शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
2
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
3
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
4
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
5
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
6
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
7
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."
8
प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना, त्यामुळे आता स्थानकात क्यूआर तिकीट बंद; प्रशासनाचा निर्णय
9
"मराठी माणूस एकटवला, म्हणून..."; निदर्शनांवर निर्बंधांच्या मागणीवरून मिलिंद देवरांवर टीकेची झोड 
10
जीआरवर उगाच संभ्रम निर्माण केला जातोय; दगाफटका केला तर सुपडा साफ होईल, मनोज जरांगेंचा इशारा
11
ओ देवाभाऊ, तुही जात कंची? फडणवीसांवर विषारी टीका करणाऱ्यांपेक्षा त्यांच्या नेतृत्वावर...
12
घटनात्मक गुंतागुंत! एखाद्या विधिमंडळ सदस्याने चुकीचे वर्तन केले तर त्याला शिक्षा कोण देणार?
13
२३ वर्षीय प्रियकर, ८३ वर्षीय प्रेयसी! अनोखी प्रेमकहाणी आली चर्चेत; मैत्रिणीच्या घरी गेला अन्...
14
पक्ष्यांसह विमानांच्या सुरक्षेवर आता ‘बर्डगार्ड’ ठेवणार वॉच; नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती
15
३ वेळा १० थर, तरी विश्वविक्रम नाही; कुठेतरी पाणी मुरतंय, जय जवान गोविंदा पथकाचा आरोप
16
पत्नीने प्रेयसीसोबत लॉजवर पकडलं; घाबरलेल्या पतीने खाडीत मारली उडी, त्यानंतर 'असं' काही घडलं...
17
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या नवी मुंबईच्या ट्रॅव्हल ब्लॉगरची दुचाकी इंग्लंडमध्ये चोरीला
18
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
19
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
20
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?

पालक संमती देईना, आश्रमशाळेत विद्यार्थी येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:18 IST

अमरावती : आदिवासी विकास विभागाशी संलग्न शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा व सैनिकी शाळांमध्ये नववी ते बारावीचे ...

अमरावती : आदिवासी विकास विभागाशी संलग्न शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा व सैनिकी शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करावे, असे आदेश ‘ट्रायबल’ आयुक्तांचे होते. मात्र, ४ डिसेंबर उजाडला असताना, एकही आश्रमशाळा सुरू झाली नाही. पालकांच्या संमतिपत्राच्या मुद्द्यावर शिक्षकांना काहीही करता आलेले नाही, हे वास्तव आहे.

आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी नागपूर, अमरावती, ठाणे व नाशिक अंतर्गत

नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित आश्रमशाळा, वसतिगृहे १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे पत्र अपर आयुक्तांना दिले होते. एवढेच नव्हे तर व्हिडीओ कॉन्फरसिंगद्धारे पालकांचे संमतिपत्र घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. मात्र, कोरोना संसर्गाची भीती पालकांच्या मनात कायम असल्याने एकाही पालकाने संमतिपत्र लिहून दिले नाही. किंबहुना आश्रमशाळा, वसतिगृह, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा व सैनिकी निवासी शाळांमध्ये विद्यार्थी पोहोचले नाहीत. कोराेनामुळे शिक्षणात खंड पडू नये, यासाठी गणित, विज्ञान व इंग्रजी अभ्यासक्रमाचे धडे देण्याबाबत शिक्षकांनी नियोजन चालविले. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची कोविड चाचणीदेखील करण्यात आली. मात्र, पालकांची मुलांना शाळेत पाठविण्यासाठी नकारघंटा असल्याने शिक्षक, मुख्याध्यापक हैराण झाले आहे.

-------------------

नववी ते बारावीचे ३३ हजार ४९१ विद्यार्थी

अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत धारणी, अकोला, किनवट, पांढरकवडा, औरंगाबाद, कळमनुरी व पुसद या सातही प्रकल्पस्तरावर नववी ते बारावीपर्यंत ३३ हजार ४९१ विद्यार्थी आहेत. यात शासकीय

आश्रमशाळांमध्ये ११, ६२२, अनुदानित आश्रमशाळांमध्ये१६,१३९, नामांकित सीबीएसई शाळांमध्ये २२१६, नामांकित स्टेट बोर्ड शाळांमध्ये १५२६, तर सैनिकी शाळांमध्ये १९४८ विद्यार्थी आहेत.

--------------------

आश्रमशाळांमध्ये मुलांना पाठविण्यासाठी पालकांपर्यंत शिक्षक पोहोचले. मुलांची जबाबदारी घेत असाल, तरच शाळेत पाठवितो, काहीही लिहून देणार नाही, अशी बहुतांश पालकांची भूमिका आहे. पालकांमध्ये कोरोनाची धास्ती असल्यामुळेच विद्यार्थी शाळेत आलेले नाहीत.

- विनोद पाटील, अपर आयुक्त, अमरावती.

-------------

मुलांची जबाबदारी कोणीही घेण्यास तयार नाही. कोरोनाचे संकट कायम आहे. आश्रमशाळांमध्ये कोणी विद्यार्थी संक्रमित आढळल्यास उपायोजना नाही. कोविड लस आल्यानंतरच मुलांना शाळेत पाठवू, शिक्षणापेक्षा जीव महत्त्वाचा आहे.

- रमेश सयाम, पालक.