शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

पूल अर्धवट; तीन दिवसांपासून महामार्ग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 05:00 IST

तीन वेळा मार्ग वाहून गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता बंद असूनही कंत्राटदार आणि अधिकारी सुस्त आहेत. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. तीव्र असंतोष निर्माण झाला असून कंत्राटदारावर कारवाईची मागणी बुलंद करण्यात आली आहे. आमला ते पुलगाव हा सैनिकी मार्ग आहे. नुकताच केंद्रशासनाने या रस्त्याच्या नूतनीकरणास मंजुरी दिली.

ठळक मुद्देपर्यायी मार्ग गेला वाहून : वाहनचालकांची कसरत, कुणालाही सोयरसुतूक नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड/ राजुराबाजार : वरुड ते राजूराबाजार मार्गावरील चुडामण नदीवरील पुलाचे काम रखडले आहे. वाहतुकीकरिता नदीतून डायव्हर्शन काढण्यात आले. मात्र संततधार पावसाने तब्बल तीनदा तो पर्यायी मार्ग वाहून गेला. चार दिवसानंतरही त्या मार्गावरील वाहतूक सुरळित झालेली नाही.तीन वेळा मार्ग वाहून गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता बंद असूनही कंत्राटदार आणि अधिकारी सुस्त आहेत. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर उठला आहे. तीव्र असंतोष निर्माण झाला असून कंत्राटदारावर कारवाईची मागणी बुलंद करण्यात आली आहे. आमला ते पुलगाव हा सैनिकी मार्ग आहे. नुकताच केंद्रशासनाने या रस्त्याच्या नूतनीकरणास मंजुरी दिली. त्याअनुषंगाने रुंदीकरण, सिमेंटीकरण व पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. या रस्त्यावरील वरुड ते राजूराबाजार दरम्यान चुडामण नदीवर असलेल्या पुलाचे बांधकाम सुरु आहे . पुलाचे काम करीत असताना पर्यायी वळण रस्ता काढण्याची तरतूद अंदाजपत्रकात केलेली असते आणि तोही पक्कया स्वरुपाचा असला पाहिजे. वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी कंत्राटदाराने घेणे अनिवार्य असते. परंतु कंत्राटदार मात्र पैसे वाचविण्याकरिता खडीकरण किंवा माती टाकून वळण रस्ते करून मोकळे होतात. नाहीतर डांबराचा पातळ थर टाकतात.जड वाहतुकीने तो रस्ता अपघातास आमंत्रण देतो. असेच वरुड राजूराबाजार पुलाच्या वळण रस्त्याबाबत झाले आहे. रस्त्यावर निकृष्ट साहित्य आणि दोन तीन टाकाऊ पाईप टाकण्यात आले. त्यात उन्हाळा कसाबसा निघून गेला. परंतु पावसाळ्यात हा वळण रस्ता तीन वेळा पाईपसह वाहून गेला. २९ आॅगस्ट रोजी वाहून गेल्यानंतर २ सप्टेबरच्या सायंकायपर्यंत त्या पर्यायी वळण रस्त्याची कुठलिही डागडुजी झालेली नव्हती. वरुड मार्गे राजूरबाजार- आर्वी, वर्धा वाहतूक बंद आहे. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. स्थानिक आमदार देवेंद्र भूयार यांनी याप्रकरणी लक्ष घालून पर्यायी रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, पुलाचे बांधकाम विनाविलंब व्हावे, यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.वाहनधारकांमध्ये असंतोषराजूराबाजार, हातुर्णा गाडेगाव, वाघाला, पवनीकडे होणारी वाहतूक बंद आहे. वाहनधारकांना फत्तेपूर, उदापुर, डवरगाव मार्गे येणे जाणे करावे लागत आहे. तीन दिवसांपासून डायव्हर्शन वाहून गेल्याने रस्ता बंद असून कंत्राटदार आणि अधिकारी सुस्त आहे. कंत्राटदाराचा हलगर्जीपणा जीवावर उठल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे.

टॅग्स :Rainपाऊस