शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
4
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
5
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
6
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
7
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
8
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
9
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
10
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
11
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
12
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
13
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
14
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
15
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
16
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
17
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
18
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
19
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
20
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...

हजारो हेक्टरमध्ये संत्रागळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:09 IST

कोरड्या दुष्काळात पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी संत्राझाडासह आंबिया बहर टिकविला. मात्र, आता अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात संत्राफळांना गळती लागल्याने शेतकरी हादरून गेला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हादरला : एकीकडे दुष्काळाच्या झळा; दुसरीकडे आंबिया गळाला

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : कोरड्या दुष्काळात पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी संत्राझाडासह आंबिया बहर टिकविला. मात्र, आता अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावाने मोठ्या प्रमाणात संत्राफळांना गळती लागल्याने शेतकरी हादरून गेला आहे. तप्त उन्हाळा, कोरड्या पडलेल्या विहिरी व बोअर, प्रचंड पाणीटंचाई यातून सावरलेल्या शेतकऱ्यांवर गळतीच्या रूपात मोठे अस्मानी संकट कोसळले आहे.वरूड तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर जमिनीमध्ये संत्राचे पीक घेतले जाते. सुमारे ७५ टक्के शेतकरी संत्र्याचे पीक घेतात. २०१८ साली कोरडा दुष्काळ पडल्याने सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला होता. विहिरी, बोअर आटल्याने तालुक्यात ८ हजार ४०० हेक्टर शेतजमिनीवरील संत्राझाडे सुकली होती. यातून संत्रा उत्पादक कसाबसा सावरला. परंतु, पावसाळा उशिराने आला आणि पुन्हा आंबिया बहराच्या संत्राफळाला गळती मोठ्या प्रमाणावर सुरू झाली. संत्राफळांचे देठ पिवळे पडून ती पिवळी पडल्यावर मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. झाडाखाली शेकडो संत्री गळून पडत असल्याने उत्पादक हवालदिल झाला आहे.संत्रा उत्पादकांना जीवदान देण्यासाठी शासनाने आर्थिक मदतीसह कृषी विभागाकडून सर्वेक्षण करून उपाययोजना करण्याची मागणी संत्राउत्पादक शेतकरी करीत आहेत.कृषिमंत्र्याच्या मतदारसंघात संत्रा उत्पादकांची दैनाविदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेला राज्याचे कृषिमंत्री डॉ अनिल बोंडे यांचा हा मतदारसंघ अन् गृहजिल्हाही. या जिल्ह्यातील मोर्शी, वरूड, अचलपूर व चांदूरबाजार या चार तालुक्यात संत्र्यागळीचा प्रकार अधिक प्रमाणात आहे. मंत्रिमहोदयांचा दौरा झाला. वाळलेल्या संत्रा झाडासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेतून मदत दिली जाणार असल्याचे ना. बोंडे यांनी सांगितले. मात्र, संत्राबागांमध्ये होत असलेल्या फळगळीबाबत चकार शब्द काढलेला नाही. संत्राउत्पादकांचे कोट्यावधीचे नुकसान होत असताना कृषी विभागदेखील पुढे सरसावला नसल्याचे वास्तव आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर आता कुठे जिल्हा प्रशासनाला जाग आली. आता कुठे संत्राझाडांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.संत्राउत्पादकांना हवी मदतउत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा जगविण्याकरिता पाण्यासाठी लाखो रुपये खर्च केले. त्यातून कसाबसा सावरला असताना आता आंबिया बहराला गळती लागली. लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याने संत्राउत्पादकांना शासनाने हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बेनोडाचे संत्राउत्पादक विवेक आलोडे यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी