शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

आंबिया बहरातील संत्र्याच्या तडणीला अवकाळीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

शेतकऱ्यांनी आंबिया बहराची संत्री घेण्याकरिता बागांची मशागत करून १ डिसेंबरपासून बागा तडणीवर सोडल्या. १० ते १५ जानेवारीपासून बागामध्ये रासायनिक खते फेकून व झाडावर फवारणी करून पाणी देण्याला सुरुवात केली जाते. मात्र, बागांना तडण बसण्याअगोदरच अवकाळी पावसाने मधातच हजेरी लावल्यामुळे संत्राफुटीचे स्वप्न पाहणाºया शेतकऱ्यांच्या स्वप्नावर विरजण पडले.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : पथ्रोट पंचक्रोशीत स्वप्नावर विरजण

लोकमत न्यूज नेटवर्कपथ्रोट : २०१९ च्या शेवटच्या दिवशीच अचलपूर तालुक्यात पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे आंबिया बहराचे पीक घेण्याकरिता तडणीवर सोडलेल्या संत्राबागांना पुन्हा पावसाचा तडाखा बसला. आंबिया बहराचे संत्रा पीक तडण तुटल्यामुळे धोक्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आंबिया बहराची संत्री घेण्याकरिता बागांची मशागत करून १ डिसेंबरपासून बागा तडणीवर सोडल्या. १० ते १५ जानेवारीपासून बागामध्ये रासायनिक खते फेकून व झाडावर फवारणी करून पाणी देण्याला सुरुवात केली जाते. मात्र, बागांना तडण बसण्याअगोदरच अवकाळी पावसाने मधातच हजेरी लावल्यामुळे संत्राफुटीचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावर विरजण पडले.अचलपूर तालुक्यातील पथ्रोट, परसापूर, धामणगाव गढी, बहिरम, भिलोणा, एकलारा, शहानूर, रामापूर, हरम, खानजमानगर आदी गावांमध्ये आंबिया बहाराची संत्री घेतली जातात. संत्रा पीक हे शेतकऱ्यांचे ठोक व एकरकमेचे पीक आहे. आंबिया बहराच्या संत्रा पिकावर शेतकऱ्यांची वर्षभराच्या व्यवहाराची दारोमदार आहे. तूर, कपाशी, सोयाबीन आदी पिके वाढती मजुरी, बाजारात मालाला मिळणारा कमी दर, रासायनिक खताचे, औषधाचे वाढलेले दर, दिवसेंदिवस येणारी नैसर्गिक आपत्ती आदी बाबी लक्षात घेता परवडणारी नाही. त्यामुळे संत्रा पिकांकडे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त कल दिसून येत आहे आणि ज्या भागात भरपूर पाणी आहे, त्याच भागात जास्तीत जास्त शेतकरी संत्रा पीक घेतात.तुरीलाही फटकामंगळवारी सकाळी आलेल्या पावसामुळे शेतकऱ्याच्या तुरीचे पीक दवामुळे खराब झाले. तसेच कापसाच्या पिकावरही लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे कापसाचे पिकही हातातून गेले. दिवसेंदिवस येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून, लागलेला पैसा पिकामधून निघत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारीच होत चालल्याचे चित्र स्पष्ट आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस