शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

पूल अर्धवट; तीन दिवसांपासून महामार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 05:00 IST

तीन वेळा मार्ग वाहून गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता बंद असूनही कंत्राटदार आणि अधिकारी सुस्त आहेत. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. तीव्र असंतोष निर्माण झाला असून कंत्राटदारावर कारवाईची मागणी बुलंद करण्यात आली आहे. आमला ते पुलगाव हा सैनिकी मार्ग आहे. नुकताच केंद्रशासनाने या रस्त्याच्या नूतनीकरणास मंजुरी दिली.

ठळक मुद्देपर्यायी मार्ग गेला वाहून : वाहनचालकांची कसरत, कुणालाही सोयरसुतूक नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड/ राजुराबाजार : वरुड ते राजूराबाजार मार्गावरील चुडामण नदीवरील पुलाचे काम रखडले आहे. वाहतुकीकरिता नदीतून डायव्हर्शन काढण्यात आले. मात्र संततधार पावसाने तब्बल तीनदा तो पर्यायी मार्ग वाहून गेला. चार दिवसानंतरही त्या मार्गावरील वाहतूक सुरळित झालेली नाही.तीन वेळा मार्ग वाहून गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता बंद असूनही कंत्राटदार आणि अधिकारी सुस्त आहेत. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. तीव्र असंतोष निर्माण झाला असून कंत्राटदारावर कारवाईची मागणी बुलंद करण्यात आली आहे. आमला ते पुलगाव हा सैनिकी मार्ग आहे. नुकताच केंद्रशासनाने या रस्त्याच्या नूतनीकरणास मंजुरी दिली. त्याअनुषंगाने रुंदीकरण, सिमेंटीकरण व पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. या रस्त्यावरील वरुड ते राजूराबाजार दरम्यान चुडामण नदीवर असलेल्या पुलाचे बांधकाम सुरु आहे . पुलाचे काम करीत असताना पर्यायी वळण रस्ता काढण्याची तरतूद अंदाजपत्रकात केलेली असते आणि तोही पक्कया स्वरुपाचा असला पाहिजे. वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी कंत्राटदाराने घेणे अनिवार्य असते. परंतु कंत्राटदार मात्र पैसे वाचविण्याकरिता खडीकरण किंवा माती टाकून वळण रस्ते करून मोकळे होतात. नाहीतर डांबराचा पातळ थर टाकतात.जड वाहतुकीने तो रस्ता अपघातास आमंत्रण देतो. असेच वरुड राजूराबाजार पुलाच्या वळण रस्त्याबाबत झाले आहे. रस्त्यावर निकृष्ट साहित्य आणि दोन तीन टाकाऊ पाईप टाकण्यात आले. त्यात उन्हाळा कसाबसा निघून गेला. परंतु पावसाळ्यात हा वळण रस्ता तीन वेळा पाईपसह वाहून गेला. २९ आॅगस्ट रोजी वाहून गेल्यानंतर २ सप्टेबरच्या सायंकायपर्यंत त्या पर्यायी वळण रस्त्याची कुठलिही डागडुजी झालेली नव्हती. वरुड मार्गे राजूरबाजार- आर्वी, वर्धा वाहतूक बंद आहे. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. स्थानिक आमदार देवेंद्र भूयार यांनी याप्रकरणी लक्ष घालून पर्यायी रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, पुलाचे बांधकाम विनाविलंब व्हावे, यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वाहनधारकांमध्ये असंतोषराजूराबाजार, हातुर्णा गाडेगाव, वाघाला, पवनीकडे होणारी वाहतूक बंद आहे. वाहनधारकांना फत्तेपूर, उदापुर, डवरगाव मार्गे येणे जाणे करावे लागत आहे. तीन दिवसांपासून डायव्हर्शन वाहून गेल्याने रस्ता बंद असून कंत्राटदार आणि अधिकारी सुस्त आहे. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा जीवावर उठल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस