शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अंदाज चुकला अन्‌ घात झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 05:00 IST

मृतांच्या हाता-पायाची अवस्था बघून हळहळ व्यक्त केली. करंट लागताच त्यांची पादत्राणे निसटली. रक्ताने माखलेले त्यांच्या पायाचे ठसे घटनेची भयावहता दर्शविणारे होते.  घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.  ११ केव्हीची ती विद्युत वाहिनी कॉटन मार्केट फीडरवरून कठोरा गावाकडे जाते. त्यावरील विद्युत खांबांची उंची नऊ मीटर असून जमीन व विद्युत वाहिनीमधील अंतर सुमारे २० फूट आहे. पोलीस पंचनाम्यानुसार ‘त्या’ शिडीची उंची २० फुट ५ इंच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दुपारी १२ वाजताची वेळ. कठोरा मार्गावरील पी.आर. एज्युकेशन इन्स्टिट्यूटसमोरील मुख्य प्रवेशद्वाराबाहेर लोखंडी शिडी सरकविण्याच्या प्रयत्नात असलेल्या ‘त्या’ चौघांना  अवघ्या काही क्षणात    मृत्यू आपल्याला कवेत घेईल, याची पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांचा अंदाज चुकला अन्‌ घात झाला. वीज प्रवाहाची तीव्रता इतकी भयावह होती की, त्या धक्क्यामुळे ते चौघेही काळे निळे पडले. त्यांच्या हात व पायाचा अक्षरश: कोळसा झाला. शिडी पकडून असलेले त्यांच्या हाताची त्वचा भाजून निघाली. त्यामुळे त्यांचा संपर्क शिडीशी तुटला आणि ते चौघेही माग कोसळले. काहींनी हा अपघात ‘याची देही याची डोळा’ अनुभवला.मृतांच्या हाता-पायाची अवस्था बघून हळहळ व्यक्त केली. करंट लागताच त्यांची पादत्राणे निसटली. रक्ताने माखलेले त्यांच्या पायाचे ठसे घटनेची भयावहता दर्शविणारे होते.  घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.  ११ केव्हीची ती विद्युत वाहिनी कॉटन मार्केट फीडरवरून कठोरा गावाकडे जाते. त्यावरील विद्युत खांबांची उंची नऊ मीटर असून जमीन व विद्युत वाहिनीमधील अंतर सुमारे २० फूट आहे. पोलीस पंचनाम्यानुसार ‘त्या’ शिडीची उंची २० फुट ५ इंच आहे. वाहिनीखालून शिडी अलगद जाईल, असे त्यांना दूरवरून वाटले. मात्र, त्यांचा अंदाज जिवावर बेतला.

घरातील कर्ता गमावल्याने आईचा आक्रोशसंजय दंडनाईक हे मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथील रहिवासी होते. ते भूषण आणि चेतन ही दोन मुले व पत्नीसह येथील आदर्श नेहरूनगरात भाड्याच्या घरात २० वर्षांपासून राहत होते. पोटे एज्युकेशन इंस्टिट्यूटमध्ये शिपाई पदावर कंत्राटी कर्मचारी होते. घरातील कर्ती व्यक्ती गेल्याने नातवासह सुनेचे कसे होणार, असा टाहो फोडत आक्रोश त्या करीत होत्या. 

टाकळी जहागीर येथील ते दोघे अविवाहितटाकळी जहागीर येथील अक्षय साहेबराव सावरकर, गोकुल वाघ हे अविवाहित होते. संसार फुलण्याआधीच त्यांचा बळी गेल्याने नातेवाइकांचा आक्रोश झाला. त्यांच्या घरात ते कमावते असल्याने आई-वडिलांचा आधार गेल्याचे दु:ख व्यक्त होत आहे.

व्यवस्थापनाकडून कुटुंबांना मदत, नोकरीमृताच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ लाख रुपये  सानुग्रह मदत देण्यात येईल, शिवाय त्या चारही कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्यात येणार असल्याची माहिती पी.आर. पोटे पाटील ग्रुप ऑफ एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचे किशोर देशमुख यांच्याकडून देण्यात आली.

चार महिन्याच्या मुलाचे छत्र हरपले शिराळा येथील प्रशांत शेलोरकर यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना चार महिन्याचा मुलगा आहे. कुटुंबाची धुरादेखील प्रशांतच्या खांद्यावर होती. त्यामुळे शेलोरकर कुटुंब कोलमडले आहे.  चारही मृतांच्या कुटुंबीयांवर या घटनेमुळे दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

पालकमंत्र्यांचे निर्देशरंगरंगोटीच्या कामादरम्यान शिडी उचलताना वीजतारेच्या स्पर्शाने चौघांचा मृत्यू झाला. याचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत तातडीने चौकशी करून मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मोबदला मिळण्याच्या दृष्टीने तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे. यादरम्यान त्यांचे प्रतिनिधी अरविंद माळवे यांनी इर्विन रुग्णालयाला भेट दिली.

खासदारांची एन्ट्रीखासदार नवनीत राणा यांनी इर्विनमध्ये शवविच्छेदन कक्षात मृतांच्या नातेवाइकांची भेट घेत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त नातेवाइकांनी ज्यांच्या संस्थेत ही घटना घडली, ते का येत नाही, ते आल्याशिवाय आम्ही मृतदेह उचलणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. बराच वेळ खा. नवनीत राणा यांनी त्यांच्या नातेवाइकांना धीर देत सांत्वन केले. 

 

टॅग्स :electricityवीजDeathमृत्यू