शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

दीड हजार कर्मचारी ४५ महिन्यांपासून वेतनविना, सलग चौथी दिवाळी अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 15:37 IST

राज्यात २९ जिल्ह्यांमध्ये शाखा असणा-या भूविकास बँक कर्मचा-यांचे मागील ४५ महिन्यांचे वेतन प्रलंबित आहेत. शासनाची अनास्था असल्यामुळे सुमारे दीड हजार कर्मचा-यांची सलग चौथी दिवाळी अंधारात जाणार का, असा अस्वस्थ करणारा सवाल त्यांनी केला आहे.

गजानन मोहोडअमरावती : राज्यात २९ जिल्ह्यांमध्ये शाखा असणा-या भूविकास बँक कर्मचा-यांचे मागील ४५ महिन्यांचे वेतन प्रलंबित आहेत. शासनाची अनास्था असल्यामुळे सुमारे दीड हजार कर्मचा-यांची सलग चौथी दिवाळी अंधारात जाणार का, असा अस्वस्थ करणारा सवाल त्यांनी केला आहे.या सर्व जिल्हा शाखांची एक शिखर बँक अस्तित्वात आहे. तेथील सर्व कर्मचा-यांचे वेतन नियमित होत असताना मात्र आमच्यावरच अन्याय का, असा या कर्मचा-यांचा सवाल आहे. कर्मचा-यांचे प्रलंबित पगार व बँकेचे आर्थिक व्यवहारसंदर्भात एक शासन समिती गठित झाली होती. यामध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे, ना.सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री पाटील यांचा समावेश होता. या समितीने कर्मचा-यांचे वेतन देण्याविषयीचा कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. एकरकमी परतफेड योजना राबविली. त्याला कर्जदारांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे बँकेची वसुलीच झाली नाही. कर्मचा-यांसाठी मंत्र्यांची उपसमिती नेमणे एवढेच काम झाले. हेच सत्ताधारी पूर्वी विरोधक असताना कर्मचारी वेतनासाठी आग्रही होते. आता चूप का, असा सवाल कर्मचा-यांनी केला आहे.राज्यात या बँकेच्या ६० ठिकाणी मालमत्ता आहे. याची किंमत दोन हजार कोटींच्या घरात आहे. कर्मचा-यांचा प्रलंबित पगार ३०० कोटी आहे. ही मालमत्ता विकून कर्मचा-यांची देणी देण्याचा शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे. मात्र मागील चार वर्षांपासून काहीच झालेले नाही. नागपूर येथील कर्मचारी कुमूद कुळकर्णी यांच्यावर पैशांअभावी वैद्यकीय उपचार होऊ न शकल्याने त्यांचा मृत्यू झाला. अमरावती येथील कर्मचारी नंदकिशोर ठाकरे यांच्या पत्नीच्या आजारावरदेखील पैशाअभावी इलाज होऊ न शकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. कर्मचा-यांचे पाल्याचे शिक्षण, विवाह यासह उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.सवलत योजनेच्या व्याजाची रक्कम मिळावीजिल्हा बँकेने यापूर्वी २००६-०७ मध्ये सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये सवलतीची योजना राबविल्यामुळे १७ कोटी ४७ लाख रुपयांची व्याजाची रक्कम मिळाली. ही रक्कम बँकेला मिळण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. अमरावती जिल्ह्यासह इतरही शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी ही योजना होती. ही रक्कम शासनाकडून मिळाल्यास कर्मचाºयांची देणी फिटूू शकतात. तसेच इतर जिल्ह्यांतील कर्मचाºयांचा पगारदेखील होऊ शकतो, अशी माहिती कास्ट्राईब संघटनेचे विभागीय अध्यक्ष विनय ठाकरे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

टॅग्स :bankबँक