शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
4
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
5
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
6
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
7
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
8
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
9
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
10
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
11
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
12
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
13
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
14
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
15
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
16
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
17
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
18
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
19
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
20
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व

दीड लाख विद्यार्थी परीक्षेविना होणार उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी राज्य शासनाने सर्वात प्रथम शाळांकडे लक्ष वेधले. शाळेत विद्यार्थी एकत्र येऊ नये म्हणून राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या कामात असलेल्या शिक्षकांनी व्यतिरिक्त इतर शिक्षकांच्या रोटेशननुसार ड्युटी लावली.

ठळक मुद्देकोरोनाचे संक्रमण । प्रतिबंधासाठी शासनाने घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या संक्रमणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने ३१ मार्चपर्यंत शाळा बंद, शिक्षकांचीही ५० टक्के रोटेशननुसार डयुटी लावली. आता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १५४९ शाळांमधील इयत्ता १ ते ८ तील १ लाख १५ जार ७२९ विद्यार्थी, तर आदिवासी विकास विभागाच्या शाळांतील ११,७०१ व महापालिकेच्या ६६ शाळांतील ९ हजार असे एकूण १ लाख ३६ हजार ४३० विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची शाळा २६ जूनला सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी राज्य शासनाने सर्वात प्रथम शाळांकडे लक्ष वेधले. शाळेत विद्यार्थी एकत्र येऊ नये म्हणून राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या कामात असलेल्या शिक्षकांनी व्यतिरिक्त इतर शिक्षकांच्या रोटेशननुसार ड्युटी लावली. कोरोनाच्या संक्रमणावर अंकुश लावण्यासाठी शासनाने ३१ मार्चची 'डेडलाईन' दिली आहे. त्यानंतर शाळा सुरू होईल की नाही, हे कोरोनावर कितपत नियंत्रण आणेल, त्यावर निर्भर आहे. पण तरीही शालेय विद्यार्थ्यांना त्यांची लागण होऊ नये म्हणून शासनाने ३१ मार्चनंतर विद्यार्थी शाळेत येऊ नये यासाठी १ ते ८ वर्गाच्या परीक्षा रद्द करून सरळ उत्तीर्ण केलेले आहे. मात्र इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा होणार आहेत. पणत्याही ३१ मार्चनंतरच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा घेतलेला निर्णय हा सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहे. पालकांनी सुट्ट्या लागल्यामुळे कुठलेही प्लॅनिंग न करता विद्यार्थी कसा सुरक्षित राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सतर्कता बाळगणे स्वच्छता राखणे, हा एकमेव उपाय असल्यामुळे पालकांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला दिला जात आहे.मूल्यमापन पद्धतीने निकालसाकारीत आणि आकारीत या आधारे मूल्यमापन करून पहिली ते आठवीचा निकाल लावला जाईल. परंतु, ३१ मार्चनंतर या विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागेल की नाही याबाबत अद्याप निश्चित सांगता येणार नाही, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस