शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

एक पणती उजळू त्यांच्या दारी!

By admin | Updated: November 11, 2015 00:06 IST

‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतात. दिवाळी सण मोठ्या उत्साहाने बुधवारी साजरा केला जाणार आहे.

गजानन मोहोड अमरावती‘दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणतात. दिवाळी सण मोठ्या उत्साहाने बुधवारी साजरा केला जाणार आहे. दुष्काळ, नापिकी असली तरी दिवाळीची लगबग प्रत्येक घरी सुरू आहे. परंतु असेही काही कुटुूब आहेत, जिथे निरव शांतता आहे. शोषित, वंचितांच्या घरात दिवाळीची पणती पेटण्याचीही स्थिती नाही. गावकुसाबाहेर पालात राहणाऱ्या शेकडो कुटुंबांमध्ये, झोपड्यांमध्ये एक पणतीदेखील पेटण्याची स्थिती नाही. जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने असणाऱ्या या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश पोहोचला नाही. लोक साजरी करतात ती दिवाळी पाहायची आणि समाधान मानायचे, अशी स्थिती आहे. या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश केव्हा पोहोचणार? हा प्रश्नच आहे. यासाठी समाजमन जागृत होण्याची गरज आहे. वंचित अन् उपेक्षांच्या गर्तेत हेलकावे घेणाऱ्या भटक्यांच्या हजारो पालांमध्ये, गावकुसाबाहेरील वस्त्यांमध्ये गोडधोड तर दूरच साधी पणतीही दोन दिवसांत पेटलेली नाही. स्वातंत्र्याच्या ६८ वर्षानंतर या पालांमध्ये दिवाळीचा प्रकाश पोहोचला नाही, हे वास्तव आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये अनेक मोठ्या गावांच्या आधाराने जीवन जगणाऱ्या आणि पोटासाठी रानोमाळ भटकणाऱ्या भटक्या कुटूंबात दिवाळीचा प्रकाश पोहोचण्याची सुतराम शक्यता नाही. भटक्यांसाठी दिवाळी येते आणि जाते ती कधीच साजरी केली जात नाही. त्यांना अंगभर कपडेही घालायला मिळत नाहीत. अभ्यंगस्रान, औक्षण, गोडधोड अन् रुचकर फराळ तर फार लांबची गोष्ट आहे. समाजातही विपरीत परिस्थिती आजही आहे, एकीकडे लख्ख प्रकाशाच्या दीपमाळा तर दुसरीकडे काळाकुट्ट अंधार अशा विरोधाभासात जिल्ह्यातील हजारो गावांत दिवाळी साजरी होत आहे. पुढाकार घेण्याची गरज : वंचिताच्या वाट्याला येईल का रोषणाई?- तर दिवाळी होईल हसरीवंचिताच्या जीवनात दिवाळीचा आनंद फुलविण्यासाठी सुखवस्तू समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने समाजऋणातून उतराई होण्यासाठी वंचितांच्या जीवनातील एक कोपरा प्रकाशमय करण्याचा संकल्प घेतला तर त्यांची दिवाळीदेखील हसरी होईल, प्रकाशमान होईल आणि हे दिल्याचे समाधान वेगळेच असते. समाजऋण फेडण्याची हिच खरी संधी दिवाळीच्या निमित्ताने आपल्या मुलांसाठी नवीन कपडे खरेदी करताना एखादा ड्रेस या वंचितांसाठीही घेता येतो. फटाक्यांची खरेदी करताना चारदोन फटाके त्यांच्यासाठीही ठेवता येतात. घरातील गोडधोड त्यांच्यासाठी थोडे काढता येईल. आपल्या घरात दिव्यांची आरास करताना त्यांच्याही पालात चार पणत्या लावता येतील. सामाजिक बांधिलकीची भावना जोपासणाऱ्या संस्था व संवेदनशील व्यक्तींना हे सहज शक्य होऊ शकते, असे झाल्यास हीच खरी समाजऋणाची उतराई ठरेल.