शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

‘प्रहार’ने वीज केंद्रावरच काढली रात्र

By admin | Updated: May 10, 2015 00:32 IST

विद्युत महावितरणाच्या रामभरोसे कारभारामुळे शुक्रवारी प्रहार कार्यकर्त्यांनी आगळेवेगळे आंदोलन पुकारून ...

तारांबळ : विद्युत महावितरणाच्या रामभरोसे कारभारासाठी आंदोलनअमरावती : विद्युत महावितरणाच्या रामभरोसे कारभारामुळे शुक्रवारी प्रहार कार्यकर्त्यांनी आगळेवेगळे आंदोलन पुकारून एमआयडीसीच्या वीज केंद्रावरच रात्र काढली. सकाळी अधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर वीज कर्मचाऱ्यांची सळो की पळोची स्थिती झाली होती. पवन नगरात शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास विद्युत महावितरणाच्या डीबीत अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. याबाबत तत्काळ विद्युत महावितरणाच्या एमआयडीसी केंद्रावर नागरिकांनी संपर्क केला. मात्र, तेथील फोन कोणीही उचलला नाही. त्यामुळे नागरिकांनी रेती टाकून आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केला होता. मात्र, तरीसुध्दा आग आटोक्यात येत नव्हती. नागरिकांनी विद्युत महावितरणाच्या अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला, मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये आणखी रोष वाढला होता. शेवटी प्रहारच्या धीरज जयस्वाल यांच्यासह सागर दिवाण, पवन मुथुड, पंकज शिंदे, कनैय्या जयस्वाल, गोलू अर्डक, रुपेश चपाटे, नितीन डगवार, सचिन शिरभाते यांच्यासह आदिंनी एमआयडीसी केंद्र गाठले. मात्र, वीज केंद्र कार्यालयात एकही कर्मचारी उपस्थित नव्हते. कार्यालयसुध्दा उघडे होते, असे प्रहार कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. एकीकडे डीबीला लागलेली आग विझण्याचे नाव घेत नव्हती तर, दुसरीकडे विद्युत कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने प्रहारचे कार्यकर्ते संप्तत झाले होते. त्यातच रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान पवन नगरातील डीबीवर स्फोट झाल्याने सर्वच परिसरातील वीज खंडित झाल्याची माहिती प्रहार कार्यकर्त्यांना मिळाली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी वीज कार्यालयातच ठिय्या मांडून अवघी रात्र तेथेच काढली. सकाळी ७.३० वाजता अधिकारी व कर्मचारी वीज कार्यालयात पोहोचल्यावर त्यांना प्रहार कार्यकर्ते झोपलेले दिसले. त्यावेळी वीज दुरुस्तीचे कार्य युध्द स्तरावर सुरु झाले. (प्रतिनिधी)पोलिसांचे प्रयत्न निष्फळरात्री वीज पुरवठा खंडित झाल्यावर प्रहार कार्यकर्ता वीज केंद्रावर पोहोचले. मात्र, तेथे एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने धीरज जयस्वाल यांनी पोलिसांनाही कळविले. पोलीस घटनास्थळी पोहचले. वीज अधिकाऱ्यांशी संपर्क केला. मात्र, आम्ही याबाबत काही करु शकत नाही, असे त्यांनी प्रहार कार्यकर्त्यांना सांगितले. - तर आम्ही आ. राणांच्या घरासमोर झोपणारवीज महावितरणाच्या भोंगळ कारभाराला नागरिक वैतागले आहेत. रात्रीची वीज खंडित झाल्यावर एकही कर्मचारी वीज कार्यालयात तक्रार घेण्यासाठी उपस्थित नसतो. तसेच फोनवरही प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे नागरिकांनी काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जर विद्युत महावितरणाचा भोंगळ कारभार आमदार रवी राणा सुधारू शकत नसतील तर यापुढे विद्युत प्रवाह खंडित झाल्यास आमदार रवी राणा यांच्या घरासमोर झोपू, असा इशारा प्रहारच्या धीरज जयस्वाल यांनी दिला आहे.