शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

अध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी इच्छुकांच्या आशा पल्लवीत

By admin | Updated: October 13, 2016 00:34 IST

नगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण ‘सर्वसाधारण’ अर्थात खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

राजकारण गतीमान : पक्ष नेतृत्वाला पडलाय पेचचेतन घोगरे अंजनगाव सुर्जीनगराध्यक्षपदासाठीचे आरक्षण ‘सर्वसाधारण’ अर्थात खुल्या प्रवर्गासाठी निघाल्याने अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. देवी पावली, असा भास त्यांना होत आहे. कोणत्याही प्रवर्गातील उमेदवाराला निवडणूक लढविता येणार असल्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी वाढणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षापुढे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.अनेकदा विशिष्ट प्रवर्गासाठी अध्यक्षपद आरक्षित झाल्यावर तीव्र इच्छा असूनही अनेकांना निवडणूक लढता येत नाही. पण नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी निघाल्यामुळे ही संधी आपल्यालाच मिळावी, यासाठी अनेकजण सक्रिय झाले आहेत. राजकीय पक्ष व इच्छुकांकडून नव्या समीकरणाला सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांनंतर थेट नागरिकांमधून नगराध्यक्ष निवडले जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात नाही तर इतर वेळेसही जास्तीत जास्त चांगला जनसंपर्क ठेवणाऱ्या उमेदवाराला फायदा होणार आहे. यातच इच्छुकांची वाढती संख्या पाहता सर्व राजकीय पक्ष स्वतंत्रपणे पुन्हा एकदा आपली ताकद आजमावतात की एकमेकांशी हातमिळवणी करून निवडणुकीला समोर जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ५ आॅक्टोबर रोजी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यातच सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद निघाल्याचे कळताच खुल्या प्रवर्गातील उमेदवारासह सर्वांच्या आनंदाला उधान आले. सध्या नवरात्रीची धामधूम सुरू असून कोणीही अन्य विषयावर बोलताना दिसून येत नाही. त्यामुळे आता सामना चांगलाच रंगणार, हेच वाक्य सर्वांच्या तोंडातून निघत आहे. काही माजी, तर काही विद्यमान सदस्यांच्या आशा यामुळे पल्लवीत झाल्याने याशिवाय आता सर्वांनाच रान मोकळे असल्याने यंदाची निवडणूक चांगलीच रंगणार असल्याचे दिसून येत आहे. आता राष्ट्रीय पक्षाकडून कुणाला तिकीट मिळते, कुणाला अपक्ष मैदानात उतरावे लागते, यावरही बरीच गणिते अवलंबून राहणार आहे.इच्छुक उमेदवारांनी फोडले फटाकेअंजनगाव सुर्जी नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर होताच शहरात काही इच्छुक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. आता ही निवडणूक सर्वांसाठी मोकळी झाली. तेव्हा आता कुणीही रिंगणात उतरू शकणार असल्याचा आनंद कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व्यक्त केला.सन २००२ नंतर दुसऱ्यांदा प्रयोगनगराध्यक्ष जनतेतून निवडण्याचा हा प्रयोग यापूर्वी सन २००२ मध्ये करण्यात आला. त्यावेळी काँग्रेस पक्षाचे कमलकांत लाडोळे हे जनतेतून निवडून आले होते. आता सुद्धा जनतेतूनच त्यांच्या नावाची चर्चा जोरात असल्याची दिसून येत आहे. त्यामुळे पुन्हा त्यांनाच लॉटरी लागेल काय, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.