शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

इतिहासाची पाने : राज्यबंदी मोडून काढण्यासाठी बहिरम यात्रेत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:57 IST

शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा गोळीबाराने बीमोड, ते पोलिसही अखेर रडले

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : बहिरम यात्रेला शेतकऱ्यांच्या कापूस आंदोलनाचा इतिहास आहे. आंदोलनादरम्यान त्यावेळेस शेतकऱ्यांना झोडपून काढणारे, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करीत गोळीबार करणारे ते पोलिसही अखेरच्या क्षणाला रडल्याच्या आठवणी ताज्या आहेत.

आंदोलनादरम्यान शासकीय आदेश आणि कायदा व सुव्यवस्थेकरिता कर्तव्यावर असलेल्या त्या पोलिसांना लगतच्या गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनीच जेवण दिले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू गळलेत. बहिरम यात्रेचे स्वरूप बदलले असले तरी आधी ही यात्रा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची होती. ग्रामीण संस्कृतीची उधळण करीत ती बहरायची. ही यात्रा म्हणजे गावखेड्यातील गावकऱ्यांसह शेतकऱ्यांचे सुपर मार्केटच. खुला भव्य-दिव्य मॉलच.

कापूस आंदोलन

बहिरम यात्रेदरम्यान २४ जानेवारी १९७५ ला कापसाला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कापूस आंदोलन केले. ज्या प्रांतात भाव आहे, त्या प्रांतात शेतकऱ्याला कापूस विकण्याची मुभा मिळावी म्हणून हे आंदोलन उभारले गेले. याकरिता शेतकऱ्यांसह कापसाच्या शेकडो बैलबंड्या २३ जानेवारीला सायंकाळपासूनच बहिरममध्ये दाखल झाल्यात. बहिरमवरून तो कापूस मध्यप्रदेशात नेऊन विकण्याकरिता हे शेतकरी एकत्र आलेत.

महिला नेतृत्व

कापूस आंदोलनात कापूसतळणी येथील केशरबाई सिकची यांनी बैलबंडी अग्रस्थानी ठेवली. स्वतः त्या धुरीवर बसल्या आणि बंडी पुढे काढली. त्या पाठोपाठ इतरही बंड्या निघाल्यात. त्यांच्यासोबत भाऊ साबळे, दादा हावरे यांनीही आंदोलनाचे नेतृत्व केले.

पोलिस बंदोबस्त

आंदोलन मोडून काढण्याकरिता यात्रा परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता. बहिरम-बैतूल मार्गावर बैलगाड्या पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. लाठीचार्ज केला. गोळीबारही केला अन् गोंधळ उडाला.

शेतकऱ्यांवर अत्याचार

गोंधळात बंडीचे बैल पळाले. चाके तुटली. अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले. जखमी अवस्थेत ते तिथेच पडून राहिले. मी-मी म्हणणाऱ्यांनाही पोलिसांनी झोडपून काढले.

शेतकरी ठार

कापूस आंदोलनादरम्यान २४ जानेवारी १९७५ ला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रामापूर पथ्रोट येथील विठ्ठलराव किसनराव दोतोंडे ठार झाले. कुऱ्हा येथील एकनाथराव मानकर जखमी झाले होते.

श्रद्धांजली सभा

आंदोलनाच्या निमित्ताने २४ जानेवारीला शहीद शेतकरी स्मृती श्रद्धांजली दिन बहिरम येथे आयोजित करण्यात आला आहे. बहिरम कापूस आंदोलन स्मृती समितीद्वारा शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. प्रकाश साबळे आणि गोपाल भालेराव यांनी ही सभा आयोजित केली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकAmravatiअमरावती