शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

वन्यजीवांची तस्करी रोखण्यासाठी आता ‘ऑपरेशन बिरबल-२’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 07:00 IST

Amravati News यंदा वन्यजीव शिकारींच्या पार्श्वभूमीवर वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड (डब्ल्यूसीसीबी)ने ‘ऑपरेशन बिरबल-२’ राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या वनविभागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

ठळक मुद्देवनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ॲक्शन प्लॅन

गणेश वासनिक

अमरावती : उन्हाळ्याच्या हंगामात वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाघ, बिबट व इतर वन्यजीवांच्या शिकारीच्या घटना घडतात. मात्र, यंदा वन्यजीव शिकारींच्या पार्श्वभूमीवर वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड (डब्ल्यूसीसीबी)ने ‘ऑपरेशन बिरबल-२’ राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने राज्याच्या वनविभागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या अधिपत्याखाली वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल बोर्ड कार्यरत आहे. देशात वाघ, बिबट व इतर अनुसूचीनिहाय वन्यजीवांच्या शिकारी, हत्या, अवयवांच्या तस्करीवर नियंत्रण मिळविण्यासाठी डब्ल्यूसीसीबी वेळोवेळी गाईडलाईन तयार करते. ज्या राज्यात वाघ, बिबट्यांच्या शिकारी होण्याचे प्रमाण वाढीस लागते, अशा राज्यांवर सक्ती करण्याचे अधिकारसुद्धा डब्ल्यूसीसीबीला बहाल करण्यात आले आहेत. याशिवाय, वन्यजीवांच्या शिकारी, हत्या, अवयवांच्या तस्करीप्रकरणी चौकशीदेखील ही संस्था करू शकते. तथापि, गत दोन वर्षांत राज्यात वनविभागाची कामगिरी सुधारली आहे.

काय आहे ‘ऑपरेशन बिरबल-२’

उन्हाळ्यात वनक्षेत्रांना आगी लावून वन्यजीवांची हत्या, शिकार आणि अवयवांची तस्करी केली जाते, असा निष्कर्ष डब्ल्यूसीसीबीने काढला आहे. वन्यजीवांची तस्करी करणारे मास्टर माइंड सक्रिय होतात. त्यामुळे ‘ऑपरेशन बिरबल-२’नुसार गावपातळीवर स्वत: तपास करणे, शिकाऱ्यांवर पाळत ठेवणे, शिकाऱ्यांची गोपनीय माहिती मिळविणे, स्थानिकांची मदत घेत शिकाऱ्यांवर सापळा रचणे आदी कामे वनकर्मचारी, अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत.

वनतस्करांचे रेकॉर्ड तपासणार

वनपरिक्षेत्रनिहाय वन्यजीवांच्या शिकारप्रकरणी जुन्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवणे, तो हल्ली नेमका काय करतो, याचा शोध घेणे, त्या गुन्हेगाराला कोणी बाहेरील व्यक्ती भेटते अथवा संपर्क आहे का? याविषयी चाचपणी करणे, जंगलात ती व्यक्ती दिसल्यास पोलिसांना माहिती देणे, गुन्हेगारांविषयी बारीकसारीक माहिती गोळा करणे, गावस्तरावर पोलीस पाटलांची मदत घेणे, वन्यजीव शिकारीचे आर्टिकल्स तयार करून त्याचे गावस्तरावर मार्गदर्शन करणे आणि पूर्वाश्रमीच्या वनगुन्हेगारांची माहिती गोळा करण्यात येणार आहे.

 

‘ऑपरेशन बिरबल-२’ची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. वन्यजीवांच्या शिकारी यातून नक्कीच रोखता येईल. राज्यभर ही मोहीम राबवू. जंगल क्षेत्रानजीकच्या गावात बारकाईने लक्ष दिले जाईल.

- सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र

टॅग्स :wildlifeवन्यजीव