शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिकस्त इमारतींतून ७३ ग्रा.पं.चा कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:04 IST

ग्रामपंचायत गावाच्या विकासाची केंद्रबिंदू असते. तथापि, जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींपैकी १४ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींचा कारभार शिकस्त इमारतींमधून चालविला जात आहे. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतींनी जनसुविधा योजनेंतर्गत सन २०१६-१७ पासून जिल्हा परिषदेकडे इमारत बांधकामासाठी निधीची मागणी केली आहे.

ठळक मुद्देकेव्हा होईल दुरुस्ती? : २०१६ पासून निधी मागणीचे प्रस्ताव पडून

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ग्रामपंचायत गावाच्या विकासाची केंद्रबिंदू असते. तथापि, जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींपैकी १४ तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींचा कारभार शिकस्त इमारतींमधून चालविला जात आहे. विशेष म्हणजे, या ग्रामपंचायतींनी जनसुविधा योजनेंतर्गत सन २०१६-१७ पासून जिल्हा परिषदेकडे इमारत बांधकामासाठी निधीची मागणी केली आहे. त्यापैकी एकाही ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करवून देण्यात आलेला नाही.ग्रामपंचायत इमारत वा भवनाशिवाय गावांची कल्पनाच करता येत नाही. गाव तेथे ग्रामपंचायत असे राज्य शासनाचे धोरण आहे. पंचायतराज व्यवस्थेत ग्रामपंचायतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गावांचा प्रशासकीय कारभार सांभाळण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीवर असते. घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वसूल केले जातात. शासनाच्या विविध योजना ग्रामपंचायतींमार्फत राबविल्या जातात. परंतु, ज्या ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारतीच धोकादायक असेल, तर गावांचा विकास होणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होतो.जिल्ह्यातील १४ तालुक्यात ८४० ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी तिवसा तालुक्यात पाच, भातकुली १०, चांदूरबाजार १४, अमरावती एक, चांदूर रेल्वे एक, मोर्शी ११ , वरूड चार, अंजनगाव चार, दर्यापूर १०, नांदगाव खंडेश्वर चार याप्रमाणे ७३ ग्रामपंचायतींच्या इमारती शिकस्त झाल्या आहेत. चार वर्षांपासून ग्रामीण भागातील ८४० ग्रामपंचायतीपैकी ७३ ग्रामपंचायतींचा कारभार शिकस्त व वापरण्यास अयोग्य असलेल्या इमारतीतून सुरू आहे. सदर ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेकडे जनसुविधा ग्रामपंचायत विशेष अनुदानाअंतर्गत सन २०१६-१७ पासून इमारत बांधकामासाठी सातत्याने प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र, या प्रस्तावांची जिल्हा परिषदस्तरावर दखल घेण्यात आलेली नाही. परिणामी प्रशासनाला मोठ्या अपघाताची प्रतीक्षा आहे का, असा सवाल ग्रामपंचायतचे पदाधिकारी व नागरिकांंनी उपस्थित केला आहे.मग जनसुविधेचा फायदा काय?ग्राम विकासाची मुख्य जबाबदारी सांभाळणाऱ्या ग्रामपंचायतींना जनसुविधा योजनेतून विशेष अनुदान उपलब्ध करू न दिले जाते. त्यामधून स्मशानभूमी, रस्ते, ग्रामपंचायत इमारती व अन्य कामे करण्याचे शासनाचे धोरण आहे. मात्र, मागील काही वर्षात जनसुविधा योजनेतून ग्रामपंचायत इमारत बांधकामाकडे डोळझाक करण्यात आली. स्मशानभूमी शेड, रस्ते, नाल्या याच कामांना प्राधान्य देण्यात आले. परिणामी ग्रामपंचायतीच्या शिकस्त व वापरण्यास अयोग्य इमारतीतूच कामकाज चालविले जात आहे. त्यामुळे जनुसुविधा योजनेचा फायदा तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.