शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
2
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
3
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
4
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
5
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
6
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
7
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
8
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
9
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
10
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; मुख्यमंत्री योगींनी व्यक्त केले दुःख
11
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
12
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
13
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
14
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
15
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
16
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
17
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
18
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
19
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
20
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
Daily Top 2Weekly Top 5

अंदाज चुकला अन्‌ घात झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 05:00 IST

मृतांच्या हाता-पायाची अवस्था बघून हळहळ व्यक्त केली. करंट लागताच त्यांची पादत्राणे निसटली. रक्ताने माखलेले त्यांच्या पायाचे ठसे घटनेची भयावहता दर्शविणारे होते.  घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.  ११ केव्हीची ती विद्युत वाहिनी कॉटन मार्केट फीडरवरून कठोरा गावाकडे जाते. त्यावरील विद्युत खांबांची उंची नऊ मीटर असून जमीन व विद्युत वाहिनीमधील अंतर सुमारे २० फूट आहे. पोलीस पंचनाम्यानुसार ‘त्या’ शिडीची उंची २० फुट ५ इंच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुपारी १२ वाजताची वेळ. कठोरा मार्गावरील पी.आर. एज्युकेशन इन्स्टिट्यूटसमोरील मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लोखंडी शिडी सरकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘त्या’ चौघांना  अवघ्या काही क्षणात    मृत्यू आपल्याला कवेत घेईल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांचा अंदाज चुकला अन्‌ घात झाला. वीज प्रवाहाची तीव्रता इतकी भयावह होती की, त्या धक्क्यामुळे ते चौघेही काळे निळे पडले. त्यांच्या हात व पायाचा अक्षरश: कोळसा झाला. शिडी पकडून असलेले त्यांच्या हाताची त्वचा भाजून निघाली. त्यामुळे त्यांचा संपर्क शिडीशी तुटला आणि ते चौघेही माग कोसळले. काहींनी हा अपघात ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.मृतांच्या हाता-पायाची अवस्था बघून हळहळ व्यक्त केली. करंट लागताच त्यांची पादत्राणे निसटली. रक्ताने माखलेले त्यांच्या पायाचे ठसे घटनेची भयावहता दर्शविणारे होते.  घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.  ११ केव्हीची ती विद्युत वाहिनी कॉटन मार्केट फीडरवरून कठोरा गावाकडे जाते. त्यावरील विद्युत खांबांची उंची नऊ मीटर असून जमीन व विद्युत वाहिनीमधील अंतर सुमारे २० फूट आहे. पोलीस पंचनाम्यानुसार ‘त्या’ शिडीची उंची २० फुट ५ इंच आहे. वाहिनीखालून शिडी अलगद जाईल, असे त्यांना दूरवरून वाटले. मात्र, त्यांचा अंदाज जिवावर बेतला.

घरातील कर्ता गमावल्याने आईचा आक्रोशसंजय दंडनाईक हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी होते. ते भूषण आणि चेतन ही दोन मुले व पत्नीसह येथील आदर्श नेहरूनगरात भाड्याच्या घरात २० वर्षांपासून राहत होते. पोटे एज्युकेशन इंस्टिट्यूटमध्ये शिपाई पदावर कंत्राटी कर्मचारी होते. घरातील कर्ती व्यक्ती गेल्याने नातवासह सुनेचे कसे होणार, असा टाहो फोडत आक्रोश त्या करीत होत्या. 

टाकळी जहागीर येथील ते दोघे अविवाहितटाकळी जहागीर येथील अक्षय साहेबराव सावरकर, गोकुल वाघ हे अविवाहित होते. संसार फुलण्याआधीच त्यांचा बळी गेल्याने नातेवाइकांचा आक्रोश झाला. त्यांच्या घरात ते कमावते असल्याने आई-वडिलांचा आधार गेल्याचे दु:ख व्यक्त होत आहे.

व्यवस्थापनाकडून कुटुंबांना मदत, नोकरीमृताच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ लाख रुपये  सानुग्रह मदत देण्यात येईल, शिवाय त्या चारही कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती पी.आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे किशोर देशमुख यांच्याकडून देण्यात आली.

चार महिन्याच्या मुलाचे छत्र हरपले शिराळा येथील प्रशांत शेलोरकर यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना चार महिन्याचा मुलगा आहे. कुटुंबाची धुरादेखील प्रशांतच्या खांद्यावर होती. त्यामुळे शेलोरकर कुटुंब कोलमडले आहे.  चारही मृतांच्या कुटुंबीयांवर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

पालकमंत्र्यांचे निर्देशरंगरंगोटीच्या कामादरम्यान शिडी उचलताना वीजतारेच्या स्पर्शाने चौघांचा मृत्यू झाला. याचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत तातडीने चौकशी करून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मोबदला मिळण्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे. यादरम्यान त्यांचे प्रतिनिधी अरविंद माळवे यांनी इर्विन रुग्णालयाला भेट दिली.

खासदारांची एन्ट्रीखासदार नवनीत राणा यांनी इर्विनमध्ये शवविच्छेदन कक्षात मृतांच्या नातेवाइकांची भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त नातेवाइकांनी ज्यांच्या संस्थेत ही घटना घडली, ते का येत नाही, ते आल्याशिवाय आम्ही मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. बराच वेळ खा. नवनीत राणा यांनी त्यांच्या नातेवाइकांना धीर देत सांत्वन केले. 

 

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू