शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

रंगाच्या टाकाऊ बकेटीत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:54 IST

सुबोध हायस्कूलच्या इमारतीला यावर्षी रंगरंगोटी केली गेली. यात रंगाच्या ९२ बकेट शाळेला लागल्या. या रिकाम्या झालेल्या बकेटा मागणाऱ्यांची संख्या वाढली. विकायला काढल्या, तर पाच ते दहा रुपयांहून अधिक द्यायला कुणी तयार नव्हते. दुसरीकडे झाडे लावायला कुंड्या विकत आणायच्या, तर दीडशे-दोनशे रुपयांना एकेक कुंडी. यावर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वीणा भारतीय यांनी त्यावर तोडगा काढला.

ठळक मुद्देवॉटर बॅगमधील शिल्लक पाणी झाडांना : उपक्रमशील शिक्षिकेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सुबोध हायस्कूलमध्ये रंगाच्या टाकाऊ प्लास्टिक बकेटीत शोभिवंत झाडे उगवण्यात आली आहेत. यामुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडली तसेच प्लास्टिकचा खच कमी झाला आहे.सुबोध हायस्कूलच्या इमारतीला यावर्षी रंगरंगोटी केली गेली. यात रंगाच्या ९२ बकेट शाळेला लागल्या. या रिकाम्या झालेल्या बकेटा मागणाऱ्यांची संख्या वाढली. विकायला काढल्या, तर पाच ते दहा रुपयांहून अधिक द्यायला कुणी तयार नव्हते. दुसरीकडे झाडे लावायला कुंड्या विकत आणायच्या, तर दीडशे-दोनशे रुपयांना एकेक कुंडी. यावर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वीणा भारतीय यांनी त्यावर तोडगा काढला. या बकेटांमध्ये वृक्षारोपण करून त्या वर्गासमोर व्हरांड्यात ठेवण्याचा उपक्रम त्यांनी सुचविला. उपक्रमाला शाळेतील शिक्षकांसह संस्थेनेही प्रतिसाद दिला. या बकेटांना खालून छिद्र पाडून त्यात काळी माती भरली गेली. माती भरलेल्या बकेटा वर्गांपुढे व्हरांड्यात ठेवल्या गेल्यात. यात शोभेची झाडे लावण्याकरिता अमरावतीवरून रोपे मागवल्या गेलीत. एकूण ९२ बकेटांमध्ये ही शोभेची झाडे बहरली आहेत. प्रत्येक वर्गासमोरील या झाडांची, बकेटांची जबाबदारी त्या-त्या वर्गातील विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे.शाळा सुटल्यानंतर घरी परत जाताना वॉटर बॅगमधील शिल्लक पाणी बाहेर न फेकता या झाडांना टाकण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या गेल्यात. यात विद्यार्थ्यांनी त्या झाडांची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्या वॉटर बॅगमधील शिल्लक पाण्यावर ती झाडे जगवल्या जात आहेत.बकेटीतील या हिरव्याकंच झाडांमुळे शालेय वातावरणाला एक वेगळाच पर्यावरणपूरक रंग चढला आहे. संस्थेचे सचिव डॉ. अनंद भारतीय यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक सदाशिव ढोरे, पर्यवेक्षक संजय चौबे, उपक्रमशील शिक्षिका वीणा भारतीय यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या उपक्रमाला जपत आहेत. हा असा उपक्रम राबविणारी ही पहिलीच शाळा ठरली आहे. निव्वळ एकाच शाळेने नव्हे, तर जिल्हाभरातील शाळांनी हा उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा शाळा प्रशासनाने व्यक्त केली.

 

 

टॅग्स :environmentपर्यावरण