शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

ओव्हरस्पिड, ओव्हरटेकने घेतला युवक-युवतीचा बळी; कारचा चेंदामेंदा

By प्रदीप भाकरे | Updated: December 19, 2022 17:28 IST

एक्सप्रेस हायवेवरील कोंडेश्वर टी पॉइंटजवळ भीषण अपघात, मुलगी अल्पवयीन

बडनेरा/ अमरावती: एक्सप्रेस हायवेवरील कोंडेश्वर टी पॉइंट जवळ भीषण अपघातातअमरावतीच्या युवक युवतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरधाव कार कट मारून एका ट्रकला ओव्हरटेक करताना ती कार रस्त्यावर उभ्या ट्रकला धडकली. १९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास हा प्राणांतिक अपघात घडला. गौरी यशवंत शेळके (१७) व आदित्य अखिलेन्द्र विश्वकर्मा (१९, दोघेही राहणार: शिवाजीनगर, सूतगिरणी रोड, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. घटनेनंतर इर्विन रूग्णालयात मृतांचे नातेवाईक एकमेकांना भिडले. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता.

आदित्य व गौरी हे एमएच ३४ बीआर १४९५ या क्रमांकाच्या कारने हायवेने जात असताना ती कार उभ्या ट्रकला भिडली. त्यावेळी आदित्य कार चालवत होता. प्रत्यक्षदर्शीनुसार, आदित्य हा स्टेरिंगमध्ये फसला होता. तर, गौरी लगतच्या सीटवर बसली होती. तिच्या डोक्याला जबर मार लागला होता. घटनास्थळी धावून गेलेल्या नागरिकांनी पोलीस तसेच ॲम्बुलन्सला बोलावले. मात्र त्या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर, ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. धडक एवढी जबर होती की कारचा चेंदामेंदा झाला.

गौरी ही अमरावतीच्या शिवाजी विज्ञान महाविद्यालयात अकराव्या वर्गात शिकत होती. सोमवारी सकाळी सात वाजता तिच्या वडिलांनीच तिला कॉलेजमध्ये सोडून दिले होते. तर, आदित्य हा नरसम्मा कॉलेजमधील १२ वीचा विद्यार्थी होता. दोघे शेजारी असल्याने त्यांच्यात ओळख होती. ती घट्ट करण्याच्या प्रयत्नात तो असल्याने त्याच्या व आपल्या कुटुंबात वाद देखील झाले होते, असे गौरीच्या वडिलांनी सांगितले. याप्रकरणी आदित्यविरूध्द गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मुलीचे शवविच्छेदन करू देणार नाही, असा पवित्रा गौरीच्या कुटुंबांनी घेतला होता. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी मृत आदित्यविरूध्द गुन्हा दाखल केला.

कोतवाली पोलिसांत एनसी दाखल

मृत मुलीच्या नातेवाईकांनी आपल्याला मारहाण केली, असा आरोप मृत मुलाच्या चुलतभावाने केला. त्यांनी कोतवाली पोलिसांत धाव घेतली. मृताच्या चुलतभावाच्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी मुलीच्या काही नातेवाईकांविरूध्द अदखलपात्र गुन्हा दाखल केला. शिवाजीनगरला कुठलाही राडा होऊ नये, म्हणून शहर कोतवाली पोलिसांनी मृत आदित्यच्या आईवडिलांसह अन्य नातेवाईकांना संरक्षण देऊन ठाणे परिसरातच राहण्याची सुचना केली.

इर्विनच्या अपघात कक्षात, बाहेर राडा

गाैरीला आदित्यने कॉलेजमधून पळवून नेले. त्याने तिला पळविलेच नसते, तर अपघात झाला नसता, त्यामुळे आमच्या मुलीच्या मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केला. तर, आदित्यच्या नातेवाईकांनी मुलीला दोषी ठरविले. यावरून मृत आदित्य व गौरीच्या कुटुंब व नातेवाईकांमध्ये चांगलाच राडा झाला. जमावातील अनेकांंनी इर्विनच्या अपघात कक्षात, बाहेर परस्परांना मारहाण केली. शिव्यांची लाखोली वाहिली. काहींनी आदित्यच्या मृतदेहाची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. शवविच्छेदन गृहासमोर देखील मृतांच्या नातेवाईकांमध्ये झटापट झाली.

गौरीच्या वडिलांची पोलिसात तक्रार

आमच्याच भागात राहणाऱ्या आदित्यने गौरीला फुस लावून पळवून नेले. तो तिच्याशी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. या प्रकारावरून पुर्वी वाद देखील झाले होते. त्याने भरधाव कार चालविल्यानेच त्या दोघांचा मृत्यू झाला. आपल्या मुलीच्या मृत्यूला तोच कारणीभूत असल्याचे गौरीचे वडील यशवंत कृष्णराव शेळके यांनी बडनेरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून अपहरण, अपघात व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर गौरीच्या शवविच्छेदनास तिच्या कुटुंबियांनी होकार दिला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :AmravatiअमरावतीAccidentअपघात