शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

भाजीपाल्यांचे भाव कडाडले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 01:46 IST

सद्यस्थितीत सर्वच भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. आवक कमी झाल्याने ठोकमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत.

ठळक मुद्देमहिन्याकाठी सरासरी १६०० रुपये खर्च। किरकोळ व्यावसायिकांकडून दामदुप्पट विक्री

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सद्यस्थितीत सर्वच भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. आवक कमी झाल्याने ठोकमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी सामान्य नागरिकांचे भाजीपाल्याचे महिन्याचे बजेट वाढून दुप्पट झाले आहे.इतवारा बाजारातील किरकोळ भाजी व्यावसायिकांशी व ग्राहकांशी शनिवारी सदर प्रतिनिधीने चर्चा केली असता, सदर बाब पुढे आली आहे. भाजीमंडीतच जास्त दराने भाजीपाला विकत घ्यावा लागत असल्याने आम्हाला दर वाढवावेच लागतात, अशी प्रतिक्रिया येथील व्यावसायिकांनी दिली. आठवड्याला लागणारा भाजीपाला हा पूर्वी दोनशे रूपयात व्हायचा; आता चारशे रुपये मोजावे लागत असल्याचे मत काही महिला ग्राहकांनी यावेळी व्यक्त केले आहे.बटाटा व कांद्याचे भाव स्थिर असले तरी दैनंदिन आहारात महत्त्वाच्या मानल्या जाणाºया सर्वच भाजीपाल्यांचे दर या दिवसांत वधारले आहे. या भाववाढीला अद्याप समाधानकारक न कोसळलेला पाऊसही कारणीभूत आहे. पावसाने सरासरी गाठल्यानंतर भाजीपाल्याची ही दरवाढ आवाक्यात येईल, अशी अपेक्षा ठोक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.नाशिक, संगमनेर येथून येतोय भाजीपालाशहरातील भाजी मंडईत जिल्ह्यातील भाजीपाला क्वचितच येत आहे. बहुतांश नाशिक येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत हर्रास होणारा भाजीपाला ट्रकने येथे दाखल होत आहे. टोमॅटो नगर जिल्ह्यातील नारणगाव तसेच संगमनेर येथून मागविले जात असल्याची माहिती अमरावती येथील भाजी मंडईतील एकता सब्जी भंडारचे संचालक अताउल्ला शाह जैनउल्लाह शाह यांनी दिली.सरासरी ८०० रुपयांनी वाढले बजेटकाही महिन्यांपूर्वी सरासरी एका आठवड्याला एका कुटुंबाला सरासरी २०० रुपयांचा, तर महिन्याकाठी ८०० रुपयांचा भाजीपाला लागायचा. परंतु, आता सर्वच भाज्यांचे दर कडाडल्याने सामान्य नागरिकांचे भाजीपाल्याचे बजेट फुगले आहे. भाजीबाजारात दामदुप्पट भावाने भाजीपाल्याची विक्री करण्यात येत असल्याने आता आठवड्याला ४०० रुपये, तर दरमहा किमान १६०० रुपये बजेट होते. तूर व इतर डाळींनी तयार केलेल्या वड्या तसेच इतर वाळवणीचे पदार्थ भाजीपाल्याला पर्याय ठरत असल्याचे महिलांनी चर्चेदरम्यान सांगितले.आधी आठवड्याला भाजीपाला २०० रुपयांत व्हायचा. पण, आता सर्वच भाजीपाल्यांचे भाव वाढल्याने तो आता ४०० रूपयांचा झाला आहे. त्याकारणाने महिन्याकाठी भाजीपाल्याकरिता बजेट वाढले आहे.- सोनाली पवार, गोपालनगरकितीही दर वाढले तरी भाजीपाला हा जीवनावश्यक घटक असल्याने विकत घ्यावाच लागतो. किरकोळ भाजी विक्रेत्यांनी दामदुप्पट भावाने विक्री करून नये. नफा घ्यावा, पण ग्राहकांचे नुकसान होणार नाही, असे मला वाटते.- प्रियंका रघटाटे, गोपालनगरपावसाळा असल्याने भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. त्याकारणाने भाजीमंडीतूनच जास्त भावाने भाजीपाला विकत घ्यावा लागतो. हा मेहनतीची व्यवसाय आहे. नाशवंत भाजीपाला अनेकदा खराब होतो. त्याकारणाने किमान चांगला नफा कमविण्याची आमची इच्छा असल्यास ते वावगे ठरू नये.- तामील शेख, किरकोळ विक्रेतायंदा खरोखरच भाज्यांचे भाव वाढले आहेत. ही खरोखरच झालेली वाढ आहे की कृत्रिमरीत्या केलेली भाववाढ आहे, हे कळायला जागा नाही. बजेट वाढले असले तरी दैनंदिन आहारातील भाज्या विकत घ्याव्याच लागतात.- शरद इंगळे, दंत महाविद्यालयभाजीपाल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, काही प्रमाणात वेगळी वाट शोधावी लागते. कोथिंबीर सध्या आवाक्याबाहेर गेले असल्याने त्याला पर्याय म्हणून धनिया पावडरचा वापर नाइलाजाने करावा लागत आहे.- पूनम दखने, कठोरा नाकाभाजीबाजारातील आवक सध्या ५० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. त्याकारणाने फळ व भाजीबाजाराचा सेससुद्धा कमी होत आहे. काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे.के.पी. मकवाने,विभागप्रमुख, फळ व भाजीबाजार