शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

इतिहासाची पाने : राज्यबंदी मोडून काढण्यासाठी बहिरम यात्रेत आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:57 IST

शेतकऱ्यांच्या आक्रोशाचा गोळीबाराने बीमोड, ते पोलिसही अखेर रडले

अनिल कडू

परतवाडा (अमरावती) : बहिरम यात्रेला शेतकऱ्यांच्या कापूस आंदोलनाचा इतिहास आहे. आंदोलनादरम्यान त्यावेळेस शेतकऱ्यांना झोडपून काढणारे, शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करीत गोळीबार करणारे ते पोलिसही अखेरच्या क्षणाला रडल्याच्या आठवणी ताज्या आहेत.

आंदोलनादरम्यान शासकीय आदेश आणि कायदा व सुव्यवस्थेकरिता कर्तव्यावर असलेल्या त्या पोलिसांना लगतच्या गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनीच जेवण दिले आणि त्यांच्या डोळ्यांतून अश्रू गळलेत. बहिरम यात्रेचे स्वरूप बदलले असले तरी आधी ही यात्रा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची होती. ग्रामीण संस्कृतीची उधळण करीत ती बहरायची. ही यात्रा म्हणजे गावखेड्यातील गावकऱ्यांसह शेतकऱ्यांचे सुपर मार्केटच. खुला भव्य-दिव्य मॉलच.

कापूस आंदोलन

बहिरम यात्रेदरम्यान २४ जानेवारी १९७५ ला कापसाला भाव मिळावा म्हणून शेतकऱ्यांनी कापूस आंदोलन केले. ज्या प्रांतात भाव आहे, त्या प्रांतात शेतकऱ्याला कापूस विकण्याची मुभा मिळावी म्हणून हे आंदोलन उभारले गेले. याकरिता शेतकऱ्यांसह कापसाच्या शेकडो बैलबंड्या २३ जानेवारीला सायंकाळपासूनच बहिरममध्ये दाखल झाल्यात. बहिरमवरून तो कापूस मध्यप्रदेशात नेऊन विकण्याकरिता हे शेतकरी एकत्र आलेत.

महिला नेतृत्व

कापूस आंदोलनात कापूसतळणी येथील केशरबाई सिकची यांनी बैलबंडी अग्रस्थानी ठेवली. स्वतः त्या धुरीवर बसल्या आणि बंडी पुढे काढली. त्या पाठोपाठ इतरही बंड्या निघाल्यात. त्यांच्यासोबत भाऊ साबळे, दादा हावरे यांनीही आंदोलनाचे नेतृत्व केले.

पोलिस बंदोबस्त

आंदोलन मोडून काढण्याकरिता यात्रा परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात होता. बहिरम-बैतूल मार्गावर बैलगाड्या पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. लाठीचार्ज केला. गोळीबारही केला अन् गोंधळ उडाला.

शेतकऱ्यांवर अत्याचार

गोंधळात बंडीचे बैल पळाले. चाके तुटली. अनेक शेतकरी रक्तबंबाळ झाले. जखमी अवस्थेत ते तिथेच पडून राहिले. मी-मी म्हणणाऱ्यांनाही पोलिसांनी झोडपून काढले.

शेतकरी ठार

कापूस आंदोलनादरम्यान २४ जानेवारी १९७५ ला पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रामापूर पथ्रोट येथील विठ्ठलराव किसनराव दोतोंडे ठार झाले. कुऱ्हा येथील एकनाथराव मानकर जखमी झाले होते.

श्रद्धांजली सभा

आंदोलनाच्या निमित्ताने २४ जानेवारीला शहीद शेतकरी स्मृती श्रद्धांजली दिन बहिरम येथे आयोजित करण्यात आला आहे. बहिरम कापूस आंदोलन स्मृती समितीद्वारा शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे. प्रकाश साबळे आणि गोपाल भालेराव यांनी ही सभा आयोजित केली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकAmravatiअमरावती