शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

न्यायालयाचे आदेश झुगारून दिला शेतीचा ताबा

By admin | Updated: April 3, 2016 03:49 IST

मेळघाटात काहीही घडू शकते याचा प्रत्यय पुन्हा एकदा पहावयास मिळाला आहे.

नुकसान : उभ्या पिकावर फिरविले रोटावेटरश्यामकांत पाण्डेय धारणीमेळघाटात काहीही घडू शकते याचा प्रत्यय पुन्हा एकदा पहावयास मिळाला आहे. कोणाच्याही ताब्यातून शेती मिळवायची झाल्यास सक्षम न्यायालयाचा आदेश प्राप्त करावा लागतो. परंतु धारणी पोलिसांनी असे न्यायालयाचे कोणतेही आदेश नसताना स्वत: न्यायाधीश बनून उभ्या शेतातील पिकावर नांगरणी करवून ताबा दिल्याचा प्रकार ३१ मार्च रोजी नागझीरा गावात घडली. मौजे नागझीरा येथील शेत सर्वे नंबर ९९ हे बळीराम रामा, जीजी रामा, शिवराम रामा आणि ठेमाय झाल्या कास्देकर यांच्या संयुक्त मालकीत सातबारामध्ये नोंद आहे. ठेमाय झाल्या हिने या शेतात वाटणी होऊन १/३ हिस्सा मिळावा म्हणून २००९ मध्ये दिवाणी न्यायालय धारणी येथे वादपत्र दाखल केले होते. दरम्यान ठेमायच्या मुलांनी आपल्या हक्काचे १/३ जमीन ताब्यात घेऊन वहिती करू लागले. या प्रकरणात बळीराम यांनी आपले पक्ष न मांडल्याने प्रकरण खारीज करण्यात आले. हा निकाल २८ मार्च २०१४ रोजी लागला. तेव्हापासून बळीराम याने ताबा घेण्यासाठी कोणतेही वादपत्र दिवाणी न्यायालयात दाखल केले नाही. तरीदेखील दोन वर्षांपासून ताबा ठेमाय झाल्या यांच्याचकडे कायम होता. सध्या या १/३ शेतीवर ठेमायचे वारसदारांनी उन्हाळी मूंग व कांद्याची लागवड केली. दोन्ही पिके एक फुटापर्यंत वाढली होती. अशातच बळीराम रामाने पोलिसांच्या मदतीने व चिरीमिरी करून ताबा बळजबरीने घेण्याचा प्रकार सुरू केला. तत्पूर्वी बळीरामने मी केस जिंकलो, असे सांगत तहसीलदारांकडे ताबा देण्याचा अर्ज केला होता. मात्र दिवाणी न्यायालयाने ताबा कोणास द्यावा याबाबत आदेश केले नसल्याने नायब तहसीलदारांकडे ते अर्ज प्रलंबितच आहे. यादरम्यान बळीरामचे पोलिसांकडे साकडे घालणे सुरूच होते. पोलिसांसोबत सर्व प्रकारची ‘सेटींग’ झाल्यावर ३१ मार्च रोजी पोलिसांनी वाहितदारांच्या वारसदारांना पोलीस व्हॅनमध्ये बसवून धारणी ठाण्यात आणले व बळीरामला ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करण्याचे आदेश जमादाराने दिले. त्यामुळे उभ्या पिकावर सुसर्दा येथील ट्रॅक्टरद्वारे उभे पीक नष्ट करण्यात आले. यामुळे बीट जमादाराच्या या प्रकारामुळे आदिवासी शेतकऱ्यावर अन्याय झाला आहे.अन्यायाची चौकशी कराउभ्या पिकाचा ताबा न्यायालयाचे आदेश असल्यावरही देता येत नाही, असे सर्वसामान्य न्यायाचे सिद्धांत आहे. त्यामुळे या प्रकरणात सिद्धांत व नियमाला बगल देऊन पोलिसांनी केलेल्या अन्यायाची चौकशी व्हावी, अशी आशा ठेमाय झाल्या नामक महिलेच्या वारसदारांना जिल्हाधिकारी व पोलीस अधिकाऱ्याकडून आहे.