शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

पश्चिम विदर्भातील ५०९ सिंचन प्रकल्पांत ३५ टक्केच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 19:44 IST

पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०९ सिंचन प्रकल्पांत २१ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार ३४.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या  अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ठळक मुद्दे महिनाभर करावी लागणार पाण्याची बचत

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पश्चिम विदर्भातील मोठे, मध्यम व लघु अशा एकूण ५०९ सिंचन प्रकल्पांत २१ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार ३४.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या  अधिकाऱ्यांनी दिली आहे.एकूण नऊ मोठ्या प्रकल्पांत ४२.०२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे, तर २४ मध्यम प्रकल्पांत ४०.५८ टक्के पाणीसाठा सद्यस्थितीत शिल्लक आहे. ४७६ लघु प्रकल्पांमध्ये २२.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ५०९ प्रकल्पांची एकूण सरासरी टक्केवारी ३४.७४ टक्के आहे. ५०९ प्रकल्पांची प्रकल्पीय संकल्पित उपयुक्त पाणीसाठा ३२२०.५५ दशलक्ष घनमीटर असून, आजचा उपयुक्त पाणीसाठा १११८.८९ दशलक्षघनमीटर एवढा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा चांगला असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह रबी सिंचनाकरिता पाण्याची मुबलक सोय झाली होती. पिण्याच्या पाण्यासाठी साठा जरी पाचही जिल्ह्यात मुबलक असला तरी उन्हाळ्यात तीव्र उन्हामुळे होणाऱ्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्या झपाट्याने घट होत आहे. त्याअनुषंगाने पाणी जपून वापरणे गरजेचे असल्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले.नऊ मोठ्या प्रकल्पांत ४२.०२ टक्के पाणीअमरावती शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५२.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस या मोठ्या प्रकल्पात ३२.२४ टक्के, अरुणावती १०.९२ टक्के, बेंबळा ५४.९०, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा ४३.२९, वाण प्रकल्प ४६.४२, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा ५०.८५, पेनटाकळी ४४.८७, खडकपूर्णा १९.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपात