शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

५२६ गावांमध्ये राजकारण तापले; सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:39 IST

मार्चमध्ये निवडणूक

अमरावती : जिल्ह्यात जून २०२० पर्यंत मुदत संपणाऱ्या ५२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची घोषणा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. मार्चमध्ये सरपंच आरक्षणाची सोडत निघेल. या पार्श्वभूमीवर मतदार यादीचा कार्यक्रम सुरू असल्याने गावागावांतील राजकारण तापले आहे. 

जिल्हा निवडणूक विभागाच्या माहितीनुसार, ५२६ ग्रामपंचायतींमध्ये १४ लाख ४३ हजार ६८३ लोकसंख्या आहे. यामध्ये २ लाख ४८ हजार ९८३ अनुसूचित जाती व ३ लाख ३७ हजार ७९१ अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.  १९७२ प्रभागांमध्ये ५३१९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.  अनुसूचित जाती प्रवर्गात राखीव १००० जागांपैकी ५३१ महिलांसाठी राखीव आहेत.

अनुसूचित जमातीसाठी १२०१ जागा राखीव आहेत. यापैकी ६१० जागा महिलांसाठी, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी एकूण ११७० जागा आहेत. यामध्ये ६११ जागा महिलांसाठी आहेत. सर्वसाधारण प्रवर्गात १९४८ सदस्यपदे आहेत. यापैकी ११९४ महिलांसाठी राखीव असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. 

अमरावती तालुक्यात ४६,  तिवसा २६, भातकुली ३४, चांदूर रेल्वे २८, धामणगाव रेल्वे ५३, नांदगाव खंडेश्वर ४४, दर्यापूर ४८, धारणी ३२, चिखलदरा १७, चांदूर बाजार ४१, अचलपूर ४२, मोर्शी ३९, वरूड ४१ व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. जिल्ह्यातील ६३ टक्के गावांत निवडणूक 

जिल्ह्यातील ८३९ पैकी ५२६ ग्रामपंचायती म्हणजेच ६३ टक्के गावांमध्ये निवडणूक ज्वर तापला आहे. सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा होत आहे. मार्च महिन्यात गावगावांत रणधुमाळी उडणार आहे.

टॅग्स :AmravatiअमरावतीElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्र