शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतातून रेतीची परवानगी रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:15 IST

धारणी : जिल्ह्यातील रेती लिलाव प्रलंबित असल्याने शासकीय व खासगी बांधकामे रेतीअभावी रखडली आहेत. परप्रांतातून रेती आणताना शासनाने ५ ...

धारणी : जिल्ह्यातील रेती लिलाव प्रलंबित असल्याने शासकीय व खासगी बांधकामे रेतीअभावी रखडली आहेत. परप्रांतातून रेती आणताना शासनाने ५ फेब्रुवारी रोजी नवीन आदेश काढले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक करण्यात आली. ऑनलाइन नोंदणीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार अनेक कंत्राटदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मध्य प्रदेशातून रेती आणण्यासाठी परवानगीची मागणी केली आहे. परंतु, महिना उलटूनही त्यांना परवानगी मिळालेली नाही. ते अर्ज फेटाळण्यात आल्याची ओरड आहे.

मार्च महिन्याचा पहिला आठवडा संपुष्टात आला असताना तीन आठवड्यांमध्ये शासनाकडून दिलेल्या निर्देशानुसार आणि दिलेल्या मुदतीमध्ये बांधकाम पूर्ण करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार विविध विभागांच्या कार्यालयांकडून बांधकामाची परवानगी देण्यात आली आणि निधीचीसुद्धा तरतूद केली आहे. परंतु, रेती नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम पूर्णपणे रखडले आहे. अशातच जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन अध्यादेशानुसार अर्ज करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याने मार्च महिन्यातील विकासकामांचा निधी परत जाण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित रेतीबाबत निर्णय घेणे गरजेचे झाले आहे.

रेती लिलाव प्रक्रिया थंडबस्त्यात

नवीन शासकीय नियमानुसार थेट बांधकाम जागेवर रेतीची आवश्यकता असल्यास संबंधितांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परप्रांतातून रेती वाहतुकीसाठी परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यानुसार अनेक कंत्राटदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केले. दरम्यान, मार्च महिन्यामध्ये महसूल विभागालासुद्धा करवसुलीचे लक्ष्य असते. त्यामुळे दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यासाठी महसूलची नजर पूर्णपणे गौण खानिजांवर असते. यंदासुद्धा रेतीघाट लिलाव प्रक्रिया पूर्णत्वास गेलेली नाही.

घरकुलधारकांची कुचंबणा

शासकीय बांधकामासाठी ज्याप्रमाणे रेतीची उपलब्धता नसल्यामुळे बांधकाम रखडले, त्याचप्रमाणे घरकुल लाभार्थींनासुद्धा याचा जबर फटका बसत आहे. जवळपासच्या नदी-नाल्यांतून रेती आणण्याची परवानगी नसल्याने हजारो घरकुलांची कामे रेतीअभावी रखडली आहेत. घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी लोकांनी आपले राहते घर तोडले. मात्र, घरकुल उभारण्यास अडसर निर्माण झाल्याने त्यांच्या निवासाचा मुद्दा ज्वलंत बनला आहे.

---------------