शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डाळ, तांदूळ दिले हो... पण शिजवणार कोण? अखेर रुग्ण उपाशीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 13:13 IST

गेल्या सहा-सात दिवसांपासून येथील नागरिक अतिसारासारख्या आजाराशी झुंज देताहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत असली तरी काही विभाग या प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देव्यथा मेळघाटची : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : सात दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे झालेल्या कॉलराच्या आजाराने तालुक्यातील पाचडोंगरी कोयलारी येथील चौघांचा मृत्यू झाला. तसेच ४०० च्या वर रुग्ण दाखल असताना मंगळवारी जिल्हा परिषद शाळेतील रुग्णांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपाशीपोटी राहायची वेळ आली.

विशेष म्हणजे, सोमवारी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. अंगणवाडी सेविकेने दाळ, तांदूळ डॉक्टरांजवळ दिले खरे, पण शिजवणार कोण, यावरच घोडे अडले अन् प्रशासनाचा गचाळ कारभार चव्हाट्यावर आला. नशीब, मोबाइल टॉयलेट आले आणि विद्युत बिल न भरता पाणीपुरवठा सुरू झाला.

दैनंदिन शेतीची व रोजंदारीची कामे ठप्प पडली आहेत. गावात आरोग्य, पोलीस, महसूल पाणीपुरवठा, विद्युत, जिल्हा परिषद, सर्व प्रशासन ठाण मांडून आहे. कोयलारी येथील पाणीपुरवठा योजना सात महिन्यांपूर्वी सुरू केली, विहिरीचे खोलीकरण असल्याने टँकरने पाणीपुरवठा झाला त्या मीटरवरून शेतकऱ्यांनी ओलितासाठी पाणी वापरले आणि ५०३४० रुपयांचे बिल आले. त्यासाठी विद्युत वितरण कंपनीने कुठलीच नोटीस न देता पुरवठा खंडित केला. चार जणांचा जीव गेल्यानंतर आता तो पूर्ववत केल्याने प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. आधीच तोडगा काढला असता तर जीव गेले नसते आणि शेकडो लोक आजारीही पडले नसते.

सोमवारी जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी दौरा केला. शाळेतच रुग्णांच्या जेवणाची सोय करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अंगणवाडी केंद्रातून डाळ व तांदूळ देण्यात आले. मात्र, ते शिजवणार कोण, हा प्रश्न होता. अखेर संतापलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी स्वत: जेवण दिले. मागील सहा-सात दिवसांपासून येथील नागरिक अतिसारासारख्या आजाराशी झुंज देताहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत असली तरी काही विभाग या प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल टॉयलेट, जनरेटर, पाणीपुरवठा सारे ओक्के!

मंगळवारी मोबाइल टॉयलेट आले, जनरेटरची धूळ साफ झाली. कोयलारी व पाच डोंगरी येथील टाकी भरण्यात आली. नळातून शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू झाला.

मंगळवारी जिल्हा परिषद शाळेत १२ रुग्ण होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्थित संदर्भात काल निर्देश दिले होते. परंतु सायंकाळपर्यंत जेवणाचे डबे आले नाहीत. त्यामुळे रुग्ण उपाशीपोटी आहेत.

डॉ. प्रवीण पारिसे, नोडल ऑफिसर पाचडोंगरी

टॅग्स :MelghatमेळघाटHealthआरोग्यGovernmentसरकारfoodअन्न