शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत अभियानाला लागणार टाळे

By admin | Updated: May 23, 2015 00:40 IST

पंचायतराज संस्थांचे बळकटीकरणासाठी सुरू केलेल्या राजीव गांधी पंचायत समिती सशक्तीकरण अभियानाला टाळे

गंडांतर : जिल्ह्यातील पंचायत सशक्तीकरण अभियंत्यांची सेवा संपुष्टात अमरावती : पंचायतराज संस्थांचे बळकटीकरणासाठी सुरू केलेल्या राजीव गांधी पंचायत समिती सशक्तीकरण अभियानाला टाळे ठोकण्याचा निर्णय राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने घेतला आहे. राज्यातील ७५० हून अधिक अभियंत्यांच्या सेवा ३१ मे पासून संपुष्टात येणार आहे. याचा फटका अमरावती जिल्ह्यातील १९ पंचायत अभियंता आणि ९ गट अभियंत्यांना बसणार आहे. राज्यभरात सुरू असलेल्या पंचायत भवनाच्या बांधकामांनाही याची झळ पोहोचणार आहे. यावर राज्य शासनाने आतापर्यंत केलेला कोट्यवधींचा खर्चही पाण्यात जाण्याची शक्यता आहे. पंचायत राज संस्थांचे बळकटीकरणासाठी केंद्र शासनाने राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण ही योजना सुरू केली होती. त्यात ग्रामीण भागात जेथे ५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे त्या गावात पंचायत भवन बांधले जाणार होते. याशिवाय जिल्हा परिषद सदस्यांना पायाभूत प्रशिक्षण, नेतृत्व विकास, क्रांती ज्योती प्रशिक्षणाद्वारे महिलांना प्रशिक्षण आदी उपक्रम राबविले जाणार होते. मात्र मागील काँग्रेस सरकारने सुरू केलेल्या या योजनेचा यावर्षीचा निधी विद्यमान सरकारने दिला नाही.याबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सदर योजनेचा निधी पूर्णत: गोठविण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सदर योजना देखील बंद पडण्याची शक्यता त्यावेळीच व्यक्त झाली होती. त्यात आता राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण योजनतील अमरावतीसह राज्यभरातील जवळपास ७५७ अभियंत्यांनी सेवाही समाप्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे या कुुटुंबावर थेट उपासमारीची वेळ ओढवणार आहे. राज्य शासनाने २४ मार्चच्या परिपत्रकात या अभियानाचे स्वरुप बदलविण्याचे घोषित केले. मात्र आता १९ मे रोजीच्या शासन निर्णय फिरवत असेल तर राज्य पुन्हा बेरोजगारीच्या गर्तेत अडकला जाईल. या कर्मचाऱ्यांना पर्यायी नोकरीची व्यवस्था न केल्यास आंदोलनाशिवाय पर्याय नाही- शशांक निचत, गट अभियंता.एकीकडे बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या शासनाने पंचायत अभियानातील पंचायत व गट अभियंत्याचा रोजगार हिरावून घेतला. त्यामुळे शासनाने केवळ दहा दिवसांतच आमच्यावर अन्याय केला आहे या अन्यायाविरोधात दाद मागू. - कांचन बनसोड, गट अभियंता.