शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पाणीवापर संस्थांचा कालबद्ध कार्यक्रम राबवा

By admin | Updated: March 17, 2016 00:17 IST

मराठवाड्यातील लातूर शहरात सुमारे २५ दिवसाला एकदा पिण्याचे पाणी येते. शहरात १८०० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो.

जिल्हाधिकारी : जलजागृती सप्ताहाचा शुभारंभअमरावती : मराठवाड्यातील लातूर शहरात सुमारे २५ दिवसाला एकदा पिण्याचे पाणी येते. शहरात १८०० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. शहरातील रिक्षाच्या संख्येपेक्षाही पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या अधिक आहे. अशी भीषण स्थिती आपल्याकडे येणार नाही असे कोणी ठामपणे सांगू शकत नाही यासाठी पाणी व्यवस्थापनाला प्राधान्य द्यावे. जलयुक्त शिवारसाठी निवडण्यात आलेल्या गावांपैकी ३-४ गावासाठी एक पाणी वापर संस्था स्थापन करावी व अशा संस्थांवर पाणी व्यवस्थापनाची जबाबदारी द्यावी. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा सदुपयोग करुन घेण्यासाठी कृषि विभागाने पाणी वापर संस्थांचा कालबद्ध कार्यक्रम हाती घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांनी दिले.जिल्ह्यात १६ ते २२ मार्चपर्यंत जलजागृती सप्ताह साजरा होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बचत भवनमध्ये जिल्ह्यातील सात सिंचन प्रकल्पाचे पाणी कलशमध्ये आणण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते कलश पूजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अधीक्षक अभियंता र.प्र.लांडेकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता घाणेकर, पोहेकर, उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी उपस्थित होते.गीत्ते म्हणाले, येणाऱ्या काळात शेतीला कालव्याद्वारे पाणी पुरवठा करण्याऐवजी पाईप लाईनने पाणी देण्याचा शासन विचार करत आहे. पाईप लाईनद्वारे पाणी दिल्यास उत्पादन क्षमता ४० वरुन ८०-९० टक्के पर्यंत कार्यक्षमता वाढते. जिल्ह्यात ठिबक, तुषार मोहिम राबविण्यासाठी २५ कोटी रुपये मंजूर झाले आहे. यावर २५ टक्के सबसिडी असून मोठ्या प्रमाणावर आॅनलाईन अर्ज प्राप्त आहे. जलसंपदा विभाग पाण्याची साठवणूक जरी करत असेल तरी पाण्याचा खरा ग्राहक कृषि विभाग आहे. या विभागाचा शेतकऱ्यांवर अधिक प्रभाव आहे यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा.अशी सूचना देखिल जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.