शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

डाळ, तांदूळ दिले हो... पण शिजवणार कोण? अखेर रुग्ण उपाशीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 13:13 IST

गेल्या सहा-सात दिवसांपासून येथील नागरिक अतिसारासारख्या आजाराशी झुंज देताहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत असली तरी काही विभाग या प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देव्यथा मेळघाटची : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : सात दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे झालेल्या कॉलराच्या आजाराने तालुक्यातील पाचडोंगरी कोयलारी येथील चौघांचा मृत्यू झाला. तसेच ४०० च्या वर रुग्ण दाखल असताना मंगळवारी जिल्हा परिषद शाळेतील रुग्णांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपाशीपोटी राहायची वेळ आली.

विशेष म्हणजे, सोमवारी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. अंगणवाडी सेविकेने दाळ, तांदूळ डॉक्टरांजवळ दिले खरे, पण शिजवणार कोण, यावरच घोडे अडले अन् प्रशासनाचा गचाळ कारभार चव्हाट्यावर आला. नशीब, मोबाइल टॉयलेट आले आणि विद्युत बिल न भरता पाणीपुरवठा सुरू झाला.

दैनंदिन शेतीची व रोजंदारीची कामे ठप्प पडली आहेत. गावात आरोग्य, पोलीस, महसूल पाणीपुरवठा, विद्युत, जिल्हा परिषद, सर्व प्रशासन ठाण मांडून आहे. कोयलारी येथील पाणीपुरवठा योजना सात महिन्यांपूर्वी सुरू केली, विहिरीचे खोलीकरण असल्याने टँकरने पाणीपुरवठा झाला त्या मीटरवरून शेतकऱ्यांनी ओलितासाठी पाणी वापरले आणि ५०३४० रुपयांचे बिल आले. त्यासाठी विद्युत वितरण कंपनीने कुठलीच नोटीस न देता पुरवठा खंडित केला. चार जणांचा जीव गेल्यानंतर आता तो पूर्ववत केल्याने प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. आधीच तोडगा काढला असता तर जीव गेले नसते आणि शेकडो लोक आजारीही पडले नसते.

सोमवारी जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी दौरा केला. शाळेतच रुग्णांच्या जेवणाची सोय करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अंगणवाडी केंद्रातून डाळ व तांदूळ देण्यात आले. मात्र, ते शिजवणार कोण, हा प्रश्न होता. अखेर संतापलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी स्वत: जेवण दिले. मागील सहा-सात दिवसांपासून येथील नागरिक अतिसारासारख्या आजाराशी झुंज देताहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत असली तरी काही विभाग या प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल टॉयलेट, जनरेटर, पाणीपुरवठा सारे ओक्के!

मंगळवारी मोबाइल टॉयलेट आले, जनरेटरची धूळ साफ झाली. कोयलारी व पाच डोंगरी येथील टाकी भरण्यात आली. नळातून शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू झाला.

मंगळवारी जिल्हा परिषद शाळेत १२ रुग्ण होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्थित संदर्भात काल निर्देश दिले होते. परंतु सायंकाळपर्यंत जेवणाचे डबे आले नाहीत. त्यामुळे रुग्ण उपाशीपोटी आहेत.

डॉ. प्रवीण पारिसे, नोडल ऑफिसर पाचडोंगरी

टॅग्स :MelghatमेळघाटHealthआरोग्यGovernmentसरकारfoodअन्न