शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

रंगाच्या टाकाऊ बकेटीत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:54 IST

सुबोध हायस्कूलच्या इमारतीला यावर्षी रंगरंगोटी केली गेली. यात रंगाच्या ९२ बकेट शाळेला लागल्या. या रिकाम्या झालेल्या बकेटा मागणाऱ्यांची संख्या वाढली. विकायला काढल्या, तर पाच ते दहा रुपयांहून अधिक द्यायला कुणी तयार नव्हते. दुसरीकडे झाडे लावायला कुंड्या विकत आणायच्या, तर दीडशे-दोनशे रुपयांना एकेक कुंडी. यावर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वीणा भारतीय यांनी त्यावर तोडगा काढला.

ठळक मुद्देवॉटर बॅगमधील शिल्लक पाणी झाडांना : उपक्रमशील शिक्षिकेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : सुबोध हायस्कूलमध्ये रंगाच्या टाकाऊ प्लास्टिक बकेटीत शोभिवंत झाडे उगवण्यात आली आहेत. यामुळे शाळेच्या सौंदर्यात भर पडली तसेच प्लास्टिकचा खच कमी झाला आहे.सुबोध हायस्कूलच्या इमारतीला यावर्षी रंगरंगोटी केली गेली. यात रंगाच्या ९२ बकेट शाळेला लागल्या. या रिकाम्या झालेल्या बकेटा मागणाऱ्यांची संख्या वाढली. विकायला काढल्या, तर पाच ते दहा रुपयांहून अधिक द्यायला कुणी तयार नव्हते. दुसरीकडे झाडे लावायला कुंड्या विकत आणायच्या, तर दीडशे-दोनशे रुपयांना एकेक कुंडी. यावर शाळेतील उपक्रमशील शिक्षिका वीणा भारतीय यांनी त्यावर तोडगा काढला. या बकेटांमध्ये वृक्षारोपण करून त्या वर्गासमोर व्हरांड्यात ठेवण्याचा उपक्रम त्यांनी सुचविला. उपक्रमाला शाळेतील शिक्षकांसह संस्थेनेही प्रतिसाद दिला. या बकेटांना खालून छिद्र पाडून त्यात काळी माती भरली गेली. माती भरलेल्या बकेटा वर्गांपुढे व्हरांड्यात ठेवल्या गेल्यात. यात शोभेची झाडे लावण्याकरिता अमरावतीवरून रोपे मागवल्या गेलीत. एकूण ९२ बकेटांमध्ये ही शोभेची झाडे बहरली आहेत. प्रत्येक वर्गासमोरील या झाडांची, बकेटांची जबाबदारी त्या-त्या वर्गातील विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे.शाळा सुटल्यानंतर घरी परत जाताना वॉटर बॅगमधील शिल्लक पाणी बाहेर न फेकता या झाडांना टाकण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या गेल्यात. यात विद्यार्थ्यांनी त्या झाडांची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्या वॉटर बॅगमधील शिल्लक पाण्यावर ती झाडे जगवल्या जात आहेत.बकेटीतील या हिरव्याकंच झाडांमुळे शालेय वातावरणाला एक वेगळाच पर्यावरणपूरक रंग चढला आहे. संस्थेचे सचिव डॉ. अनंद भारतीय यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापक सदाशिव ढोरे, पर्यवेक्षक संजय चौबे, उपक्रमशील शिक्षिका वीणा भारतीय यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी या उपक्रमाला जपत आहेत. हा असा उपक्रम राबविणारी ही पहिलीच शाळा ठरली आहे. निव्वळ एकाच शाळेने नव्हे, तर जिल्हाभरातील शाळांनी हा उपक्रम राबवावा, अशी अपेक्षा शाळा प्रशासनाने व्यक्त केली.

 

 

टॅग्स :environmentपर्यावरण