शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

परप्रांतीय बाजारपेठेत संत्राला मिळतो मातीमोल भाव ! संत्राउत्पादक चिंताग्रस्त !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:23 IST

वरुड (संजय खासबागे ) :- विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरुड तालुक्याची ख्याती आहे . देशविदेशात संत्राची चव चाखल्या जाते . ...

वरुड (संजय खासबागे ) :- विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून वरुड तालुक्याची ख्याती आहे . देशविदेशात संत्राची चव चाखल्या जाते . २० हजार हेक्टरवर संत्राचे पीक घेतल्या जात असून यावर्षी आंबिया भाराच्या संत्राचे उत्पादन चांगले असले तरी मोठ्या प्रमाणात भाव गडगडल्याने संत्रा उत्पादकांसह व्यापार्यानाही नुकसान सहन करण्याची वेळ आली . आंबिया बहाराच्या संत्राला गत महिन्यापासून मातीमोल भाव मिळत आहे . यामध्ये अडीचशे ते पाचशे रुपये कॅरेट आणि १० ते १५ रुपये किलो नुसार दर मिळत असल्याने बाजारपेठेत पोहचविण्याचा आणि उत्पादन खर्च काढणे दुरापात्र झाले आहे . यामुळे संत्रा उत्पादक शेतकर्यामध्ये चिंतेचे सावंट पसरले असून ४० टक्के संत्रा झाडावरच आहे .

विदर्भाच्या कॅलिफोर्निया वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादकांवर चिंतेचे सावट पसरले आहे . वरुड तालुक्यात २० हजार हेक्टरवर संत्राचे पीक घेतल्या जाते . संत्राचे दोन वेळा उत्पादन शेतकरी काढतात . यामध्ये आंबिया बहार आणि दुसरा मृग बहार घेतल्या जातो .गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये वातावरण चांगले असल्याने आंबिया भारताची फूट समाधानकारक राहिली . यामुळे आंबिया बहाराची संत्रावर पंजाबच्या किन्नू ने मात केली असून बाजारपेठेत संत्राला भाव मिळत नाही . दिल्ली , झारखंड , उत्तरप्रदेश , केरळ मध्ये संत्राचे भाव पडले असल्याची ओरड असली तरी वैदर्भीय संत्राला मातीमोल भाव मिळत असून आंदोलने , कोरोना प्रादुर्भाव याचा सुद्धा फाटक पडत आहे . बांग्लादेशात सुद्धा संत्राची परवड होत आहे . २५० ते ५५० रुपयांपर्यंत एक कॅरेट संत्रा विकल्या जाते . यामध्ये तोडाई , भराइ , माल वाहतूक बाजार पेठेपर्यंतचा कॅरेट सह खर्च २५० रुपये येतो . कॅरेट प्रमाणे २५० ते ५०० रुपयांपर्यंत आणि बाजारात १० ते १५ रुपये किलोपर्यंत संत्राला भाव मिळत आहे . यामुले संत्रा उत्पादक मेटाकुटीस आला आहे तर शेतात अजूनही ४० टक्के संत्रा झाडावरच आहे . नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत पाणी सोडण्याची वेळ असते . मात्र अद्यापही संत्रा झाडावरच असल्याने संत्रा उत्पादकांसह व्यापाऱयांना सुद्धा आर्थिक फटका बसत आहे . यामुळे शेतकर्याना परप्रांतीय बाजार पेठेत महाराष्ट्र पणन महामंडळाचे कार्यालय उघडणे आवश्यक आहे . संत्राचे भाव खालावल्याने संत्रा उत्पादक शेतकर्याना थेट मार्केटिंगची सुविधा होणे गरजेचे असल्याचे शेतकऱयांतून सांगितल्या जाते .

* संत्राला भाव नसल्याने शेतकऱ्याला फटका बसत आहे - विजय श्रीराव शेतकरी

शासनाने शेतकर्याकरिता किसान रेल सुरु केली मात्र आठवड्यातून एकवेळाचं येते तर यावर्षी संत्राचे पीक चांगले असून दिल्ली बाजारात भाव नसून किन्नूला अधिक पसंती मिळत असून भाव सुद्धा चांगले मिळतात . यामुळे याचा परिणाम संत्रावर झाला आहे . भाव नसल्याने संत्रा शेतातच पडून आहे . या वेळी नोव्हेंबरमध्ये आंबिया बहाराचे उत्पादन घेण्याकरिता पाणी सोडावे लागत असताना संत्रा झाडावरच असल्याने पाणी सोडता येत नाही . यामुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्याला आर्थिक नुकसान सोसण्याची वेळ आली आहे असे पुसला येथील शेतकरी विजय श्रीराव यांनी सांगितले .