शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

ही तर 'पोलीस ट्रायल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

शासनाच्यावतीने ते तपाससंस्था या नात्याने काम करतात. प्रामाणिक प्रयत्नांनंतर प्रकरणात आढळलेली तथ्ये न्यायासनासमोर सादर करतात. हेच त्यांचे कर्तव्य आहे. प्रकरण खरे आहे की खोटे, हे ठरविण्याचा अधिकार पोलिसांना नाहीच. तपासादरम्यान तसे वक्तव्यही ते करू शकत नाहीत. त्यातून पोलिसांच्या भूमिकेबाबत संभ्रम आणि अविश्वास निर्माण होण्याचा धोका संभवतो.

ठळक मुद्देमाय-लेकींवर बलात्कार : फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १६४ (अ)

प्रकरण खोटे असल्याचे वक्तव्य पोलीस अधिकारी उघडपणे करीत आहेत. त्याच मानसिकतेतून ते या प्रकरणाकडे बघतही आहेत. अंगावर गणवेश आणि खांद्यांवर राजमुद्रा किंवा स्टार धारण केल्यावर तपासात व्यक्तिगत मते आणण्याचा पोलिसांना अधिकार शिल्लक राहत नाही. शासनाच्यावतीने ते तपाससंस्था या नात्याने काम करतात. प्रामाणिक प्रयत्नांनंतर प्रकरणात आढळलेली तथ्ये न्यायासनासमोर सादर करतात. हेच त्यांचे कर्तव्य आहे. प्रकरण खरे आहे की खोटे, हे ठरविण्याचा अधिकार पोलिसांना नाहीच. तपासादरम्यान तसे वक्तव्यही ते करू शकत नाहीत. त्यातून पोलिसांच्या भूमिकेबाबत संभ्रम आणि अविश्वास निर्माण होण्याचा धोका संभवतो. प्रकरण खोटे असेल, तर तपासातून तसे न्यायासनाला पटवून देण्याची मुभा पोलिसांना आहेच. त्यानुसार न्याय-निर्णयदेखील होऊ शकेल. परंतु, तपासापूर्वीच प्रकरण खोटे की खरे, हे जाहीर करून न्यायासनाचे अधिकार 'पोलीस ट्रायल'च्या माध्यमातून वापरून अमरावती ग्रामीण पोलिसांना काय संदेश द्यावयाचा आहे?तर गुन्हे का केले दाखलघटना घडल्यावर फिर्याद मागणाऱ्या माय-लेकींना पोलिसांनी दाद दिली नाही. वारंवार अनेक अधिकाऱ्यांकडे गेल्यावरही गुन्हे दाखल न करणाºया पोलिसांनी त्याच प्रकरणात, त्याच गुन्ह्यांसाठी तब्बल ५० दिवसांनी कलमे दाखल केली. मुद्दा असा उपस्थित होतो की, प्रकरण खरे नव्हतेच, तर इतक्या उशिरा गुन्हे दाखल करण्याचे कारण काय?जस्टीस जे.एस. वर्मा समितीही कठोरदिल्लीतील २०१२ च्या गँगरेपनंतर भारताचे सरन्यायाधीश राहिलेले जे.एस. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बलात्कारविरोधी कायद्यात अभ्यासाअंती सुधारणा सूचविण्यात आल्यात. केंद्र शासनाचे तत्कालीन महाधिवक्ता गोपाल सुब्रह्मण्यम आणि न्यायमूर्ती लीला सेठ हे या समितीेचे सदस्य होते. या समितीने तब्बल ६३१ पानांचा अहवाल तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना सादर केला. महिलांवरील लैंगिक, शारीरिक अत्याचार आणि त्यासंबंधीची पोलिसांची कर्तव्ये याबाबत या अहवालातही कठोर भूमिका घेण्यात आली आहे. महिला अत्याचाराबाबत शासन, कायदे, न्यायालये कठोर आणि संवेदनशील असताना, पोलीस यंत्रणेने संशय निर्माण करणारी भूमिका का वठवावी?

 

टॅग्स :Policeपोलिस