शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस विद्युत पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:58 IST

रबी ओलिताच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसा उजेडी विद्युत पुरवठा होतो. उर्वरित वेळेत रात्री विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना ओलितासाठी जिवाची जोखीम पत्करावी लागत आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची दैना : कांदा, गहू, फळबागेच्या ओलितासाठी जिवाची जोखीम

अमोल धवसे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : रबी ओलिताच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसा उजेडी विद्युत पुरवठा होतो. उर्वरित वेळेत रात्री विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना ओलितासाठी जिवाची जोखीम पत्करावी लागत आहे.सध्या कांदा लागवण सुरू आहे. गहू व फळबागेला ओलितासाठी दिवसा फक्त तीन दिवस कृषिपंपाला विद्युत पुरवठा होतो. आठवड्यातील हेच तीन दिवसांत शेतकऱ्यांना सुसह्य जातात. थंडीचे दिवस असल्याने रात्रीचे ओलीत करणे मात्र शेतकºयांच्या जिवावर बेतणारे ठरत आहे. रात्रीचे ओलीत करण्यासाठी एक तर मजूर मिळत नाही, तर दुसरीकडे वन्यप्राण्यांची धास्ती राहते. विद्युत वाहिनीतील दोष दुरुस्त दिवसाच करावी लागते. त्यासाठी विद्युत पुरवठा बंद करावा लागतो.तालुक्यात १६६० हेक्टर क्षेत्रात गव्हाची पेरणी झाली आहे. २१ हेक्टर क्षेत्रात कांदा लागवण झाली आहे. ८१५ हेक्टर क्षेत्रात संत्रा, मोसंबी, लिंबू पिकाच्या फळबागा आहेत. त्याचे ओलीत बहुतेक शेतकरी दिवसाच करतात. त्यामुळे विद्युत पुरवठ्याचे दिवस वाढवून द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.विहिरीला पाणी नाही. ती उपशावर आली आहे. रब्बी पिकांना पाण्याची गरज आहे. त्यासाठी महावितरणने दिवसा विद्युत पुरवठा करण्यासाठी दिवस वाढवून द्यावेत.- देविदास सुने,शेतकरी, नांदगाव खंडेश्वरशेतात संत्राझाडे आहेत. त्यावर मृग बहर आहे. त्याला पाण्याची नितांत गरज आहे. दिवसा फक्त तीन दिवस विद्युत पुरवठा होत असल्याने शेतातील ओलीत होत नाही.- सुखदेवराव शिरभाते,शेतकरी, नांदगाव खंडेश्वर