शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

कांद्याचे भाव वधारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

निम्न प्रतिचा कांदा हा १५०० ते ३००० हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. हाच कांदा बाजार समितीतून व्यावसायिकांनी खरेदी केल्यानंतर त्याची दामदुप्पट म्हणजे ६० ते ८० रूपये किलो दराने विक्री होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.

ठळक मुद्देबाजार समितीत ५५०० प्रतिक्विंटलचा भाव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: गेल्या आठवड्याभरापासून कांद्याने पाचहजारी गाठली असून क्विंटल मागे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिच्या कांद्याला ४५०० ते ५५०० हजारांचा भाव मिळाला आहे. तर निम्न प्रतिचा कांदा हा १५०० ते ३००० हजार रुपये क्विंटल दराने विकला जात आहे. हाच कांदा बाजार समितीतून व्यावसायिकांनी खरेदी केल्यानंतर त्याची दामदुप्पट म्हणजे ६० ते ८० रूपये किलो दराने विक्री होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसाने कांद्याचा पेरा खराब झाला आहे. अतिपावसाने कांदे सडत असल्याची परिस्थिती आहे. परतीच्या पावसाने सुद्धा कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची कैफियत शेतकऱ्यांची आहे. त्याचे परिणाम सर्वच बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीमंडीवर झाला असून, मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. लाल व पांढऱ्या कांद्याला शासकीय दर ४५०० ते ५५०० रूपये क्विंटल मिळत असल्याने त्याचा परिणाम किरकोळ बाजारावर झाला आहे. व्यावसायिक दामदुप्पट भावाने विक्री करून ग्राहकांची लूट करीत आहेत. त्यामुळे कांद्याने सामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. पांढरा व लाल कांद्याची अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीमंडीत किमान रोज ३० ते ४० टन कांद्याची आवक होत आहे. सोलापूर व कर्नाटक राज्यातून कांदा बाजार समितीत येत आहे. परतीचा पाऊस लांबला असला तरी जुना कांदा आता बाजारपेठेतून हद्दपार झाला आहे. नवीन कांद्याचे उत्पादन ऑक्टोंबर महिन्यात येते. मात्र आलेला नवा कांदा पावसाने सडत असल्याने मागणीच्या तुुलनेत आवक कमी झाली आहे. किमान १ जानेवारीपर्यंत कांदा महागच राहणार असल्याचा अंदाज कांदा ठोक व्यापारी सतीश कावरे यांनी वर्तविला आहे. कांद्याचे भाव २० नोव्हेंबरपर्यंत वाढणार असल्याचा अंदाज यापूर्वी त्यांनी वर्तविला होता तो खरा ठरला आहे. यानंतरही भाववाढ कायम राहणार आहे. किमान १ जानेवारी पर्यंत खासगी बाजारात कांदा ६० ते ८० रूपये राहणार असून, शेतकºयांच्या चांगल्या प्रतिच्या कांद्याला पाच हजार रुपये क्विंटलचा भाव कायम राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पावसाने कांदा सडत असल्याने आवक कमी होत आहे. त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल ५५०० रूपयांचा भाव मिळाला आहे. गृहिणींना १ जानेवारीपर्यंत कांदा महागच खरेदी करावा लागणार आहे.- सतीश कावरे,कांदा व्यापारी अमरावती

टॅग्स :onionकांदा