शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

एक पणती उजळू त्यांच्या दारी!

By admin | Updated: November 11, 2015 00:06 IST

‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतात. दिवाळी सण मोठ्या उत्साहाने बुधवारी साजरा केला जाणार आहे.

गजानन मोहोड अमरावती‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतात. दिवाळी सण मोठ्या उत्साहाने बुधवारी साजरा केला जाणार आहे. दुष्काळ, नापिकी असली तरी दिवाळीची लगबग प्रत्येक घरी सुरू आहे. परंतु असेही काही कुटुूब आहेत, जिथे निरव शांतता आहे. शोषित, वंचितांच्या घरात दिवाळीची पणती पेटण्याचीही स्थिती नाही. गावकुसाबाहेर पालात राहणाऱ्या शेकडो कुटुंबांमध्ये, झोपड्यांमध्ये एक पणतीदेखील पेटण्याची स्थिती नाही. जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने असणाऱ्या या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश पोहोचला नाही. लोक साजरी करतात ती दिवाळी पाहायची आणि समाधान मानायचे, अशी स्थिती आहे. या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश केव्हा पोहोचणार? हा प्रश्नच आहे. यासाठी समाजमन जागृत होण्याची गरज आहे. वंचित अन् उपेक्षांच्या गर्तेत हेलकावे घेणाऱ्या भटक्यांच्या हजारो पालांमध्ये, गावकुसाबाहेरील वस्त्यांमध्ये गोडधोड तर दूरच साधी पणतीही दोन दिवसांत पेटलेली नाही. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतर या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश पोहोचला नाही, हे वास्तव आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये अनेक मोठ्या गावांच्या आधाराने जीवन जगणाऱ्या आणि पोटासाठी रानोमाळ भटकणाऱ्या भटक्या कुटूंबात दिवाळीचा प्रकाश पोहोचण्याची सुतराम शक्यता नाही. भटक्यांसाठी दिवाळी येते आणि जाते ती कधीच साजरी केली जात नाही. त्यांना अंगभर कपडेही घालायला मिळत नाहीत. अभ्यंगस्रान, औक्षण, गोडधोड अन् रुचकर फराळ तर फार लांबची गोष्ट आहे. समाजातही विपरीत परिस्थिती आजही आहे, एकीकडे लख्ख प्रकाशाच्या दीपमाळा तर दुसरीकडे काळाकुट्ट अंधार अशा विरोधाभासात जिल्ह्यातील हजारो गावांत दिवाळी साजरी होत आहे. पुढाकार घेण्याची गरज : वंचिताच्या वाट्याला येईल का रोषणाई?- तर दिवाळी होईल हसरीवंचिताच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी सुखवस्तू समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने समाजऋणातून उतराई होण्यासाठी वंचितांच्या जीवनातील एक कोपरा प्रकाशमय करण्याचा संकल्प घेतला तर त्यांची दिवाळीदेखील हसरी होईल, प्रकाशमान होईल आणि हे दिल्याचे समाधान वेगळेच असते. समाजऋण फेडण्याची हिच खरी संधी दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मुलांसाठी नवीन कपडे खरेदी करताना एखादा ड्रेस या वंचितांसाठीही घेता येतो. फटाक्यांची खरेदी करताना चारदोन फटाके त्यांच्यासाठीही ठेवता येतात. घरातील गोडधोड त्यांच्यासाठी थोडे काढता येईल. आपल्या घरात दिव्यांची आरास करताना त्यांच्याही पालात चार पणत्या लावता येतील. सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणाऱ्या संस्था व संवेदनशील व्यक्तींना हे सहज शक्य होऊ शकते, असे झाल्यास हीच खरी समाजऋणाची उतराई ठरेल.