शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

'लोटाबहाद्दरां'वर आता पोलीस कारवाई

By admin | Updated: January 24, 2015 00:02 IST

शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने आता उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तिंविरूध्द दंडात्मक पोलीस कारवाईचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.

गजानन मोहोड अमरावतीशासनाच्या स्वच्छ भारत अभियानाला पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीने आता उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तिंविरूध्द दंडात्मक पोलीस कारवाईचे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे ‘लोटाबहाद्दरां’वर फास आवळला जाणार, हे नक्की. स्वच्छतेच्या दृष्टीने हे क्रांतीकारी पाऊल ठरणार आहे. घटनेच्या कलम ५१-अ नुसार पर्यावरण स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. सामान्य जनतेचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी हगणदारीमुक्ती गरजेची असल्याने शासनाद्वारे ‘स्वच्छ भारत अभियान’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांची कठोर अंमलबजावणी करताना जाणीवपूर्वक उघड्यावर शौचास बसणाऱ्या व्यक्तिंविरुद्ध दंडात्मक पोलीस कारवाई करण्यात येईल.विभागीय आयुक्तांनी जि.प.च्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत.जिल्ह्यात वैयक्तिक शौचालयांची व्याप्ती केवळ ४७ टक्के आहे. ही व्याप्ती वाढविणे अत्यंत आवश्यक असल्याचे आयुक्तांनी निक्षून सांगितले. यानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १४ (ज-५) नुसार वैयक्तिक शौचालयाचा वापर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यास अनर्ह करण्याची तरतूद आहे. या तरतुदीचा वापर जिल्ह्यांतर्गत कारवाईसाठी सुरू आहे. हागणदारीमुक्त गाव मोहिमेंतर्गत पोलीस यंत्रणेचा सहभाग घेण्यासाठी गृह विभागाने १२ आॅगस्ट २००८ रोजी निर्गमित परिपत्रकाचा वापर करून मुंबई पोलीस अधिनियमांतर्गत फौजदारी कारवाईचे निर्देश आहेत.ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ४९ अंतर्गत ग्रापंचा कारभार चालविण्यासाठी विविध ग्रामविकास समिती स्थापण्याची तरतूद आहे. या समितीमध्ये गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश करण्याच्या सूचना आहेत. या समित्यांमध्ये सदस्यांची निवड करताना सदस्याला शौचालय वापराचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. ग्रापं, पं.स स्तरावर गुडमॉर्निंग पथकांद्वारे गस्त घालण्यात येणार आहे.