शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
2
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
3
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
4
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
5
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
6
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
7
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
8
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
9
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
10
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
11
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
12
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
13
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
14
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
15
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
16
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
17
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
18
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
19
Shakib Al Hasan ने सेल्फीसाठी आलेल्या चाहत्याची मान धरली, मारण्यासाठी हात वर केला, Video Viral 
20
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही

निंभोरा लाहे येथे तीन हेक्टरमध्ये झाडे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 10:27 PM

नजीकच्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने गतवर्षी १३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावलेली तीन हेक्टरमधील सुमारे साडे तीन हजार झाडे जळाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, ही घटना सामाजिक वनीकरणाने दाबण्याचा प्रयत्न केला असता ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली.

ठळक मुद्देसामाजिक वनीकरणाचे दुर्लक्ष : साडे तीन हजार झाडे जळाली; पाच ते सहा लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : नजीकच्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने गतवर्षी १३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावलेली तीन हेक्टरमधील सुमारे साडे तीन हजार झाडे जळाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, ही घटना सामाजिक वनीकरणाने दाबण्याचा प्रयत्न केला असता ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली.गतवर्षी जुलै महिन्यात निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने ८ ते १० हेक्टर परिसरात वृक्ष लागवड मोहिम राबविली. वर्षभरात ही रोपे तीन फुटापर्यंत पोहचली. दरम्यान तीन हेक्टरमध्ये वृक्ष लागवडीचे रोपे बहरली. ही रोपे जगविण्यासाठी सामाजिक वनीकरणाने प्रयत्न सुद्धा केले. तथापि, रोपे तीन फूट उंचीचे आणि गवत पाच फुटांच्यावर पोहचले. त्यामुळे रविवारी अचानक लागलेल्या आगीमुळे गवतासह तीन फुट लांबीचे झाडे जळून खाक झाली. ज्यावेळी सामाजिक वनीकरणाच्या वृक्ष लागवडीचे रोपे जळत होती, त्यावेळी सामाजिक वनीकरणाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी नव्हते, असे प्रत्यक्षदर्शनींचे म्हणने आहे. काही ग्रामस्थांनी जंगलात आग लागल्याची माहिती बडनेरा येथील महापालिका झोन कार्यालयाला दिली. त्यानंतर अग्निशमनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. परंतु, आग नियंत्रणात येईस्तोवर सामजिक वनीकरणाची झाडे गवतासह जळून खाक झाली होती. महापालिका अग्निशमन कर्मचाऱ्यांनी बंबाद्वारे आग विझविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. जिवंत झाडांभोवती गवत वाढले असताना ते काढण्यात आले नाही. त्यामुळे गवतासह लाखो रुपयांची झाडेसुद्धा आगीचे लक्ष्य ठरली.साडे तीन हजार झाडे जळाल्याचा अंदाज आहे. ही झाडे १०० टक्के जगली होती. मात्र, आग कोणी, कशाने लागली, हे कळू शकले नाही. या आगीत पाच ते सहा लाख रूपयांची झाडे जळून खाक झाली आहे. याबाबत वरिष्ठांना कळविले आहे.- डी.बी. पवारआरएफओ, वनीकरणसामाजिक वनीकरणाने झाडांची काळजी घेतली नाही. त्यामुळे आगीत हिरवेगार तीन फुटापर्यंतची झाडे जळून खाक झाली. आग लागत असताना वनकर्मचारी कोणीही उपस्थित नव्हते. वेळीच दखल घेतली असती तर हिरवेगार झाडे वाचविता आले असते.- गणेश ढोरेग्रामस्थ, निंभोरा लाहे.