शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

इतिहासाची पाने : राज्यबंदी मोडून काढण्यासाठी बहिरम यात्रेत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:57 IST

शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा गोळीबाराने बीमोड, ते पोलिसही अखेर रडले

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : बहिरम यात्रेला शेतकऱ्यांच्या कापूस आंदोलनाचा इतिहास आहे. आंदोलनादरम्यान त्यावेळेस शेतकऱ्यांना झोडपून काढणारे, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करीत गोळीबार करणारे ते पोलिसही अखेरच्या क्षणाला रडल्याच्या आठवणी ताज्या आहेत.

आंदोलनादरम्यान शासकीय आदेश आणि कायदा व सुव्यवस्थेकरिता कर्तव्यावर असलेल्या त्या पोलिसांना लगतच्या गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनीच जेवण दिले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू गळलेत. बहिरम यात्रेचे स्वरूप बदलले असले तरी आधी ही यात्रा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची होती. ग्रामीण संस्कृतीची उधळण करीत ती बहरायची. ही यात्रा म्हणजे गावखेड्यातील गावकऱ्यांसह शेतकऱ्यांचे सुपर मार्केटच. खुला भव्य-दिव्य मॉलच.

कापूस आंदोलन

बहिरम यात्रेदरम्यान २४ जानेवारी १९७५ ला कापसाला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कापूस आंदोलन केले. ज्या प्रांतात भाव आहे, त्या प्रांतात शेतकऱ्याला कापूस विकण्याची मुभा मिळावी म्हणून हे आंदोलन उभारले गेले. याकरिता शेतकऱ्यांसह कापसाच्या शेकडो बैलबंड्या २३ जानेवारीला सायंकाळपासूनच बहिरममध्ये दाखल झाल्यात. बहिरमवरून तो कापूस मध्यप्रदेशात नेऊन विकण्याकरिता हे शेतकरी एकत्र आलेत.

महिला नेतृत्व

कापूस आंदोलनात कापूसतळणी येथील केशरबाई सिकची यांनी बैलबंडी अग्रस्थानी ठेवली. स्वतः त्या धुरीवर बसल्या आणि बंडी पुढे काढली. त्या पाठोपाठ इतरही बंड्या निघाल्यात. त्यांच्यासोबत भाऊ साबळे, दादा हावरे यांनीही आंदोलनाचे नेतृत्व केले.

पोलिस बंदोबस्त

आंदोलन मोडून काढण्याकरिता यात्रा परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता. बहिरम-बैतूल मार्गावर बैलगाड्या पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. लाठीचार्ज केला. गोळीबारही केला अन् गोंधळ उडाला.

शेतकऱ्यांवर अत्याचार

गोंधळात बंडीचे बैल पळाले. चाके तुटली. अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले. जखमी अवस्थेत ते तिथेच पडून राहिले. मी-मी म्हणणाऱ्यांनाही पोलिसांनी झोडपून काढले.

शेतकरी ठार

कापूस आंदोलनादरम्यान २४ जानेवारी १९७५ ला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रामापूर पथ्रोट येथील विठ्ठलराव किसनराव दोतोंडे ठार झाले. कुऱ्हा येथील एकनाथराव मानकर जखमी झाले होते.

श्रद्धांजली सभा

आंदोलनाच्या निमित्ताने २४ जानेवारीला शहीद शेतकरी स्मृती श्रद्धांजली दिन बहिरम येथे आयोजित करण्यात आला आहे. बहिरम कापूस आंदोलन स्मृती समितीद्वारा शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. प्रकाश साबळे आणि गोपाल भालेराव यांनी ही सभा आयोजित केली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकAmravatiअमरावती