शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

इतिहासाची पाने : राज्यबंदी मोडून काढण्यासाठी बहिरम यात्रेत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:57 IST

शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा गोळीबाराने बीमोड, ते पोलिसही अखेर रडले

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : बहिरम यात्रेला शेतकऱ्यांच्या कापूस आंदोलनाचा इतिहास आहे. आंदोलनादरम्यान त्यावेळेस शेतकऱ्यांना झोडपून काढणारे, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करीत गोळीबार करणारे ते पोलिसही अखेरच्या क्षणाला रडल्याच्या आठवणी ताज्या आहेत.

आंदोलनादरम्यान शासकीय आदेश आणि कायदा व सुव्यवस्थेकरिता कर्तव्यावर असलेल्या त्या पोलिसांना लगतच्या गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनीच जेवण दिले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू गळलेत. बहिरम यात्रेचे स्वरूप बदलले असले तरी आधी ही यात्रा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची होती. ग्रामीण संस्कृतीची उधळण करीत ती बहरायची. ही यात्रा म्हणजे गावखेड्यातील गावकऱ्यांसह शेतकऱ्यांचे सुपर मार्केटच. खुला भव्य-दिव्य मॉलच.

कापूस आंदोलन

बहिरम यात्रेदरम्यान २४ जानेवारी १९७५ ला कापसाला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कापूस आंदोलन केले. ज्या प्रांतात भाव आहे, त्या प्रांतात शेतकऱ्याला कापूस विकण्याची मुभा मिळावी म्हणून हे आंदोलन उभारले गेले. याकरिता शेतकऱ्यांसह कापसाच्या शेकडो बैलबंड्या २३ जानेवारीला सायंकाळपासूनच बहिरममध्ये दाखल झाल्यात. बहिरमवरून तो कापूस मध्यप्रदेशात नेऊन विकण्याकरिता हे शेतकरी एकत्र आलेत.

महिला नेतृत्व

कापूस आंदोलनात कापूसतळणी येथील केशरबाई सिकची यांनी बैलबंडी अग्रस्थानी ठेवली. स्वतः त्या धुरीवर बसल्या आणि बंडी पुढे काढली. त्या पाठोपाठ इतरही बंड्या निघाल्यात. त्यांच्यासोबत भाऊ साबळे, दादा हावरे यांनीही आंदोलनाचे नेतृत्व केले.

पोलिस बंदोबस्त

आंदोलन मोडून काढण्याकरिता यात्रा परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता. बहिरम-बैतूल मार्गावर बैलगाड्या पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. लाठीचार्ज केला. गोळीबारही केला अन् गोंधळ उडाला.

शेतकऱ्यांवर अत्याचार

गोंधळात बंडीचे बैल पळाले. चाके तुटली. अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले. जखमी अवस्थेत ते तिथेच पडून राहिले. मी-मी म्हणणाऱ्यांनाही पोलिसांनी झोडपून काढले.

शेतकरी ठार

कापूस आंदोलनादरम्यान २४ जानेवारी १९७५ ला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रामापूर पथ्रोट येथील विठ्ठलराव किसनराव दोतोंडे ठार झाले. कुऱ्हा येथील एकनाथराव मानकर जखमी झाले होते.

श्रद्धांजली सभा

आंदोलनाच्या निमित्ताने २४ जानेवारीला शहीद शेतकरी स्मृती श्रद्धांजली दिन बहिरम येथे आयोजित करण्यात आला आहे. बहिरम कापूस आंदोलन स्मृती समितीद्वारा शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. प्रकाश साबळे आणि गोपाल भालेराव यांनी ही सभा आयोजित केली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकAmravatiअमरावती