शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

चमक येथे तेरवीच्या जेवणातून २५ जणांना विषबाधा; चारजण गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 17:56 IST

दिवसाचे हेच तेरवीचे जेवण अनेकांनी सायंकाळी घेतले. त्यापैकी बहुतांश नागरिकांना रविवारी सकाळपासून उल्ट्या होण्यास सुरुवात झाली. पण दिवसभर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, त्रास वाढल्याने सायंकाळी नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली.

ठळक मुद्देदहा जणांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार

अचलपूर (अमरावती) : दिवसा झालेल्या तेरवीच्या कार्यक्रमाचे जेवण सायंकाळी करणाऱ्या अनेक नागरिकांना सकाळपासून विषबाधा झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. एकूण १४ नागरिकांना उपचारासाठी अचलपूर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले. यात दोन बालकांचा समावेश आहे.

अचलपूर तालुक्यातील चमक येथे १९ मार्च रोजी हरिभाऊ चरोडे यांच्या तेरवीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला पाहुण्यांसह सहा गावांतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. दिवसाचे हेच तेरवीचे जेवण अनेकांनी सायंकाळी घेतले. त्यापैकी बहुतांश नागरिकांना रविवारी सकाळपासून उल्ट्या होण्यास सुरुवात झाली. पण दिवसभर त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, त्रास वाढल्याने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात धाव घेतली. चार नागरिकांची प्रकृती जास्तच बिघडल्याने त्यांना अमरावती येथे उपचाराकरिता रेफर करण्यात आले. यात निर्मला बुरंगे, प्रल्हादराव जाणे, गोपाल चरोडे, शीला हरी चरोडे यांचा समावेश आहे.

उपजिल्हा रुग्णालयात १० दाखल

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दिनेश बुरंगे, योगश्री दिनेश बुरंगे, रमेश जानराव इंदूरकर, मंगला श्रीकृष्ण चरोडे, श्रीकृष्ण चरोडे, गंगाबाई आनंदराव बहुरूपी, निर्मला बुरंगे, ललिता विनोद चरोडे, स्नेहा विनोद चरोडे, सुषमा गोवर्धन चरोडे, गजानन देविदास चरोडे, स्वस्तिक दिनेश बुरंगे हे उपचार घेत आहेत.

अनेकांवर खासगीत उपचार

यातील अनेक नागरिक खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांवर डॉ. प्रसन्नकुमार सुदाम, डॉ. दीपाली जाधव, डॉ. शैलेश देवकर यांनी उपचार केले. अन्नातून विषबाधा झाल्याने या नागरिकांना ओकाऱ्या होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाHealthआरोग्यfoodअन्न