शहरं
Join us  
Trending Stories
1
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
2
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
3
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
5
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
7
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
8
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
9
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
10
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
11
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
12
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
13
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
14
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
15
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
16
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
17
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
20
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल

प्रवाशांची मागणी मान्य! अमरावती–मुंबई विमानसेवेचं 'शेड्यूल' अखेर बदललं ! असे असेल नवीन वेळापत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:53 IST

Amravati : अलायन्स एअरच्या नव्या वेळापत्रकानुसार आठवड्यातून चार दिवस फेरी, प्रवासी हिताचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुंबई-अमरावती-मुंबई या फेरीच्या वेळापत्रकात एअर अलायन्स विमानसेवा कंपनीने २७ ऑक्टोबरपासून बदल होण्याचे संकेत आहेत. वेळापत्रकात बदलाची मागणी गत काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींसह प्रवाशांची होती. आठवड्यातून सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे चार दिवस अमरावती-मुंबई-अमरावती फेऱ्या चालणार आहे.

केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत अमरावती ते मुंबई अलायन्स एअरची विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी ही विमानसेवा आहे. बेलोरा विमानतळाहून १६ एप्रिल २०२५ रोजी अलायन्स एअरचे मुंबईकडे पहिले प्रवासी विमान झेपावले होते. दरम्यान तांत्रिक कारणांमुळे २१ ऑगस्ट २०२५ पासून अमरावती-मुंबई अलायन्स एअरची विमानसेवा बंद करण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान, विमानात तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती युद्धस्तरावर करण्यात आली. 'ऑपरेशन इश्यू'च्या नावाखाली विमानसेवा तूर्तास थांबली होती. आता अलायन्स एअरने विमानाच्या फेऱ्यांचे शेड्यूल्ड जाहीर केले आहे. त्यानुसार १ सप्टेंबरपासून मुंबई ते अमरावती विमानफेरी सुरू नियमित सुरू झाली आहे. २७ ऑक्टोबर रोजी मुंबईकडे जाणाऱ्या विमानाचे प्रवास भाडे ३१५० रुपये दर्शवित आहेत. 

एटीआर-७२ विमानाची यशस्वी चाचणी

३० मार्च २०२५ रोजी अमरावती विमानतळावर एटीआर-७२ विमानाने यशस्वी चाचणी केली. विमानतळाची पूर्ण तयारी असल्याचे दाखवणारे हे विशेष चाचणी विमान इंदूरहून अमरावतीला आले, हे विशेष.

तिसरे व्यावसायिक विमानतळ

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी अंतर्गत अमरावती विमानतळ हे राज्यातील तिसरे व्यावसायिक विमानतळ ठरले. विमानतळाने ३८९ हेक्टर क्षेत्र व्यापले. १८५० मीटर लांबी आणि ४५ मीटर रुंदीची धावपट्टी आहे. सध्या नाईट लैंडिंग सुविधा उभारण्याचे काम सुरू आहे. अमरावती विमानतळाहून हल्ली अलायन्स एअरची एटीआर ७२ मुंबई विमानसेवा सुरू आहे.

असे असेल नवे वेळापत्रक

मुंबई ते अमरावती सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी टेकऑफ होईल. अमरावती विमानतळावर सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी लैंडिंग होईल. अमरावती ते मुंबई सकाळी ९ वाजून १५ मिनिटांनी टेकऑफ होईल. मुंबई विमानतळावर सकाळी ११ वाजता लँडिंग होणार आहे.

"अमरावतीत विमान सेवा सुरु झाली होती. परंतु त्याची वेळ ही अमरावतीकरांच्या सोयीची नव्हती. त्याअनुषंगाने २१ जुलैला उड्डाणमंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेऊन वेळेत बदल आणि तिकिटीचे दर कमी करण्याची मागणी केली होती. या दोन्ही मागण्या अखेर मान्य झाल्या आहेत. त्यामुळे मुंबईचा प्रवास करणे आता अधिक सोयीचे होणार आहे."- बळवंत वानखडे, खासदार

"प्रवाशांच्या मागणीनुसार अमरावतीच्या विमान सेवेच्या वेळेतील बदलाची मागणी केंद्रीय उड्डाणमंत्री यांच्याकडे केली होती. या मागणीला अखेर यश आले आहे. आता सकाळी अमरावतीकरांना मुंबईत वेळेत पोहचता येणार आहे."- नवनीत रवी राणा, भाजप नेत्या

"अमरावती विमान सेवेचा पूर्वीची वेळ ही सोयीची नव्हती. मुंबईत पोहचायला रात्र व्हायची. त्यामुळे वेळेत बदल होण्याची मागणी होती. अलायन्स कंपनीने विमान सेवच्या वेळेत बदल करुन तो सकाळचा केल्याने नक्कीच अमरावतीकरांना फायदा होईल. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा वेळ बदलायला नको याची काळजी घेतली पाहिजे."- डॉ. सुनील देशमुख, माजी मंत्री

"अमरावती-मुंबई विमानसेवेच्या वेळापत्रकात बदलाच्या हालचाली वेगाने सुरू आहे. अलायन्स एअरकडून अधिकृत आठवड्यातून वेळापत्रकानंतर चार फेऱ्या सुरू होतील."- राजकुमार पटेल, प्रबंधक अमरावती विमानतळ

टॅग्स :AmravatiअमरावतीMumbaiमुंबईairplaneविमान