शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माता मृत्यू रोखण्यासाठी कृती आराखडा; गर्भवती महिलांना समुपदेशनाचा सल्ला देण्याच्या आरोग्य विभागाला सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 19:12 IST

देशात सर्वात कमी माता मृत्यूचे प्रमाण केरळ राज्यात असून दुसऱ्या क्रमांवर महाराष्ट्र आहे

अमरावती : राज्यातील माता मृत्यूचे प्रमाण वाढत असल्यामुळे यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. मातामृत्यू रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला असून, त्याअंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य विभागाला मातामृत्यू सनियंत्रण आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

देशात सर्वात कमी माता मृत्यूचे प्रमाण केरळ राज्यात असून दुसऱ्या क्रमांवर महाराष्ट्र आहे. जिल्ह्यातील मेळघाटमधील हे प्रमाण बरेच आहे. राज्यातील मातामृत्यूचा दर हा १ लाख प्रसूतीमागे ६७ टक्के, तर केरळ राज्याचे प्रमाण ६१ टक्के आहे. सन २०२० अखेर राज्यातील माता मृत्यूचे हे प्रमाण प्रतिलाखामागे ३० एवढे कमी करण्याचे ध्येय आरोग्य विभागाने ठेवले आहे. प्रसूतीदरम्यान वाढणारा रक्तदाब प्रसूतीपूर्व किंवा त्यानंतर होणारा रक्तस्त्राव जंतुदोष या तीन आरोग्य समस्या मातेच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचे या प्रकरणांच्या आढाव्यातून समोर येत आहे. या तीनही समस्यांतून मातेला वाचवता येऊ शकते. यातून होणारे मृत्यू टाळण्यासाठी कुटुंब कल्याण कार्यालयातर्फे आरोग्य केंद्रातील उपचार व गर्भवतींची काळजी घेण्याच्या अनुषंगाने विविध उपाययोजना करण्याचे सुचविले आहे.

मातामृत्यू कृती नियंत्रण आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले आहेत. माता मृत्यू दर कमी करण्यासाठी कुटुंब कल्याण विभागामार्फत आवश्यक कृती योजना तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार १२ आठवड्यांच्या आत गर्भवतींची नोंद करून त्यातील जोखीम ग्रस्त भागातील मातांची वेगळी नोंद करणे, त्यांच्या आरोग्य स्थितीनुसार उपचाराची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

संबंधित भागातील आशा व आरोग्य सेवकांना गर्भवतींना प्रसूतिपूर्वी ४ वेळा भेट देणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. या भेटीदरम्यान विविध तपासण्या व शारीरिक अवस्थेतील बदलाची माहिती जाणून घेऊन त्यानुसार समुपदेशन व सल्ला द्यावा आदी सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील मेळघाटात झेडपीच्या मुख्यकार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेत नियुक्त केलेल्या समितीमार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरिता नियोजन केले जात आहे.  त्यानुसार माता मृत्यू रोखण्यासाठी सीईओंच्या मार्गदर्शनात आराखडा तयार करण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाºयांनी सांगितले.

माता मृत्यू रोखण्याकरिता कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्यानुसार मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात नियोजन केले जात आहे.- दिलीप रणमले,जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :AmravatiअमरावतीMaharashtraमहाराष्ट्रhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य