शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पालक संमती देईना, आश्रमशाळेत विद्यार्थी येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:18 IST

अमरावती : आदिवासी विकास विभागाशी संलग्न शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा व सैनिकी शाळांमध्ये नववी ते बारावीचे ...

अमरावती : आदिवासी विकास विभागाशी संलग्न शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा व सैनिकी शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करावे, असे आदेश ‘ट्रायबल’ आयुक्तांचे होते. मात्र, ४ डिसेंबर उजाडला असताना, एकही आश्रमशाळा सुरू झाली नाही. पालकांच्या संमतिपत्राच्या मुद्द्यावर शिक्षकांना काहीही करता आलेले नाही, हे वास्तव आहे.

आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी नागपूर, अमरावती, ठाणे व नाशिक अंतर्गत

नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित आश्रमशाळा, वसतिगृहे १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे पत्र अपर आयुक्तांना दिले होते. एवढेच नव्हे तर व्हिडीओ कॉन्फरसिंगद्धारे पालकांचे संमतिपत्र घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. मात्र, कोरोना संसर्गाची भीती पालकांच्या मनात कायम असल्याने एकाही पालकाने संमतिपत्र लिहून दिले नाही. किंबहुना आश्रमशाळा, वसतिगृह, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा व सैनिकी निवासी शाळांमध्ये विद्यार्थी पोहोचले नाहीत. कोराेनामुळे शिक्षणात खंड पडू नये, यासाठी गणित, विज्ञान व इंग्रजी अभ्यासक्रमाचे धडे देण्याबाबत शिक्षकांनी नियोजन चालविले. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची कोविड चाचणीदेखील करण्यात आली. मात्र, पालकांची मुलांना शाळेत पाठविण्यासाठी नकारघंटा असल्याने शिक्षक, मुख्याध्यापक हैराण झाले आहे.

-------------------

नववी ते बारावीचे ३३ हजार ४९१ विद्यार्थी

अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत धारणी, अकोला, किनवट, पांढरकवडा, औरंगाबाद, कळमनुरी व पुसद या सातही प्रकल्पस्तरावर नववी ते बारावीपर्यंत ३३ हजार ४९१ विद्यार्थी आहेत. यात शासकीय

आश्रमशाळांमध्ये ११, ६२२, अनुदानित आश्रमशाळांमध्ये१६,१३९, नामांकित सीबीएसई शाळांमध्ये २२१६, नामांकित स्टेट बोर्ड शाळांमध्ये १५२६, तर सैनिकी शाळांमध्ये १९४८ विद्यार्थी आहेत.

--------------------

आश्रमशाळांमध्ये मुलांना पाठविण्यासाठी पालकांपर्यंत शिक्षक पोहोचले. मुलांची जबाबदारी घेत असाल, तरच शाळेत पाठवितो, काहीही लिहून देणार नाही, अशी बहुतांश पालकांची भूमिका आहे. पालकांमध्ये कोरोनाची धास्ती असल्यामुळेच विद्यार्थी शाळेत आलेले नाहीत.

- विनोद पाटील, अपर आयुक्त, अमरावती.

-------------

मुलांची जबाबदारी कोणीही घेण्यास तयार नाही. कोरोनाचे संकट कायम आहे. आश्रमशाळांमध्ये कोणी विद्यार्थी संक्रमित आढळल्यास उपायोजना नाही. कोविड लस आल्यानंतरच मुलांना शाळेत पाठवू, शिक्षणापेक्षा जीव महत्त्वाचा आहे.

- रमेश सयाम, पालक.