शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाख विद्यार्थी परीक्षेविना होणार उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी राज्य शासनाने सर्वात प्रथम शाळांकडे लक्ष वेधले. शाळेत विद्यार्थी एकत्र येऊ नये म्हणून राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या कामात असलेल्या शिक्षकांनी व्यतिरिक्त इतर शिक्षकांच्या रोटेशननुसार ड्युटी लावली.

ठळक मुद्देकोरोनाचे संक्रमण । प्रतिबंधासाठी शासनाने घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या संक्रमणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने ३१ मार्चपर्यंत शाळा बंद, शिक्षकांचीही ५० टक्के रोटेशननुसार डयुटी लावली. आता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १५४९ शाळांमधील इयत्ता १ ते ८ तील १ लाख १५ जार ७२९ विद्यार्थी, तर आदिवासी विकास विभागाच्या शाळांतील ११,७०१ व महापालिकेच्या ६६ शाळांतील ९ हजार असे एकूण १ लाख ३६ हजार ४३० विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची शाळा २६ जूनला सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी राज्य शासनाने सर्वात प्रथम शाळांकडे लक्ष वेधले. शाळेत विद्यार्थी एकत्र येऊ नये म्हणून राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या कामात असलेल्या शिक्षकांनी व्यतिरिक्त इतर शिक्षकांच्या रोटेशननुसार ड्युटी लावली. कोरोनाच्या संक्रमणावर अंकुश लावण्यासाठी शासनाने ३१ मार्चची 'डेडलाईन' दिली आहे. त्यानंतर शाळा सुरू होईल की नाही, हे कोरोनावर कितपत नियंत्रण आणेल, त्यावर निर्भर आहे. पण तरीही शालेय विद्यार्थ्यांना त्यांची लागण होऊ नये म्हणून शासनाने ३१ मार्चनंतर विद्यार्थी शाळेत येऊ नये यासाठी १ ते ८ वर्गाच्या परीक्षा रद्द करून सरळ उत्तीर्ण केलेले आहे. मात्र इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा होणार आहेत. पणत्याही ३१ मार्चनंतरच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा घेतलेला निर्णय हा सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहे. पालकांनी सुट्ट्या लागल्यामुळे कुठलेही प्लॅनिंग न करता विद्यार्थी कसा सुरक्षित राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सतर्कता बाळगणे स्वच्छता राखणे, हा एकमेव उपाय असल्यामुळे पालकांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला दिला जात आहे.मूल्यमापन पद्धतीने निकालसाकारीत आणि आकारीत या आधारे मूल्यमापन करून पहिली ते आठवीचा निकाल लावला जाईल. परंतु, ३१ मार्चनंतर या विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागेल की नाही याबाबत अद्याप निश्चित सांगता येणार नाही, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस