शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांना चार जिल्ह्यांतून ३० शाळांचा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST

अमरावती : राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा ...

अमरावती : राज्याच्या ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी आता एकाऐवजी चार जिल्ह्यांचा आणि २० ऐवजी ३० शाळांचा पर्याय देता येईल. बदलीसाठी शिक्षकांना ऑनलाईन अर्जऐवजी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज करावा लागेल, गटशिक्षणाधिकारी संबंधित अर्ज ऑनलाइन सादर करतील. दरवर्षी ३१ मे पर्यंतच बदल्या केल्या जाणार आहेत.

काही वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत बराच गोंधळ होत आहे. या पार्श्वभूमीवर बदल्यांचे नवीन धोरण जाहीर करण्यात आले आहे. मात्र, नव्या धोरणातही शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. त्यासाठी आधीच्या काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. परंतु आंतरजिल्हा बदलीसाठी सध्याच्या जिल्हा परिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र एनओसी आवश्यक असल्याची अट कायम ठेवण्यात आली आहे. यापूर्वी जिल्हांतर्गत बदल्या बाबत अवघड क्षेत्र कोणते यासाठीचे सात निकष ठरविण्यात आले आहेत. त्यातील निकषांची पूर्तता करणारे क्षेत्र अवघड मानले जाईल. जिल्हाअंतर्गत बदल्या यासाठीही संवर्ग निश्चित करण्यात आले आहेत. जिल्हाअंतर्गत बदलीसाठी आता २० ऐवजी ३० शाळांचा पर्याय देण्यात येईल. अवघड क्षेत्रात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा केलेले शिक्षक बदली पात्र असतील सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष सेवा आणि एका शाळेवर पाच वर्षे सेवा केलेले शिक्षक बदलीपात्र मानले जातील, असे स्पष्ट करण्यात आले.

०००००००००००

. नवीन बदली धोरणात काय?

- पूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी एकाच जिल्ह्याचा पर्याय देण्यात येत होता. आता चार जिल्ह्यांचा पर्याय देता येतील

- जिल्हांतर्गत बदलीसाठी आता २० ऐवजी ३० शाळांचा पर्याय देता येईल

- वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या पती-पत्नीला आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज करण्याचा करायचा असल्यास दोघांपैकी एका जिल्ह्याचा पर्याय निवडता येईल.

- पती-पत्नी वेगवेगळ्या जिल्ह्यात असल्यास आणि त्यांना तिसऱ्या जिल्ह्यात बदली हवी असल्यास दोघांपैकी कनिष्ठ असलेल्यांची सेवाज्येष्ठता गृहीत धरली जाईल

--------------

यांना दिले जाणार प्राधान्य

- ना हरकत प्रमाणपत्र असलेल्या शिक्षकांना संवर्ग १ मधील कर्मचाऱ्यांना

- ज्या संवर्गातून निवड झाली त्याच संवर्गातील रिक्त पदावर दुसऱ्या जिल्ह्यात बदली.

- पती-पत्नी एकत्रीकरणाचा प्राधान्यक्रमही नव्या धोरणात निश्चित.

- पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असल्या प्रथम प्राधान्य.

------------

हे असेल पात्र शिक्षक

- अवघड क्षेत्रात तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त सेवा असलेले शिक्षक

- सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे सेवा आणि एकाच शाळेवर पाच वर्षात सेवा केलेले शिक्षक

- आंतरजिल्हा बदली हा शिक्षकांचा हक्क असणार नाही

- आंतरजिल्हा बदली हा शिक्षकांचा हक्क असणार नाही