शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
6
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
7
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
8
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
9
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
10
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
11
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
12
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
13
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
14
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
15
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
16
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
17
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
18
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
19
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
20
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   

परप्रांतातील मजुरांवर शेतकऱ्यांची मदार

By admin | Updated: December 16, 2015 00:24 IST

बळीराजा आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी खचला आहे. लोकप्रतिनिधी किंवा विविध पक्षांच्या आश्वासनांवरून त्यांचा विश्वास उडाला आहे, ...

अचलपूर : बळीराजा आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी खचला आहे. लोकप्रतिनिधी किंवा विविध पक्षांच्या आश्वासनांवरून त्यांचा विश्वास उडाला आहे, अशी शेतकऱ्यांची स्थिती असताना शेतमजुरांच्या रूपाने त्यांचेसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. परप्रांतीय शेतमजुरांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांनाही सुगीचे दिवस आले आहे. अचलपूर तालुक्यात काही प्रमाणात नौकरदार वर्ग असला तरी येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. तालुक्याचे ६४६३०.५ हेक्टर क्षेत्रफळ आहे. शेती ५४११६ हेक्टरमध्ये केली जाते. बहुसंख्य शेतकरी सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके घेतो. संत्रा उत्पादक शेतकरी मृगबहराची व आंबा बहराची संत्रा पिके घेतो. भाजीपाल्याचेही उत्पादन अल्प शेतकरी घेत असतात. केळीचीही लागवड केली आहे. कपाशी हे पीक मोठ्या कालावधीचे व जास्त मजुरांचे आहे. पण कापूस वेचायला मजूर मिळणे कठीण झाले आहे. मजूर मिळाले तर कापूस वेचण्याचे दर ६ ते ८ रुपयांपर्यंत मागतात. त्यामुळे प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलाही शेतात कापूस वेचायला जाताना दिसतात. बाजारात कापसाला चांगला भाव नाही. त्यामुळे कापूस उत्पादक हैराण झाले आहेत.शेतात कापूस मोठ्या प्रमाणात निघाला आहे. परंतु प्रत्येक कापूस उत्पादकांची हीच परिस्थिती असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मजूर मिळणे कठीण झाले आहे. हल्ली शासनातर्फे दारिद्र्यरेषेखालील लोकांना कमी भावाने शिधापत्रिकेवर मोठ्या प्रमाणात गहू, तांदूळ मिळत असल्यामुळे बहुसंख्य कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. घराघरांत ५ ते ६ व्यक्ती असले तरी प्रत्यक्ष काम २ ते ३ व्यक्ती करत आहे. कुटुंबाचे आरोग्य कपडे, अन्न, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आणि घर या आवश्यक गरजा भागविण्यासाठी पूर्वी कुटुंबातील प्रत्येक सदस्य मिळेल ते काम करत होता. आता त्यांचेसाठी शासकीय योजनांचा पूर आला आहे. कोणतेही कष्ट न करता या योजना लाटून नंतर विकून मौजमजा करीत प्रसंगी वरली मटक्याच्या टपरीवर रिकामा दिवस घालविण्याची मानसिकता ग्रामीण भागात वाढत आहे. याचा थेट परिणाम शेती व्यवसायावर झाला आहे. शेतात मजूर मिळत नाही, महिनेवारी येण्याचे दिवस आता संपले आहेत, मजूर मनमानी मजुरी मागतात ते काम दिवसातून २-४ तासांत उरकवून दुप्पट-तिप्पट मजुरी प्राप्त करतात. कमी वेळात थोड्या श्रमात भरपूर पैसा मिळत असल्याने ग्रामीण भागातील मजूर वर्गात व्यसनाधिनता वाढत असल्याचे दिसते. घरात खायला धान्य नाही, रहायला साधे घर नाही. परंतु मोटारसायकल, महागडे मोबाईल, गुटख्याच्या पुड्या, दारू या बाबी साध्या मजुराजवळही सर्रास आढळतात. इतर गरजा राज्य सरकार पुरवीत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी व खऱ्या कष्टकऱ्यांची गोची होत जाते. कोणी कामावर यायला तयार झाल्यास तो म्हणेल ती मजुरी व तो म्हणेल तेच काम, इतकेच नव्हे तर तो म्हणेल तेवढाच वेळ मान्य करावा लागतो त्यामुळे मजुराच्या मदतीशिवाय कोणते पीक येईल याचा विचार शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कधीकाळी समृध्द असलेल्या ग्रामीण भाग विविध योजनांमुळे व्यवसाधीन व दरिद्री होत असल्याचे दिसत आहे.