शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

पितृछत्र हरविलेल्या ढोक कुटुंबाला दिला आधार

By admin | Updated: August 12, 2015 00:13 IST

'माझ्या वडिलाने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आणि आम्ही उघड्यावर आलो. अनेकांनी मदतीचा हात दिला.

मुलींची व्यथा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुढाकारवरुड : ''माझ्या वडिलाने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली आणि आम्ही उघड्यावर आलो. अनेकांनी मदतीचा हात दिला. आम्हाला घर नसते तरी चालले असते मात्र आज आमचे वडील राहिले असते तर आमच्यावर मायेचा हात राहिला असता, परंतु आज माझे बाबा नसल्याचे दु:ख आहे. अनेक आलेत, शब्दाने सांत्वना करुन निघून गेलेत. असे वाटले की सर्व शब्दांचा खेळ असतो. बोलण्यापुरते सर्वच असतात. परंतु बाबा गेल्यावर सख्ख्या भावाप्रमाणे खा.राजू शेट्टे साहेब समर्थपणे उभे राहिले. त्यांच्या कृतीतून आम्हा भावंडांना आशेचा किरण मिळाला.'' असे म्हणत मृत शेतकऱ्याची मुलगी श्वेता हिला अश्रू आवरता आले नाही. यावेळी संपूर्ण सभामंडपातील उपस्थितांच्या डोळयात अश्रू तरळले होते. केवळ कर्जामुळे माझे वडील शिवहरी ढोक यांनी जीवनयात्रा संपविली. घरात वंशाचा दिवा नसताना पत्नी रमाबाई आणि तीन मुली डिंपल, श्वेता आणि संपदा एवढाच परिवार होता. वडील गेल्याने ढोक परिवार उघड्यावर आला. उरले ेहोते ते केवळ आईचे प्रेम. आईने काय करावे हा प्रश्न होता. शिक्षण शिकवावे की, विवाहाची तडजोड करावी. यामुळे संपूर्ण ढोक परिवार चिंताग्रस्त झाला होता. आम्हाला आज त्यांचा आधार मिळाला नसता तर आम्हीसुध्दा संपलो असतो, अशा शब्दात हुंदके देत ती रडत होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर राजकारण करणारे अनेक येऊन गेले. आप्त, स्वकीय आलेत, राजकारणी आणि आप्तेष्टांनी केवळ शाब्दिक धीर देण्यापलीकडे काहीच केले नाही तर आमदार, खासदारांनी आश्वासनांची लाखोली वाहिली. आम्ही ‘आज मिळेल, उद्या मिळेल’ या आशेने जगत होतो. एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांना कळली आणि ते सरळ खानापूरच्या दिशेने निघाले. यावेळी आम्हाला आमच्या अडचणी विचारल्या. तेव्हा मी सांगितले कर्जापायी आमचा बाप गेला. तो मिळणार नाही, घर मिळेल, शिक्षणाचा खर्चही मिळेल आणि खायला अन्नसुध्दा मिळले. परंतु माझे ेवडील परत येणार नाही, असे हुंदके देत देत सांगत असताना खा. शेट्टी, सदाभाऊ खोत, रविकांत तुपकर आणि देवेंद्र भुयार यांच्या रुपाने भावाची माया मिळाली. तेव्हा केवळ आम्हाला शौचालय आणि स्नानगृह द्या, असे सांगितले होते. पाणावलेल्या डोळ्यांनी खा.शेट्टी यांनी आम्ही पूर्ण घर बांधून देतो, असे सांगितले आणि तेव्हापासूनच घराची मुहूर्तमेढ रोवली. कुणाचा यावर विश्वास बसत नव्हता. मात्र इतरांप्रमाणे हे आश्वासन देऊन निघून न जाता दुसऱ्याच दिवशी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी घर बांधण्यास सुरुवात केली. आज शहीद क्रांतिदिनी ते घर मिळाले. याचा आनंद असला तरी मात्र आमचे वडील राहिले नाही, हे दु:ख कुणाच्याही नशिबी येऊ नये एवढीच प्रार्थना आहे. यामुळे शेतकऱ्यांवर कितीही संकट आले तरी कुणी आत्महत्या करुन जीव गमावू नका आणि आपला संसार उघड्यावर आणू नका, असे आवाहन तिने केले. यावेळी संपूर्ण सभामंडप नि:शब्द होऊन अश्रू ढाळत होता. (तालुका प्रतिनीधी )