शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

हजारो हेक्टरमध्ये संत्रागळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:09 IST

कोरड्या दुष्काळात पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी संत्राझाडासह आंबिया बहर टिकविला. मात्र, आता अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात संत्राफळांना गळती लागल्याने शेतकरी हादरून गेला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हादरला : एकीकडे दुष्काळाच्या झळा; दुसरीकडे आंबिया गळाला

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : कोरड्या दुष्काळात पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी संत्राझाडासह आंबिया बहर टिकविला. मात्र, आता अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात संत्राफळांना गळती लागल्याने शेतकरी हादरून गेला आहे. तप्त उन्हाळा, कोरड्या पडलेल्या विहिरी व बोअर, प्रचंड पाणीटंचाई यातून सावरलेल्या शेतकऱ्यांवर गळतीच्या रूपात मोठे अस्मानी संकट कोसळले आहे.वरूड तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर जमिनीमध्ये संत्राचे पीक घेतले जाते. सुमारे ७५ टक्के शेतकरी संत्र्याचे पीक घेतात. २०१८ साली कोरडा दुष्काळ पडल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला होता. विहिरी, बोअर आटल्याने तालुक्यात ८ हजार ४०० हेक्टर शेतजमिनीवरील संत्राझाडे सुकली होती. यातून संत्रा उत्पादक कसाबसा सावरला. परंतु, पावसाळा उशिराने आला आणि पुन्हा आंबिया बहराच्या संत्राफळाला गळती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. संत्राफळांचे देठ पिवळे पडून ती पिवळी पडल्यावर मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. झाडाखाली शेकडो संत्री गळून पडत असल्याने उत्पादक हवालदिल झाला आहे.संत्रा उत्पादकांना जीवदान देण्यासाठी शासनाने आर्थिक मदतीसह कृषी विभागाकडून सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याची मागणी संत्राउत्पादक शेतकरी करीत आहेत.कृषिमंत्र्याच्या मतदारसंघात संत्रा उत्पादकांची दैनाविदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेला राज्याचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांचा हा मतदारसंघ अन् गृहजिल्हाही. या जिल्ह्यातील मोर्शी, वरूड, अचलपूर व चांदूरबाजार या चार तालुक्यात संत्र्यागळीचा प्रकार अधिक प्रमाणात आहे. मंत्रिमहोदयांचा दौरा झाला. वाळलेल्या संत्रा झाडासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतून मदत दिली जाणार असल्याचे ना. बोंडे यांनी सांगितले. मात्र, संत्राबागांमध्ये होत असलेल्या फळगळीबाबत चकार शब्द काढलेला नाही. संत्राउत्पादकांचे कोट्यावधीचे नुकसान होत असताना कृषी विभागदेखील पुढे सरसावला नसल्याचे वास्तव आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर आता कुठे जिल्हा प्रशासनाला जाग आली. आता कुठे संत्राझाडांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.संत्राउत्पादकांना हवी मदतउत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा जगविण्याकरिता पाण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. त्यातून कसाबसा सावरला असताना आता आंबिया बहराला गळती लागली. लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने संत्राउत्पादकांना शासनाने हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बेनोडाचे संत्राउत्पादक विवेक आलोडे यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी