शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
3
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
4
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
5
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
6
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
7
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
8
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
9
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
10
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
11
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
12
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
13
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?
14
Amazon.in च्या 'ग्रेट सेव्हिंग्ज सेलिब्रेशन' स्टोअरफ्रंटसह GST बचतीचा धमाका
15
तू परत आलास..?? IND vs PAK Final वरून पाकिस्तानची खिल्ली उडवणाऱ्या भन्नाट मीम्सचा पाऊस
16
Vodafone-Idea च्या शेअरमध्ये मोठी घसरण, AGR प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबरला
17
“STकडे १३ हजार एकर लँड बँक, NAREDCOने विकासात योगदान द्यावे”; प्रताप सरनाईक यांचे आवाहन
18
पोस्ट ऑफिसची गॅरंटी! फक्त ₹५० लाखांचा विमाच नाही, 'या' स्कीममध्ये मिळतात टॅक्स आणि कर्जाचे फायदे
19
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
20
'लडाख हिंसाचार' प्रकरणी आता मोदी सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर! दिल्लीहून एक दूत पाठवला; उपराज्यपालांनी बैठक बोलावली

कांद्याची साठेबाजी!

By admin | Updated: July 23, 2015 00:17 IST

बाजारपेठेत अचानक कांद्याची आवक कमी झाल्याने कांदा गेला कोठे? हा संशोधनाचा विषय ठरु लागला आहे.

प्रतिकिलो ४० रुपये : व्यापाऱ्यांना आले सुगीचे दिवसअमरावती : बाजारपेठेत अचानक कांद्याची आवक कमी झाल्याने कांदा गेला कोठे? हा संशोधनाचा विषय ठरु लागला आहे. काही दिवसांपूर्वी १५ ते १७ रुपये प्रतिकिलो रुपये दराने विकला जाणारा कांदा आता ४० रुपयांवर पोहचल्याने ग्राहक चक्रावून गेले आहेत. ही परिस्थिती कांद्याच्या साठेबाजीमुळे निर्माण झाली असून व्यापाऱ्यांनी आर्थिक लुबाडणूक चालविल्याचे चित्र आहे.एप्रिल, मे महिन्यात कांद्याचे उत्पादन आल्यानंतर शेतकऱ्यांना बाजारपेठेत प्रतिकिलो आठ ते १० रुपये या दराने भाव मिळाला. कांदा उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणलेला कांदा बघताच बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी कांद्याचे दर घसरवून शेतकऱ्यांकडून मातीमोल दरात तो खरेदी केला. ही प्रक्रिया महिनाभर सुरु राहिली तेंव्हा कांदा उत्पादकांना भाव मिळाले नाही. बाजारात कांद्याला भाव मिळत नाही तर दुसरीकडे शेतकऱ्यांना कांदा साठवण करण्यासाठी पर्याय नाही. त्यामुळे बहुतांश कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा विकला. महिन्या दिड महिन्यात शेतकऱ्यांकडील कांदा संपताच व्यापाऱ्यांनी ही बाब हेरुन कांद्याचे भाव वाढविण्यास प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात जूनमध्ये २५ रुपये किलो तर जुलै महिना उजाळताच कांदा ४० रुपये किलो दरावर पोहचला आहे. पावसाळा सुरु झाला असला तरी बाजारात कांद्याची आवक नगण्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन झाले असताना कांदा गेला कोठे? हे शोधून काढणे प्रशासनापुढे आव्हान ठरणारे आहे. सलग तीन वर्षांपासून कांद्याला भाव मिळत नसल्यामुळे यावर्षी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पेरा कमी केल्याची माहिती आहे. यंदा थोडेफार कांद्याचे उत्पादन कमी झाले असले तरी प्रारंभी कांद्याला भाव कमी का मिळाले, हे देखील महत्त्वाचे आहे. चांगल्या प्रतिचा कांदा साठवणूक तर निकृष्ट दर्जाचा कांदा बाजारपेठेत विकून सामान्य ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. विशेषत: बडनेरा व अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक केल्याची माहिती आहे.जिल्ह्यात उन्हाळी कांद्याचे उत्पादन घेण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यानुसार बाजारपेठेत शेतकऱ्यांनी कांदा विकला. प्रतिकिलो ८ ते १० रुपये दराने शेतकऱ्यांना भाव मिळाला. आता अचानक कांदा ४० रुपये प्रतिकिलो दरावर पोहचल्याने सामान्य नागरिकांचे ‘बुरे दिन’ सुरु झाले आहेत, असे म्हणण्याची वेळ कांद्याची साठेबाजी करणाऱ्यांनी आणली आहे, हे वास्तव आहे. (प्रतिनिधी)आता कर्नाटकच्या कांद्याची प्रतीक्षाजिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी साठवूण ठेवल्याने पुढील पाच महिन्यापर्यंत नवीन कांदा बाजारपेठेत येईपर्यंत चढ्या दरात खरेदी केल्याशिवाय गत्यतंर नाही, असे एका विक्रेत्याने सांगितले. साठेबाजी करणारे मासे गब्बर असून त्यांच्यापर्यंत प्रशासनाला पोहचणे शक्य नाही. त्यामुळे कांदा थोडेफार स्वस्त दरात खरेदी करायचा असेल तर ग्राहकांना कर्नाटक येथून येणाऱ्या कांदावर अवलंबून राहावे लागेल, हे वास्तव आहे.१०० रुपयांवर पोहोचेल कांदानाशिक, कर्नाटक येथे उत्पादित होणारा कांदा विदर्भात येण्यास दोन ते तीन महिन्याचा अवधी लागेल. त्यामळे हल्ली ४० रुपये प्रतिकिलो दराने विकला जाणारा कांदा पुढे १०० रुपये दराने विकला गेल्यास आश्चर्य वाटू नये. पुरवठा कमी, मागणी जास्त वाढल्याने येत्या काळात कांदा हा राजकीय पुढाऱ्यासह सामान्यांना रडवणार, असे संकेत आहेत.कांद्याची साठेबाजी करण्याऱ्यांचा शोध घेवून कठोर कारवाई केली जाईल. सामान्यांची फसवणूक होऊ देणार नाही. यासंदर्भात बाजार समिती सचिवांची बैठक घेवून उपाययोजना केल्या जातील. साठेबाजी रोखण्यासाठी पोलिसांचे धाडसत्र राबविले जाईल.किरण गित्ते, जिल्हाधिकारी, अमरावती.उत्पादन घटले- कावरेसलग तीन वर्षांपासून कांद्याला भाव नाही. त्यामुळे पेरा कमी झाला. उत्पादनात ७५ टक्के घट झाली आहे. शेतकरी साठवणूक करु शकत नाही. परिणामी मिळेल त्या दरात कांदा विकावा लागला, असे दर्यापूर तालुक्यातील टाकरखेडा (कावरे) येथील शेतकरी सतीश कावरे म्हणाले. साठेबाजांना शोधून काढा- माळोदेसुरुवातीला कांद्याला प्रतिक्विंटल १५०० ते १८०० रुपये भाव मिळाला. कांदा हे नासाडी पिक असल्याने शेतकरी साठवू शकत नाही. योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादनात घट झाली, हे वास्तव असल्याचे गुरुकुंज मोझरी येथील कांदा उत्पादक प्रवीण माळोदे यांनी सांगितले.