शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश; हालचालींना वेग

By जितेंद्र दखने | Updated: August 31, 2022 18:23 IST

जि.प.ला ग्रामविकास विभागाचे आदेश धडकताच हालचाली

अमरावती : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या तब्बल दोन वर्षांनंंतर राज्यातील ३ हजार ९४३ शिक्षकांच्या २२ ऑगस्ट रोजी आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचा अपवाद सोडला, तर बहुतांश जिल्हा परिषदांनी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले नव्हते. ही बाब लक्षात घेता ग्रामविकास विभागाने बदली झालेल्या शिक्षकांना येत्या ५ सप्टेंबर रोजी कार्यमुक्त करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले. यासंदर्भातील आदेश ३० ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेत धडकताच शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

कोरोना संकटाची दोन वर्षे आणि नंतर शिक्षकांच्या बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार न झाल्याने शिक्षकांच्या बदल्या लांबल्या होत्या. आता २२ ऑगस्ट रोजी दाेन वर्षांच्या अवधीनंतर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या आहेत. यानुसार राज्यातील ३ हजार ९४३ शिक्षकांच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे बदल्या केल्या आहेत. यात मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचा समावेश आहे. बदल्या झालेल्या शिक्षकांना पुणे जिल्हा परिषदेने बदली झालेल्या शिक्षकांना ७ एप्रिल २०२१ च्या शासननिर्णयानुसार आवश्यक त्या कागदपत्रांची तपासणी तालुकास्तरावर करून कार्यमुक्त करण्याचे आदेश सीईओंनी दिले होते.

हा अपवाद सोडला, तर बहुतांश जिल्हा परिषदांना आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे याची दखल घेत ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची कारवाई करावी, अशा सूचना लेखी पत्राद्वारे सीईओंना दिल्या आहेत. ही सर्व प्रक्रिया ५ सप्टेंबरपर्यंत पूर्ण करावी. शिक्षकांना कार्यमुक्त करताना प्रचलित धोरणानुसार १० टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त राहणार नाहीत, याची दक्षतासुद्धा बाळण्याच्या सूचना ग्रामविकास विभागाचे उपसचिव का. गो. वळवी यांच्या स्वाक्षरीने जारी केलेल्या पत्रात दिलेल्या आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना ५ सप्टेंबरपर्यंत कार्यमुक्त केले जाणार असल्याने दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदलीAmravatiअमरावती