शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी आता ‘ऑपरेशन बिरबल-२’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 07:00 IST

Amravati News यंदा वन्यजीव शिकारींच्या पार्श्वभूमीवर वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड (डब्ल्यूसीसीबी)ने ‘ऑपरेशन बिरबल-२’ राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या वनविभागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ॲक्शन प्लॅन

गणेश वासनिक

अमरावती : उन्हाळ्याच्या हंगामात वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाघ, बिबट व इतर वन्यजीवांच्या शिकारीच्या घटना घडतात. मात्र, यंदा वन्यजीव शिकारींच्या पार्श्वभूमीवर वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड (डब्ल्यूसीसीबी)ने ‘ऑपरेशन बिरबल-२’ राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या वनविभागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड कार्यरत आहे. देशात वाघ, बिबट व इतर अनुसूचीनिहाय वन्यजीवांच्या शिकारी, हत्या, अवयवांच्या तस्करीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डब्ल्यूसीसीबी वेळोवेळी गाईडलाईन तयार करते. ज्या राज्यात वाघ, बिबट्यांच्या शिकारी होण्याचे प्रमाण वाढीस लागते, अशा राज्यांवर सक्ती करण्याचे अधिकारसुद्धा डब्ल्यूसीसीबीला बहाल करण्यात आले आहेत. याशिवाय, वन्यजीवांच्या शिकारी, हत्या, अवयवांच्या तस्करीप्रकरणी चौकशीदेखील ही संस्था करू शकते. तथापि, गत दोन वर्षांत राज्यात वनविभागाची कामगिरी सुधारली आहे.

काय आहे ‘ऑपरेशन बिरबल-२’

उन्हाळ्यात वनक्षेत्रांना आगी लावून वन्यजीवांची हत्या, शिकार आणि अवयवांची तस्करी केली जाते, असा निष्कर्ष डब्ल्यूसीसीबीने काढला आहे. वन्यजीवांची तस्करी करणारे मास्टर माइंड सक्रिय होतात. त्यामुळे ‘ऑपरेशन बिरबल-२’नुसार गावपातळीवर स्वत: तपास करणे, शिकाऱ्यांवर पाळत ठेवणे, शिकाऱ्यांची गोपनीय माहिती मिळविणे, स्थानिकांची मदत घेत शिकाऱ्यांवर सापळा रचणे आदी कामे वनकर्मचारी, अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत.

वनतस्करांचे रेकॉर्ड तपासणार

वनपरिक्षेत्रनिहाय वन्यजीवांच्या शिकारप्रकरणी जुन्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे, तो हल्ली नेमका काय करतो, याचा शोध घेणे, त्या गुन्हेगाराला कोणी बाहेरील व्यक्ती भेटते अथवा संपर्क आहे का? याविषयी चाचपणी करणे, जंगलात ती व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती देणे, गुन्हेगारांविषयी बारीकसारीक माहिती गोळा करणे, गावस्तरावर पोलीस पाटलांची मदत घेणे, वन्यजीव शिकारीचे आर्टिकल्स तयार करून त्याचे गावस्तरावर मार्गदर्शन करणे आणि पूर्वाश्रमीच्या वनगुन्हेगारांची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

 

‘ऑपरेशन बिरबल-२’ची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. वन्यजीवांच्या शिकारी यातून नक्कीच रोखता येईल. राज्यभर ही मोहीम राबवू. जंगल क्षेत्रानजीकच्या गावात बारकाईने लक्ष दिले जाईल.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र

टॅग्स :wildlifeवन्यजीव