शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

पोलीस मृत्यूच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:10 IST

पंचक्रोशीतील ७० गावांच्या सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी लिलया पेलणारी स्थानिक पोलीस यंत्रणाच सर्व सुविधायुक्त घराअभावी पंगू झाल्याचे चित्र आहे. नजीकच्या शिरखेड पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाची दुरवस्था बघता ते आणि त्यांचे कुटूंब भीतीदायक वातावरणात जगत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देनिवासस्थाने जीर्ण : पोलीस अधीक्षकांनी द्यावे लक्ष

श्रीकृष्ण मालपे।लोकमत न्यूज नेटवर्कनेरपिंगळाई : पंचक्रोशीतील ७० गावांच्या सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी लिलया पेलणारी स्थानिक पोलीस यंत्रणाच सर्व सुविधायुक्त घराअभावी पंगू झाल्याचे चित्र आहे. नजीकच्या शिरखेड पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाची दुरवस्था बघता ते आणि त्यांचे कुटूंब भीतीदायक वातावरणात जगत असल्याचे वास्तव आहे.शिरखेड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची निवासस्थानांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ती घरे एवढी जीर्ण झाली आहेत, की कधी कोसळतील हे सांगता येत नाही. त्यामुळे जनतेचे रक्षकच कुटुंबासमवेत मृत्यूच्या छायेत राहत असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. शिरखेड पोलिस ठाण्याची स्थापना ब्रिटीश काळात सन १८१४ मध्ये झाली. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली. १०० वर्षानंतर ती निवासस्थाने राहण्यायोग्य नाहीत. ती निवासस्थाने क्षतिग्रस्त झाल्याने पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय जीव मुठित धरुन राहत आहेत. या निवासस्थानाच्या भिंती जीर्ण झाल्यात. ठिकठिकाणी त्या पोखरल्या. शिरखेड पोलीस ठाण्यात ५५ कर्मचारी असताना ही पडकी निवासस्थाने केवळ १४ आहेत. त्यामुळे येथील बरेचसे कर्मचारी बाहेरगावावरून ये-जा करतात. तसेच येथे स्वच्छतागृह कमव पेयजलाची पूरेसी व्यवस्था नाही. घरावरील कवेलू व भिंती केव्हा कोलमडतील, याची काहीही शाश्वती नाही. वसाहत जीर्ण झाल्याने पोलीस अपडाऊन करतात.पुनर्निर्माणाचे प्रस्ताव धूळखातपोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या इमारती नव्याने बांधण्यात याव्यात, असे प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागास पाठविण्यात आले. त्यानुसार दरवर्षी अंदाजपत्रक सादर केले जाते. सर्वेक्षण करुन आढावा घेतला जातो. मात्र नविन बांधकामाचा मुहूर्त साधला जात नाही. विशेष म्हणजे शिरखेडचे मूळ रहिवासी असलेले साहेबराव तट्टे यांनी सलग १० वर्षे तिवसा मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र त्यांच्या कार्यकाळात पोलीस वसाहतीच्या पुनर्निर्माण होऊ शकले नाही.साबांविकडे नव्या वसाहतीसाठी प्रस्ताव पाठविला ही वसाहत राहण्यायोग्य नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. अनेक कुटूंब स्व:जबाबदारीवर येथे राहतात.- सुरेंद्र अहेरकरठाणेदार, शिरखेड