शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
3
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
4
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
5
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
6
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
7
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
8
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
9
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
10
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
11
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
12
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
13
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
14
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
15
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
16
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
17
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
18
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
19
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
Daily Top 2Weekly Top 5

पालक संमती देईना, आश्रमशाळेत विद्यार्थी येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:18 IST

अमरावती : आदिवासी विकास विभागाशी संलग्न शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा व सैनिकी शाळांमध्ये नववी ते बारावीचे ...

अमरावती : आदिवासी विकास विभागाशी संलग्न शासकीय, अनुदानित आश्रमशाळा, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा व सैनिकी शाळांमध्ये नववी ते बारावीचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करावे, असे आदेश ‘ट्रायबल’ आयुक्तांचे होते. मात्र, ४ डिसेंबर उजाडला असताना, एकही आश्रमशाळा सुरू झाली नाही. पालकांच्या संमतिपत्राच्या मुद्द्यावर शिक्षकांना काहीही करता आलेले नाही, हे वास्तव आहे.

आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी नागपूर, अमरावती, ठाणे व नाशिक अंतर्गत

नववी ते बारावीपर्यंत प्रवेशित आश्रमशाळा, वसतिगृहे १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे पत्र अपर आयुक्तांना दिले होते. एवढेच नव्हे तर व्हिडीओ कॉन्फरसिंगद्धारे पालकांचे संमतिपत्र घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. मात्र, कोरोना संसर्गाची भीती पालकांच्या मनात कायम असल्याने एकाही पालकाने संमतिपत्र लिहून दिले नाही. किंबहुना आश्रमशाळा, वसतिगृह, नामांकित इंग्रजी माध्यम शाळा व सैनिकी निवासी शाळांमध्ये विद्यार्थी पोहोचले नाहीत. कोराेनामुळे शिक्षणात खंड पडू नये, यासाठी गणित, विज्ञान व इंग्रजी अभ्यासक्रमाचे धडे देण्याबाबत शिक्षकांनी नियोजन चालविले. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांची कोविड चाचणीदेखील करण्यात आली. मात्र, पालकांची मुलांना शाळेत पाठविण्यासाठी नकारघंटा असल्याने शिक्षक, मुख्याध्यापक हैराण झाले आहे.

-------------------

नववी ते बारावीचे ३३ हजार ४९१ विद्यार्थी

अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत धारणी, अकोला, किनवट, पांढरकवडा, औरंगाबाद, कळमनुरी व पुसद या सातही प्रकल्पस्तरावर नववी ते बारावीपर्यंत ३३ हजार ४९१ विद्यार्थी आहेत. यात शासकीय

आश्रमशाळांमध्ये ११, ६२२, अनुदानित आश्रमशाळांमध्ये१६,१३९, नामांकित सीबीएसई शाळांमध्ये २२१६, नामांकित स्टेट बोर्ड शाळांमध्ये १५२६, तर सैनिकी शाळांमध्ये १९४८ विद्यार्थी आहेत.

--------------------

आश्रमशाळांमध्ये मुलांना पाठविण्यासाठी पालकांपर्यंत शिक्षक पोहोचले. मुलांची जबाबदारी घेत असाल, तरच शाळेत पाठवितो, काहीही लिहून देणार नाही, अशी बहुतांश पालकांची भूमिका आहे. पालकांमध्ये कोरोनाची धास्ती असल्यामुळेच विद्यार्थी शाळेत आलेले नाहीत.

- विनोद पाटील, अपर आयुक्त, अमरावती.

-------------

मुलांची जबाबदारी कोणीही घेण्यास तयार नाही. कोरोनाचे संकट कायम आहे. आश्रमशाळांमध्ये कोणी विद्यार्थी संक्रमित आढळल्यास उपायोजना नाही. कोविड लस आल्यानंतरच मुलांना शाळेत पाठवू, शिक्षणापेक्षा जीव महत्त्वाचा आहे.

- रमेश सयाम, पालक.