शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

१३ कोटी वृक्ष लागवडीबाबत अन्य यंत्रणा सुस्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:53 IST

राज्यात १ ते ३० जुलै २०१८ या कालावधीत वनविभागासह ३९ शासकीय यंत्रणा, १० महामंडळांना १३ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट असताना वनविभाग वगळता अन्य यंत्रणांनी या मोहिमेत कमालीची अनास्था दाखविली आहे.

ठळक मुद्देवनमंत्र्यांचे जम्बो दौरे खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षांसह सरपंचांना भावनात्मक पत्र

गणेश वासनिक।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात १ ते ३० जुलै २०१८ या कालावधीत वनविभागासह ३९ शासकीय यंत्रणा, १० महामंडळांना १३ कोटी वृक्ष लागवडीचे टार्गेट असताना वनविभाग वगळता अन्य यंत्रणांनी या मोहिमेत कमालीची अनास्था दाखविली आहे. त्यामुळे दस्तुरखुद्द वनमंत्री तथा अर्थमंत्री राज्यभर दौरे करून वृक्ष लागवडीबाबत इतर यंत्रणांचा आढावा घेत आहेत.महाराष्ट्राला ३३ टक्के वृक्ष आच्छादनाने वलयांकित करण्याचा ध्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. त्याकरिता १३ कोटी वृक्ष लागवड हा उपक्रम ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणून नावारूपास आणला जात असताना वनविभाग वगळता इतर शासकीय यंत्रणा याकडे पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे. १ ते ३० जुुुलै या कालावधीत वनविभाग लोकसहभागातून स्वत:च्या जमिनीवर आठ कोटी वृक्ष लागवड करणार आहे. त्याअनुषंगाने वनविभागाने तयारीदेखील चालविली असून, पूर्व पावसाच्या कामाची अंमलबजावणी जलद गतीने केली जात आहे. मात्र, जिल्हा परिषदांकडे दोन कोटींच्यावर वृक्ष लागवडीचे टार्गेट असताना त्या तुलनेत या यंत्रणेने उपापयोजना केल्या नाहीत, असे यापूर्वी प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतून स्पष्ट झाले आहे.राज्य शासनाचे ३९ विभाग, १० महामंडळांनीसुद्धा १३ कोटी वृक्ष लागवडीबाबत ध्येयपूर्तीकडे वाटचाल केली नाही. वनविभाग वगळता अन्य शासकीय यंत्रणांचे वृक्ष लागवडीबाबत प्रधान वनसचिव खारगे यांनी आढावा घेतला असता, ३५ जिल्ह्यांमध्ये कामे समाधानकारक नसल्याची धक्कादायक बाब त्यांच्या निदर्शनास आली. शासकीय यंत्रणा वृक्ष लागवडीबाबत कागदोपत्रीच माहिती नाचवित असल्याचे खारगे यांना दिसून आले आहे. त्यामुळे त्यांनी अन्य यंत्रणांच्या प्रधान सचिवांना पत्र लिहून १३ कोटी वृक्ष लागवडबाबतची वस्तुस्थिती कळविली. परिणामी वनविभाग व्यतिरिक्त अन्य यंत्रणांनी या मोहिमेत हिरीरीने सहभागी होण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी जिल्हानिहाय जलद गती दौऱ्याचे नियोजन केले असून, वनमंत्री मुनगंटीवार हे २८ मे रोजी अमरावतीच्या दौऱ्यावर असून, ते वृक्ष लागवडीबाबतचा आढावा घेणार आहेत.वनविभागाला अन्य यंत्रणा जुमानेना१३ कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत, तर उपवनसंरक्षक सचिव असलेली प्रत्येक जिल्ह्यात शासनाने समिती गठित केली आहे. परंतु, राज्यात २० जिल्हाधिकाऱ्यांना वृक्ष लागवड आढाव्यासाठी वेळ मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे इतर विभागाचे अधिकारी वृक्ष लागवड आढावा बैठकीला दांडी मारत आहेत. त्यामुळे वनविभागाला इतर यंत्रणा जुमानेना, असे दिसून येत आहे.प्रधान वनसचिवांकडून आढावा बैठकीचे ‘ब्रिफींग’राज्य शासनाच्या संकल्पनेतून वनक्षेत्र ३३ टक्क्यांवर न्यायचे असल्याने प्रधान वनसचिव विकास खारगे यांनी यापूर्वी विभागनिहाय वृक्ष लागवडीबाबत दोन बैठकांतून आढावा घेतला. वनसचिवांनी या बैठकीचे ‘ब्रिफींग’ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले आहे. मे महिना अर्ध्यावर आला असताना वनविभाग वगळता अन्य यंत्रणा नियोजनात माघारल्याचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.वनमंत्र्यांनी लिहिले भावनात्मक पत्रवृक्ष लागवड ही मोहीम असून, यात खासदार, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्षांसह सरपंचांनी स्वत: झोकून द्यावे. वृक्ष लागवडीच्या नियोजनासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. राज्याचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांवर पोहचविण्यासाठी खारीचा वाटा उचलावा, असे भावनात्मक आवाहन वजा पत्र वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या स्वस्वाक्षरीने राज्यभरातील लोकप्रतिनिधींना पाठविले आहे.

टॅग्स :forestजंगल