शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
3
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
4
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
5
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
6
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
7
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
8
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
9
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
10
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
11
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
12
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
13
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
14
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
15
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
16
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
17
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
19
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
20
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

पोलीस मृत्यूच्या छायेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:10 IST

पंचक्रोशीतील ७० गावांच्या सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी लिलया पेलणारी स्थानिक पोलीस यंत्रणाच सर्व सुविधायुक्त घराअभावी पंगू झाल्याचे चित्र आहे. नजीकच्या शिरखेड पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाची दुरवस्था बघता ते आणि त्यांचे कुटूंब भीतीदायक वातावरणात जगत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देनिवासस्थाने जीर्ण : पोलीस अधीक्षकांनी द्यावे लक्ष

श्रीकृष्ण मालपे।लोकमत न्यूज नेटवर्कनेरपिंगळाई : पंचक्रोशीतील ७० गावांच्या सुमारे दीड लाखांपेक्षा अधिक नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी लिलया पेलणारी स्थानिक पोलीस यंत्रणाच सर्व सुविधायुक्त घराअभावी पंगू झाल्याचे चित्र आहे. नजीकच्या शिरखेड पोलिसांच्या शासकीय निवासस्थानाची दुरवस्था बघता ते आणि त्यांचे कुटूंब भीतीदायक वातावरणात जगत असल्याचे वास्तव आहे.शिरखेड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांची निवासस्थानांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ती घरे एवढी जीर्ण झाली आहेत, की कधी कोसळतील हे सांगता येत नाही. त्यामुळे जनतेचे रक्षकच कुटुंबासमवेत मृत्यूच्या छायेत राहत असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. शिरखेड पोलिस ठाण्याची स्थापना ब्रिटीश काळात सन १८१४ मध्ये झाली. त्यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात आली. १०० वर्षानंतर ती निवासस्थाने राहण्यायोग्य नाहीत. ती निवासस्थाने क्षतिग्रस्त झाल्याने पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटूंबिय जीव मुठित धरुन राहत आहेत. या निवासस्थानाच्या भिंती जीर्ण झाल्यात. ठिकठिकाणी त्या पोखरल्या. शिरखेड पोलीस ठाण्यात ५५ कर्मचारी असताना ही पडकी निवासस्थाने केवळ १४ आहेत. त्यामुळे येथील बरेचसे कर्मचारी बाहेरगावावरून ये-जा करतात. तसेच येथे स्वच्छतागृह कमव पेयजलाची पूरेसी व्यवस्था नाही. घरावरील कवेलू व भिंती केव्हा कोलमडतील, याची काहीही शाश्वती नाही. वसाहत जीर्ण झाल्याने पोलीस अपडाऊन करतात.पुनर्निर्माणाचे प्रस्ताव धूळखातपोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या निवासस्थानांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे या इमारती नव्याने बांधण्यात याव्यात, असे प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सार्वजनिक बांधकाम विभागास पाठविण्यात आले. त्यानुसार दरवर्षी अंदाजपत्रक सादर केले जाते. सर्वेक्षण करुन आढावा घेतला जातो. मात्र नविन बांधकामाचा मुहूर्त साधला जात नाही. विशेष म्हणजे शिरखेडचे मूळ रहिवासी असलेले साहेबराव तट्टे यांनी सलग १० वर्षे तिवसा मतदारसंघाचे नेतृत्व केले. मात्र त्यांच्या कार्यकाळात पोलीस वसाहतीच्या पुनर्निर्माण होऊ शकले नाही.साबांविकडे नव्या वसाहतीसाठी प्रस्ताव पाठविला ही वसाहत राहण्यायोग्य नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. अनेक कुटूंब स्व:जबाबदारीवर येथे राहतात.- सुरेंद्र अहेरकरठाणेदार, शिरखेड