शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतातील मजुरांवर शेतकऱ्यांची मदार

By admin | Updated: December 16, 2015 00:24 IST

बळीराजा आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी खचला आहे. लोकप्रतिनिधी किंवा विविध पक्षांच्या आश्वासनांवरून त्यांचा विश्वास उडाला आहे, ...

अचलपूर : बळीराजा आधीच अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी खचला आहे. लोकप्रतिनिधी किंवा विविध पक्षांच्या आश्वासनांवरून त्यांचा विश्वास उडाला आहे, अशी शेतकऱ्यांची स्थिती असताना शेतमजुरांच्या रूपाने त्यांचेसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. परप्रांतीय शेतमजुरांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांनाही सुगीचे दिवस आले आहे. अचलपूर तालुक्यात काही प्रमाणात नौकरदार वर्ग असला तरी येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. तालुक्याचे ६४६३०.५ हेक्टर क्षेत्रफळ आहे. शेती ५४११६ हेक्टरमध्ये केली जाते. बहुसंख्य शेतकरी सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके घेतो. संत्रा उत्पादक शेतकरी मृगबहराची व आंबा बहराची संत्रा पिके घेतो. भाजीपाल्याचेही उत्पादन अल्प शेतकरी घेत असतात. केळीचीही लागवड केली आहे. कपाशी हे पीक मोठ्या कालावधीचे व जास्त मजुरांचे आहे. पण कापूस वेचायला मजूर मिळणे कठीण झाले आहे. मजूर मिळाले तर कापूस वेचण्याचे दर ६ ते ८ रुपयांपर्यंत मागतात. त्यामुळे प्रतिष्ठित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिलाही शेतात कापूस वेचायला जाताना दिसतात. बाजारात कापसाला चांगला भाव नाही. त्यामुळे कापूस उत्पादक हैराण झाले आहेत.शेतात कापूस मोठ्या प्रमाणात निघाला आहे. परंतु प्रत्येक कापूस उत्पादकांची हीच परिस्थिती असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मजूर मिळणे कठीण झाले आहे. हल्ली शासनातर्फे दारिद्र्यरेषेखालील लोकांना कमी भावाने शिधापत्रिकेवर मोठ्या प्रमाणात गहू, तांदूळ मिळत असल्यामुळे बहुसंख्य कुटुंबांचा उदरनिर्वाह सुरू आहे. घराघरांत ५ ते ६ व्यक्ती असले तरी प्रत्यक्ष काम २ ते ३ व्यक्ती करत आहे. कुटुंबाचे आरोग्य कपडे, अन्न, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आणि घर या आवश्यक गरजा भागविण्यासाठी पूर्वी कुटुंबातील प्रत्येक सदस्य मिळेल ते काम करत होता. आता त्यांचेसाठी शासकीय योजनांचा पूर आला आहे. कोणतेही कष्ट न करता या योजना लाटून नंतर विकून मौजमजा करीत प्रसंगी वरली मटक्याच्या टपरीवर रिकामा दिवस घालविण्याची मानसिकता ग्रामीण भागात वाढत आहे. याचा थेट परिणाम शेती व्यवसायावर झाला आहे. शेतात मजूर मिळत नाही, महिनेवारी येण्याचे दिवस आता संपले आहेत, मजूर मनमानी मजुरी मागतात ते काम दिवसातून २-४ तासांत उरकवून दुप्पट-तिप्पट मजुरी प्राप्त करतात. कमी वेळात थोड्या श्रमात भरपूर पैसा मिळत असल्याने ग्रामीण भागातील मजूर वर्गात व्यसनाधिनता वाढत असल्याचे दिसते. घरात खायला धान्य नाही, रहायला साधे घर नाही. परंतु मोटारसायकल, महागडे मोबाईल, गुटख्याच्या पुड्या, दारू या बाबी साध्या मजुराजवळही सर्रास आढळतात. इतर गरजा राज्य सरकार पुरवीत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी व खऱ्या कष्टकऱ्यांची गोची होत जाते. कोणी कामावर यायला तयार झाल्यास तो म्हणेल ती मजुरी व तो म्हणेल तेच काम, इतकेच नव्हे तर तो म्हणेल तेवढाच वेळ मान्य करावा लागतो त्यामुळे मजुराच्या मदतीशिवाय कोणते पीक येईल याचा विचार शेतकऱ्यांना करावा लागत आहे. कधीकाळी समृध्द असलेल्या ग्रामीण भाग विविध योजनांमुळे व्यवसाधीन व दरिद्री होत असल्याचे दिसत आहे.