शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ५०९ सिंचन प्रकल्पांत ३५ टक्केच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:44 IST

पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०९ सिंचन प्रकल्पांत २१ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार ३४.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या  अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे महिनाभर करावी लागणार पाण्याची बचत

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०९ सिंचन प्रकल्पांत २१ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार ३४.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या  अधिकाऱ्यांनी दिली आहे.एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांत ४२.०२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे, तर २४ मध्यम प्रकल्पांत ४०.५८ टक्के पाणीसाठा सद्यस्थितीत शिल्लक आहे. ४७६ लघु प्रकल्पांमध्ये २२.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ५०९ प्रकल्पांची एकूण सरासरी टक्केवारी ३४.७४ टक्के आहे. ५०९ प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२२०.५५ दशलक्ष घनमीटर असून, आजचा उपयुक्त पाणीसाठा १११८.८९ दशलक्षघनमीटर एवढा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा चांगला असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह रबी सिंचनाकरिता पाण्याची मुबलक सोय झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी साठा जरी पाचही जिल्ह्यात मुबलक असला तरी उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्या झपाट्याने घट होत आहे. त्याअनुषंगाने पाणी जपून वापरणे गरजेचे असल्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.नऊ मोठ्या प्रकल्पांत ४२.०२ टक्के पाणीअमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५२.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस या मोठ्या प्रकल्पात ३२.२४ टक्के, अरुणावती १०.९२ टक्के, बेंबळा ५४.९०, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ४३.२९, वाण प्रकल्प ४६.४२, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा ५०.८५, पेनटाकळी ४४.८७, खडकपूर्णा १९.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात