शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

आमची युती सेनेशी, २४-२४ चा फॉर्म्यूला ठरला - प्रकाश आंबेडकर

By उज्वल भालेकर | Updated: January 6, 2024 18:22 IST

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २० जानेवारी रोजी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

अमरावती : आमची युती ही उद्धव ठाकरे यांच्या सेनेशी झाली आहे. आमचा २४-२४ सीटचा फॉर्म्यूला ठरला आहे. त्यामुळे आमची जी काही बोलणी सुरू आहे ती फक्त सेनेशी सुरू आहे आणि सेना आम्हाला इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीत सहभागी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी बोलणी करत आहे. आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत कोणत्याही प्रकारची बोलणी सुरू नसल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी दिली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने २० जानेवारी रोजी जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर हे शनिवारी अमरावती शहरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रकाश आंबेडकर म्हणाले, २०२४ मध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना सत्तेपासून रोखण्याचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे त्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढविणे गरजेचे आहे; परंतु काँग्रेसची भूमिका ही दुटप्पी आहे, त्यामुळे त्यासंदर्भात जास्त काही बोलणार नाही.

आमची युती ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी झालेली आहे. त्यामुळे आमचे जे काही बोलणे आहे ते फक्त शिवसेनेशी आहे. आम्ही इंडिया आघाडीत जायला तयार आहोत. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तो प्रस्ताव अजूनही स्वीकारलेला नसल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगावरही निशाणा साधला. ते म्हणाले निवडणूक आयोगाची संविधानिक जबाबदारी ही निवडणुका घेणे ही आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने नि:पक्षपातीपणे आपली जबाबदारी पार पाडणे अपेक्षित आहे. जर निवडणूक आयोग आपली जबाबदारी पार पाडत नसेल, तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा लोकांनी निवडणूक आयोगाला बदडून काढावे असेही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर