शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एक गाव अन् दोन सरपंच! जुन्या सरपंचांचा कार्यकाळ बाकी असल्याने  २६३ ग्रामपंचायतींमध्ये पेचप्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 19:08 IST

अमरावती जिल्ह्यातील २६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. प्रथमच जनतेतून थेट सरपंच निवडून आलेत.

अमरावती - जिल्ह्यातील २६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली. प्रथमच जनतेतून थेट सरपंच निवडून आलेत. मात्र जुन्या सरपंचांचा कार्यकाळ संपुष्टात आलेला नसल्याने सध्या या ग्रामपंचायतींमध्ये दोन सरपंच अस्तित्वात आहेत. जुन्या सरपंचांना धोरणात्मक अधिकार नाही, नव्यांना कार्यभार नाही, यामुळे पेचप्रसंग निर्माण झाला आहे.नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणाºया २६३  ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया आटोपली. यावेळी प्रथमच जनतेतून थेट सरपंचांची निवडणूक झाल्यामुळे निवडून आलेल्या सरपंचांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. त्याचवेळी जुन्या सरपंचांचा कालावधी संपुष्टात आलेला नसल्यामुळे तेदेखील प्रभारी सरपंच आहेत. साधारणपणे २६ डिसेंबरपर्यंत या ग्रामपंचायतींच्या नवीन कार्यकारिणीची पहिली बैठक होणार असल्याने तोपर्यंत जुनेच सरपंच कायम राहणार असले तरी ते नामधारी आहेत. यापूर्वी सरपंचांची निवड पहिल्या सर्वसाधारण सभेत व्हायची, आता मात्र ज्या दिवसी निकाल लागला त्याच दिवशी नवे सरपंच निवडून आले आहेत. मात्र त्यांना पूर्वीचे सरपंचांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावरच प्रभार मिळणार आहे. मात्र यापुढील सरपंचपदासाठी ही प्रक्रिया बदललेली राहील. नव्या सरपंचाच्या कार्यकाळानुसार ही निवडणूक होईल.यावेळी मतमोजणीनंतर सदस्यांसह सरपंचदेखील निवडून आले आहेत. विशेष म्हणजे त्यांना विजयी झाल्याचे प्रमाणपत्रदेखील आयोगाच्याकडून प्राप्त झाले आहेत. म्हणजेच त्यांना आयोगाने सरपंचपदाचा दर्जा बहाल केला आहे. त्यामुळे गावाचा खरा कारभारी कोण, असा संभ्रम निर्माण झाला आहे.  उपसरपंच निवडीच्या बैठकीत सरपंच सभेचे अध्यक्षग्रामपंचायतीच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सरपंच्यांना कार्यभार सोपविण्यात येणार आहे. याच दिवसी उपसरपंचाची निवडणूक होणार आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी जरी पदसिद्ध सरपंच असले तरी निवडणूक प्रक्रिया ही निवडणूक विभागाच्यांतर्गत महसूल विभागाचा अधिकाराच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या निवडणुकीत जर उपसरपंचपदाला समसमान मते मिळाली, तर निर्णायक मत देण्याचा अधिकार मात्र सरपंचालाच राहणार आहे.

टॅग्स :Politicsराजकारणgram panchayatग्राम पंचायतMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार