शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पे अँड पार्कच्या नावावर नागरिकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:04 IST

शहराचा विकास आणि सौंदर्यीकरणासाठी एकात्मिक रस्ते विकास योजना (आयआरडीपी) मध्ये दोन उड्डाणपूल बांधले. एका तपानंतर महापालिका स्थायी समितीच्या आमसभेत या उड्डाणपुलाखाली पे अँड पार्कचा प्रायोगिक तत्त्वावर निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देअमरावतीकर त्रस्त : उड्डाणपुलाचे स्वामित्व महापालिकेचे नाही तर निर्णय कसा?

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराचा विकास आणि सौंदर्यीकरणासाठी एकात्मिक रस्ते विकास योजना (आयआरडीपी) मध्ये दोन उड्डाणपूल बांधले. एका तपानंतर महापालिका स्थायी समितीच्या आमसभेत या उड्डाणपुलाखाली पे अँड पार्कचा प्रायोगिक तत्त्वावर निर्णय घेण्यात आला. त्यापोटी महापालिकेला महिन्याकाठी ३३ हजार रुपये उत्पन्न मिळणार आहे. सहा महिन्यांसाठी एका संस्थेला पे अँड पार्कचे कंत्राट सोपविले आहे. मात्र, पे अँड पार्कची गरज होती काय, असा सवाल आता अमरावतीकर विचारत आहेत. मालवीय चौक ते कुथे स्टॉपपर्यंत बांधण्यात आलेला उड्डाणपूलच जर मनपाचा नाही, तर त्याखाली करण्यात येत असलेल्या सामान्यांकडून पार्किंगची वसुली कशासाठी, असा प्रश्नही पुढे येत आहे.पे अँड पार्कचे कंत्राट हे राजीक अहमद नामक कंत्राटदाराच्या संस्थेला देण्यात आले आहे. एका तपापूर्वी शहरात ११४ कोटींचे कर्ज घेऊन दोन उड्डाणपूल उभारण्यात आले. त्यापैकी ११० कोटी नागरिकांकडून पेट्रोल-डिझेलच्या अधिभारातून वसूल केले आहेत. त्यामुळे आता पे अँड पार्कचे औचित्य काय, हा प्रश्नही चर्चेला आला आहे. सहा महिन्यांच्या या ‘प्रायोगिक’ कंत्राटाला एकाही नगरसेवकाने विरोध करून नये, हे आचर्यच आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) कडून अद्याप पूल महानगरपालिकेला हस्तांतर झाला नाही. त्याचे दायित्व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. पूल झाल्यानंतर त्या ठिकाणी पार्किंगसाठी व्यवस्था होणार आहे, असे प्रशासनाने आश्वासित केले होते. पे अँड पार्कचा तेव्हा कुठलाही विषय चर्चेत नव्हता, हे विशेष.असे आकारले जात आहेत दरचारचाकी वाहनासाठी तीन तासांचे १० रुपये, तर कारसाठी सहा तासांचे २० रुपये आणि १२ तासांचे ४० रुपये द्यावे लागतात. दुचाकी वाहन तीन तास ठेवायचे असल्यास ५ रुपये मोजावे लागतात. सहा तासांसाठी १० रुपये व १२ तासांसाठी २० रुपये घेण्यात येते. या ठिकाणी एकच व्यक्ती दहा वेळा येत असेल, तर प्रत्येक वेळीस त्याला दाम मोजावा लागतो. त्यामुळे नागरिक हैराण झाले असून, विशेषता महिलांना त्रास सर्वाधिक होत आहे. ही वसुली कंत्राटदाराने ठेवलेल्या कामगारांकडून करण्यात येते. वसुलीसाठी १५ युवकांची नेमणूक करण्यात आली असून, प्रत्येकाला महिन्याकाठी सात हजार रूपये वेतन देण्यात येत असल्याची माहिती आहे.प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग यशस्वी झाल्यास पुढील करारलोकांना दिसेल असे मोठे फलक या ठिकाणी लावण्यात आलेले नाही. बाहेरगावावरून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना वाहन लावल्यानंतर कंत्राटदाराकडील कामगार येऊन पैसे मागतो तेव्हाच त्यांना कळते की, वाहन पार्क करण्याचे पैसे द्यावे लागतात. दररोज अनेक नागरिकांचे कामगारांसोबत वादसुद्धा झडतात. तरीही त्याला न जुमानता या ठिकाणी पठाणी वसुली करण्यात येत आहे. या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाल्यास पुढील ११ महिन्यांसाठी अधिकृत करार करण्यात येणार आहे.आयुक्त म्हणतात, शिस्त लावण्यासाठी पे अँड पार्कपे अँड पार्क संदर्भात महानगरपालिका आयुक्त हेमंत पवार यांच्याशी चर्चा केली असता, महानगरपालिकेचे उत्पन्न वाढविण्याचा कुठलाही उद्देश नाही, तर शहराची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून नागरिकांची वाहने शिस्तीत लागावी, वाहनचालकांना शिस्त लागावी म्हणून पे अँड पार्कचा निर्णय स्थायी समितीच्या आमसभेत घेण्यात आलेला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांनीही पत्र दिले आहे.शहरातील लोकांची लूट नव्हे का?कुठलेही कारण नसताना या ठिकाणी पे अँड पार्क प्रायोगिक तत्त्वावर राबविणे ही अमरावतीच्या जनतेची अक्षरश: लूट आहे. हा निर्णय चुकीचा असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेवक बबन रडके यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही उड्डाणपुलासाठी शासनाने दिलेले ११० कोटींचे कर्ज नागरिकांनी पेट्रोल-डिझेलवर एक रुपया अधिभारातून परत केले आहे. त्यामुळे आमसभा घेऊन पे अँड पार्कचा करार रद्द करावा, अशी अमरावतीकरांची मागणी आहे.महापालिकेच्या आमसभेमध्ये पे अँड पार्कसाठी मान्यता देण्यात आली होती. सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर पे अँड पार्क राबविण्यात येणार आहे. यावर लोकांचे काय अभिप्राय येतात, त्यानुसार पुनर्विचार करण्यात येणार आहे.- सुनील देशमुख,आमदार, अमरावती.