थ खर्च

चिखलदरा (अमरावती) : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागात वन्य प्राण्यांसाठी अतिसंरक्षित जंगलातील पाणवठे पाण्याने भरण्यासाठी शासकीय टँकर दुरुस्त असताना नादुरुस्त दाखवून खासगी ट्रॅक्टरला शासकीय टँकर लावून सहा लाखांच्या जवळपास देयके काढण्यात आल्याचा प्रकार पुढे आला असून या प्रकरणाची तक्रारही वनमंत्र्यांना करण्यात आली आहे.

गुगामल वन्यजीव विभागाच्या चिखलदरा परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या वैराट चाटीबल्डा मेमना परिसरात गतवर्षी फेब्रुवारी ते जून २०२२ मध्ये वन्य प्राण्यांना अतिसंरक्षित जंगलात पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकंती करावी लागू नये यासाठी कृत्रिम व काही नैसर्गिक पाणवठे कोरडे पडल्याने पाण्याने भरण्यासाठी शासकीय ट्रॅक्टर व टँकर दुरुस्त असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करीत संबंधित अधिकाऱ्यांनी शासकीय टँकरला खासगी ट्रॅक्टरचे मुंडके लावून पाच ते सहा लाख रुपयांचे देयके काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली असून त्या संदर्भात योग्य चौकशी करून संबंधिताविरुद्ध कारवाई करण्याची मागणी वनमंत्र्यांना एका तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

२५ ऐवजी शंभर टक्के खर्च : शासनाला चुना!

शासकीय ट्रॅक्टर दुरुस्त असताना खासगी कंत्राटदाराच्या ट्रॅक्टरला टँकर लावून वन्य प्राण्यांसाठी पाणी टाकण्यात आले. त्यावर शासनाला लागणारा २५ टक्के खर्च सोडून शंभर टक्के खर्च करण्यात आला. शासनाला भुर्दंड बसविणाऱ्या संबंधितांविरुद्ध वरिष्ठ अधिकारी चौकशी करून सत्य तपासून कारवाई करतील का, असा प्रश्न करण्यात आला आहे

कमिशनखोरीचा प्रकार ?

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागामध्ये मोठ्या प्रमाणात मनमर्जीप्रमाणे कामे करून लाखो रुपयांची देयके खामगाव वाशिम येथील कंत्राटदाराला आणून केली जात असल्याचा प्रकार उघड झाला. जेसीबीनंतर गॅबियन बंधारे बांधण्यात आल्याची चर्चा आहे असे असताना वन्य प्राण्यांच्या नावावर पिण्याच्या पाण्यात लावलेल्या टँकरमध्येसुद्धा कमिशनखोरीचा प्रकार असल्याचा आरोप त्या निनावी तक्रारीत वनमंत्र्यांना करण्यात आला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागAmravatiअमरावती