शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

बाधित शेतकरी वाऱ्यावर ; प्रधानमंत्री पीक विमा योजनेत कंपनीचेच चांगभले

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: May 14, 2024 12:52 IST

Amravati : शेतकरी, राज्य, केंद्र शासनाचा ३८२.३४ कोटींचा प्रीमियम जमा, ४८.७७ कोटींची भरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एक रुपयात सहभाग असल्याने गतवर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा योजनेत विक्रमी ५.१२ लाख शेतकऱ्यांचा प्रतिसाद लाभला. यासाठी - पीक विमा कंपनीकडे ३८२.३४ कोटींचा हप्ता जमा करण्यात आला. हंगामात सर्वच पिकांचे नुकसान झाले. - त्यातुलनेत कंपनीद्वारा फक्त ४८.७७ कोटींचा परतावा बाधित शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे बाधित शेतकरी वाऱ्यावर अन् कंपनीचेच उखळ पांढरे झाल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाने मोठा गाजावाजा करीत एक रुपयात पीक विमा योजनेत शेतकरी सहभागाची घोषणा केली. त्यामुळे गतवर्षीच्या खरीप हंगामात या योजनेला उच्चांकी ५.१० लाख शेतकऱ्यांचा सहभाग लाभला. त्यातच जुलै ते ऑगस्टदरम्यान ११ महसूल मंडळांत पावसाचा २० ते २५ दिवस खंडदेखील राहिला होता व त्यापूर्वी जुलैमधील अतिवृष्टीनेही पिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय सोयाबीन काढणीच्या काळातही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या सर्व आपत्तीसाठी बाधित १.१२ लाखावर शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रारी नोंदविल्या होत्या. यातील बहुतांश तक्रारी कंपनीद्वारा तांत्रिक कारणांचा आधार घेत फेटाळून लावल्या आहेत. त्यामुळे पीक विमा कंपनीवर नियंत्रण कुणाचे, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य लाभावे, यासाठी शेतकरी पीक विम्यात सहभाग घेतात. मात्र, एकदा शेतकरी सहभाग लाभल्यानंतर त्या शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले जात असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत. पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले आहे. कृषी विभागाने वारंवार पत्र दिले, एफआयआर करण्याची तंबी दिली, त्यानंतरही फारसा फरक पडल्याचे दिसत नाही.

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पावसाअभावी बाधित ४१ महसूल मंडळांसाठी काढलेली अधिसूचना पीक विमा कंपनीद्वारा ग्राह्य न धरता त्यावर अपील केले होते. विभागीय आयुक्तांसह राज्याच्या कृषी सचिवांनी पीक विमा कंपनीचे आक्षेप फेटाळत चांगलेच फटकारले होते. केंद्र शासनाकडे अपील केल्यानंतर कंपनीचे आक्षेप ग्राह्य धरण्यात आले होते.

कंपनीद्वारा भरपाई नैसर्गिक आपत्ती - ३७.५० कोटीप्रतिकूल हवामान - ९.३८ कोटी काढणीपश्चात नुकसान - २.८३ कोटी आतापर्यंत परतावा - ४८.७७ कोटी

कंपनीकडे प्रीमियम जमाशेतकरी सहभाग हिस्सा -  ५.१० लाखराज्य शासन हिस्सा - २२४.६० कोटीकेंद्र शासन हिस्सा  - १५७.६९ कोटी एकूण प्रीमियम जमा - ३८२.३४ कोटी 

तालुकानिहाय प्रीमियम अन् मिळालेला परतावाअचलपूर तालुक्यात २०.४६ कोटींचा प्रीमियम (२ कोटी परतावा), अमरावती २९.७८ कोटी (३.१९ कोटी), अंजनगाव २७.५२ कोटी (१०.५७ कोटी), भातकुली २९.८१ कोटी (३.९८ कोटी), चांदूर रेल्वे २५.९१ कोटी (३.१२ कोटी), चांदूरबाजार २४,१७ कोटी (२.९० कोटी), चिखलदरा १०.६२ कोटी (३० लाख), दर्यापूर ४६.७७ कोटी (२.१४ कोटी), धामणगाव ३२.०३ कोटी (२.०२ कोटी), धारणी १७.८२ कोटी (१.८१ कोटी), मोर्शी ३०.५८ कोटी (४.९९ कोटी), नांदगाव ४४.७५ कोटी (१०.९१ कोटी), तिवसा २४.९७ कोटी (८४ लाख) व वरुड १७.३६ कोटी प्रीमियम जमा, ९४ लाखांची भरपाई देण्यात आली. 

पीक विमा कंपनीने अपात्र ठरविलेल्या पूर्वसूचना, यासह शेतकऱ्यांच्या तक्रारी या अनुषंगाने १७ मे रोजी बैठक बोलाविली आहे. पीक विमा भरपाईसाठी कंपनीकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.- राहुल सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेतीAmravatiअमरावती