शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

शिकस्त इमारतींतून ७३ ग्रा.पं.चा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:04 IST

ग्रामपंचायत गावाच्या विकासाची केंद्रबिंदू असते. तथापि, जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींपैकी १४ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींचा कारभार शिकस्त इमारतींमधून चालविला जात आहे. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतींनी जनसुविधा योजनेंतर्गत सन २०१६-१७ पासून जिल्हा परिषदेकडे इमारत बांधकामासाठी निधीची मागणी केली आहे.

ठळक मुद्देकेव्हा होईल दुरुस्ती? : २०१६ पासून निधी मागणीचे प्रस्ताव पडून

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामपंचायत गावाच्या विकासाची केंद्रबिंदू असते. तथापि, जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींपैकी १४ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींचा कारभार शिकस्त इमारतींमधून चालविला जात आहे. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतींनी जनसुविधा योजनेंतर्गत सन २०१६-१७ पासून जिल्हा परिषदेकडे इमारत बांधकामासाठी निधीची मागणी केली आहे. त्यापैकी एकाही ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करवून देण्यात आलेला नाही.ग्रामपंचायत इमारत वा भवनाशिवाय गावांची कल्पनाच करता येत नाही. गाव तेथे ग्रामपंचायत असे राज्य शासनाचे धोरण आहे. पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावांचा प्रशासकीय कारभार सांभाळण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वसूल केले जातात. शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतींमार्फत राबविल्या जातात. परंतु, ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतीच धोकादायक असेल, तर गावांचा विकास होणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होतो.जिल्ह्यातील १४ तालुक्यात ८४० ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी तिवसा तालुक्यात पाच, भातकुली १०, चांदूरबाजार १४, अमरावती एक, चांदूर रेल्वे एक, मोर्शी ११ , वरूड चार, अंजनगाव चार, दर्यापूर १०, नांदगाव खंडेश्वर चार याप्रमाणे ७३ ग्रामपंचायतींच्या इमारती शिकस्त झाल्या आहेत. चार वर्षांपासून ग्रामीण भागातील ८४० ग्रामपंचायतीपैकी ७३ ग्रामपंचायतींचा कारभार शिकस्त व वापरण्यास अयोग्य असलेल्या इमारतीतून सुरू आहे. सदर ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडे जनसुविधा ग्रामपंचायत विशेष अनुदानाअंतर्गत सन २०१६-१७ पासून इमारत बांधकामासाठी सातत्याने प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, या प्रस्तावांची जिल्हा परिषदस्तरावर दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी प्रशासनाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा सवाल ग्रामपंचायतचे पदाधिकारी व नागरिकांंनी उपस्थित केला आहे.मग जनसुविधेचा फायदा काय?ग्राम विकासाची मुख्य जबाबदारी सांभाळणाऱ्या ग्रामपंचायतींना जनसुविधा योजनेतून विशेष अनुदान उपलब्ध करू न दिले जाते. त्यामधून स्मशानभूमी, रस्ते, ग्रामपंचायत इमारती व अन्य कामे करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, मागील काही वर्षात जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत इमारत बांधकामाकडे डोळझाक करण्यात आली. स्मशानभूमी शेड, रस्ते, नाल्या याच कामांना प्राधान्य देण्यात आले. परिणामी ग्रामपंचायतीच्या शिकस्त व वापरण्यास अयोग्य इमारतीतूच कामकाज चालविले जात आहे. त्यामुळे जनुसुविधा योजनेचा फायदा तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.