शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
3
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
4
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
5
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
6
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
7
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
8
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
9
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
10
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
11
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
12
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
13
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
14
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
15
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
16
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
17
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
18
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
19
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
20
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त

दीड लाख विद्यार्थी परीक्षेविना होणार उत्तीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 06:00 IST

कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी राज्य शासनाने सर्वात प्रथम शाळांकडे लक्ष वेधले. शाळेत विद्यार्थी एकत्र येऊ नये म्हणून राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या कामात असलेल्या शिक्षकांनी व्यतिरिक्त इतर शिक्षकांच्या रोटेशननुसार ड्युटी लावली.

ठळक मुद्देकोरोनाचे संक्रमण । प्रतिबंधासाठी शासनाने घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनाच्या संक्रमणासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने ३१ मार्चपर्यंत शाळा बंद, शिक्षकांचीही ५० टक्के रोटेशननुसार डयुटी लावली. आता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १५४९ शाळांमधील इयत्ता १ ते ८ तील १ लाख १५ जार ७२९ विद्यार्थी, तर आदिवासी विकास विभागाच्या शाळांतील ११,७०१ व महापालिकेच्या ६६ शाळांतील ९ हजार असे एकूण १ लाख ३६ हजार ४३० विद्यार्थी उत्तीर्ण होणार आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांची शाळा २६ जूनला सुरू होण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संक्रमण थांबविण्यासाठी राज्य शासनाने सर्वात प्रथम शाळांकडे लक्ष वेधले. शाळेत विद्यार्थी एकत्र येऊ नये म्हणून राज्यातील सर्व शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या घोषित केल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षेच्या कामात असलेल्या शिक्षकांनी व्यतिरिक्त इतर शिक्षकांच्या रोटेशननुसार ड्युटी लावली. कोरोनाच्या संक्रमणावर अंकुश लावण्यासाठी शासनाने ३१ मार्चची 'डेडलाईन' दिली आहे. त्यानंतर शाळा सुरू होईल की नाही, हे कोरोनावर कितपत नियंत्रण आणेल, त्यावर निर्भर आहे. पण तरीही शालेय विद्यार्थ्यांना त्यांची लागण होऊ नये म्हणून शासनाने ३१ मार्चनंतर विद्यार्थी शाळेत येऊ नये यासाठी १ ते ८ वर्गाच्या परीक्षा रद्द करून सरळ उत्तीर्ण केलेले आहे. मात्र इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा होणार आहेत. पणत्याही ३१ मार्चनंतरच्या परिस्थितीवर अवलंबून आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता उत्तीर्ण करण्याचा घेतलेला निर्णय हा सध्याच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहे. पालकांनी सुट्ट्या लागल्यामुळे कुठलेही प्लॅनिंग न करता विद्यार्थी कसा सुरक्षित राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सतर्कता बाळगणे स्वच्छता राखणे, हा एकमेव उपाय असल्यामुळे पालकांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचा सल्ला दिला जात आहे.मूल्यमापन पद्धतीने निकालसाकारीत आणि आकारीत या आधारे मूल्यमापन करून पहिली ते आठवीचा निकाल लावला जाईल. परंतु, ३१ मार्चनंतर या विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागेल की नाही याबाबत अद्याप निश्चित सांगता येणार नाही, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस