शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भाजीपाल्यांचे भाव कडाडले सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 01:46 IST

सद्यस्थितीत सर्वच भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. आवक कमी झाल्याने ठोकमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत.

ठळक मुद्देमहिन्याकाठी सरासरी १६०० रुपये खर्च। किरकोळ व्यावसायिकांकडून दामदुप्पट विक्री

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सद्यस्थितीत सर्वच भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. आवक कमी झाल्याने ठोकमध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना क्विंटलमागे चांगले दर मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी सामान्य नागरिकांचे भाजीपाल्याचे महिन्याचे बजेट वाढून दुप्पट झाले आहे.इतवारा बाजारातील किरकोळ भाजी व्यावसायिकांशी व ग्राहकांशी शनिवारी सदर प्रतिनिधीने चर्चा केली असता, सदर बाब पुढे आली आहे. भाजीमंडीतच जास्त दराने भाजीपाला विकत घ्यावा लागत असल्याने आम्हाला दर वाढवावेच लागतात, अशी प्रतिक्रिया येथील व्यावसायिकांनी दिली. आठवड्याला लागणारा भाजीपाला हा पूर्वी दोनशे रूपयात व्हायचा; आता चारशे रुपये मोजावे लागत असल्याचे मत काही महिला ग्राहकांनी यावेळी व्यक्त केले आहे.बटाटा व कांद्याचे भाव स्थिर असले तरी दैनंदिन आहारात महत्त्वाच्या मानल्या जाणाºया सर्वच भाजीपाल्यांचे दर या दिवसांत वधारले आहे. या भाववाढीला अद्याप समाधानकारक न कोसळलेला पाऊसही कारणीभूत आहे. पावसाने सरासरी गाठल्यानंतर भाजीपाल्याची ही दरवाढ आवाक्यात येईल, अशी अपेक्षा ठोक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.नाशिक, संगमनेर येथून येतोय भाजीपालाशहरातील भाजी मंडईत जिल्ह्यातील भाजीपाला क्वचितच येत आहे. बहुतांश नाशिक येथील कृषिउत्पन्न बाजार समितीत हर्रास होणारा भाजीपाला ट्रकने येथे दाखल होत आहे. टोमॅटो नगर जिल्ह्यातील नारणगाव तसेच संगमनेर येथून मागविले जात असल्याची माहिती अमरावती येथील भाजी मंडईतील एकता सब्जी भंडारचे संचालक अताउल्ला शाह जैनउल्लाह शाह यांनी दिली.सरासरी ८०० रुपयांनी वाढले बजेटकाही महिन्यांपूर्वी सरासरी एका आठवड्याला एका कुटुंबाला सरासरी २०० रुपयांचा, तर महिन्याकाठी ८०० रुपयांचा भाजीपाला लागायचा. परंतु, आता सर्वच भाज्यांचे दर कडाडल्याने सामान्य नागरिकांचे भाजीपाल्याचे बजेट फुगले आहे. भाजीबाजारात दामदुप्पट भावाने भाजीपाल्याची विक्री करण्यात येत असल्याने आता आठवड्याला ४०० रुपये, तर दरमहा किमान १६०० रुपये बजेट होते. तूर व इतर डाळींनी तयार केलेल्या वड्या तसेच इतर वाळवणीचे पदार्थ भाजीपाल्याला पर्याय ठरत असल्याचे महिलांनी चर्चेदरम्यान सांगितले.आधी आठवड्याला भाजीपाला २०० रुपयांत व्हायचा. पण, आता सर्वच भाजीपाल्यांचे भाव वाढल्याने तो आता ४०० रूपयांचा झाला आहे. त्याकारणाने महिन्याकाठी भाजीपाल्याकरिता बजेट वाढले आहे.- सोनाली पवार, गोपालनगरकितीही दर वाढले तरी भाजीपाला हा जीवनावश्यक घटक असल्याने विकत घ्यावाच लागतो. किरकोळ भाजी विक्रेत्यांनी दामदुप्पट भावाने विक्री करून नये. नफा घ्यावा, पण ग्राहकांचे नुकसान होणार नाही, असे मला वाटते.- प्रियंका रघटाटे, गोपालनगरपावसाळा असल्याने भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. त्याकारणाने भाजीमंडीतूनच जास्त भावाने भाजीपाला विकत घ्यावा लागतो. हा मेहनतीची व्यवसाय आहे. नाशवंत भाजीपाला अनेकदा खराब होतो. त्याकारणाने किमान चांगला नफा कमविण्याची आमची इच्छा असल्यास ते वावगे ठरू नये.- तामील शेख, किरकोळ विक्रेतायंदा खरोखरच भाज्यांचे भाव वाढले आहेत. ही खरोखरच झालेली वाढ आहे की कृत्रिमरीत्या केलेली भाववाढ आहे, हे कळायला जागा नाही. बजेट वाढले असले तरी दैनंदिन आहारातील भाज्या विकत घ्याव्याच लागतात.- शरद इंगळे, दंत महाविद्यालयभाजीपाल्याशिवाय पर्याय नाही. मात्र, काही प्रमाणात वेगळी वाट शोधावी लागते. कोथिंबीर सध्या आवाक्याबाहेर गेले असल्याने त्याला पर्याय म्हणून धनिया पावडरचा वापर नाइलाजाने करावा लागत आहे.- पूनम दखने, कठोरा नाकाभाजीबाजारातील आवक सध्या ५० टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. त्याकारणाने फळ व भाजीबाजाराचा सेससुद्धा कमी होत आहे. काही दिवसांत आवक वाढण्याची शक्यता आहे.के.पी. मकवाने,विभागप्रमुख, फळ व भाजीबाजार