शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
3
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
4
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
5
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
6
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
7
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
8
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
9
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
10
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
11
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
12
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
13
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
14
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
15
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
16
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
17
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
18
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
19
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
20
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

बाधित शेतकरी वाऱ्यावर ; प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कंपनीचेच चांगभले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 14, 2024 12:52 IST

Amravati : शेतकरी, राज्य, केंद्र शासनाचा ३८२.३४ कोटींचा प्रीमियम जमा, ४८.७७ कोटींची भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एक रुपयात सहभाग असल्याने गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा योजनेत विक्रमी ५.१२ लाख शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला. यासाठी - पीक विमा कंपनीकडे ३८२.३४ कोटींचा हप्ता जमा करण्यात आला. हंगामात सर्वच पिकांचे नुकसान झाले. - त्यातुलनेत कंपनीद्वारा फक्त ४८.७७ कोटींचा परतावा बाधित शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे बाधित शेतकरी वाऱ्यावर अन् कंपनीचेच उखळ पांढरे झाल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत एक रुपयात पीक विमा योजनेत शेतकरी सहभागाची घोषणा केली. त्यामुळे गतवर्षीच्या खरीप हंगामात या योजनेला उच्चांकी ५.१० लाख शेतकऱ्यांचा सहभाग लाभला. त्यातच जुलै ते ऑगस्टदरम्यान ११ महसूल मंडळांत पावसाचा २० ते २५ दिवस खंडदेखील राहिला होता व त्यापूर्वी जुलैमधील अतिवृष्टीनेही पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय सोयाबीन काढणीच्या काळातही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या सर्व आपत्तीसाठी बाधित १.१२ लाखावर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रारी नोंदविल्या होत्या. यातील बहुतांश तक्रारी कंपनीद्वारा तांत्रिक कारणांचा आधार घेत फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे पीक विमा कंपनीवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे, यासाठी शेतकरी पीक विम्यात सहभाग घेतात. मात्र, एकदा शेतकरी सहभाग लाभल्यानंतर त्या शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जात असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले आहे. कृषी विभागाने वारंवार पत्र दिले, एफआयआर करण्याची तंबी दिली, त्यानंतरही फारसा फरक पडल्याचे दिसत नाही.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पावसाअभावी बाधित ४१ महसूल मंडळांसाठी काढलेली अधिसूचना पीक विमा कंपनीद्वारा ग्राह्य न धरता त्यावर अपील केले होते. विभागीय आयुक्तांसह राज्याच्या कृषी सचिवांनी पीक विमा कंपनीचे आक्षेप फेटाळत चांगलेच फटकारले होते. केंद्र शासनाकडे अपील केल्यानंतर कंपनीचे आक्षेप ग्राह्य धरण्यात आले होते.

कंपनीद्वारा भरपाई नैसर्गिक आपत्ती - ३७.५० कोटीप्रतिकूल हवामान - ९.३८ कोटी काढणीपश्चात नुकसान - २.८३ कोटी आतापर्यंत परतावा - ४८.७७ कोटी

कंपनीकडे प्रीमियम जमाशेतकरी सहभाग हिस्सा -  ५.१० लाखराज्य शासन हिस्सा - २२४.६० कोटीकेंद्र शासन हिस्सा  - १५७.६९ कोटी एकूण प्रीमियम जमा - ३८२.३४ कोटी 

तालुकानिहाय प्रीमियम अन् मिळालेला परतावाअचलपूर तालुक्यात २०.४६ कोटींचा प्रीमियम (२ कोटी परतावा), अमरावती २९.७८ कोटी (३.१९ कोटी), अंजनगाव २७.५२ कोटी (१०.५७ कोटी), भातकुली २९.८१ कोटी (३.९८ कोटी), चांदूर रेल्वे २५.९१ कोटी (३.१२ कोटी), चांदूरबाजार २४,१७ कोटी (२.९० कोटी), चिखलदरा १०.६२ कोटी (३० लाख), दर्यापूर ४६.७७ कोटी (२.१४ कोटी), धामणगाव ३२.०३ कोटी (२.०२ कोटी), धारणी १७.८२ कोटी (१.८१ कोटी), मोर्शी ३०.५८ कोटी (४.९९ कोटी), नांदगाव ४४.७५ कोटी (१०.९१ कोटी), तिवसा २४.९७ कोटी (८४ लाख) व वरुड १७.३६ कोटी प्रीमियम जमा, ९४ लाखांची भरपाई देण्यात आली. 

पीक विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या पूर्वसूचना, यासह शेतकऱ्यांच्या तक्रारी या अनुषंगाने १७ मे रोजी बैठक बोलाविली आहे. पीक विमा भरपाईसाठी कंपनीकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेतीAmravatiअमरावती