शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

डाळ, तांदूळ दिले हो... पण शिजवणार कोण? अखेर रुग्ण उपाशीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 13:13 IST

गेल्या सहा-सात दिवसांपासून येथील नागरिक अतिसारासारख्या आजाराशी झुंज देताहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत असली तरी काही विभाग या प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देव्यथा मेळघाटची : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली

नरेंद्र जावरे

चिखलदरा (अमरावती) : सात दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे झालेल्या कॉलराच्या आजाराने तालुक्यातील पाचडोंगरी कोयलारी येथील चौघांचा मृत्यू झाला. तसेच ४०० च्या वर रुग्ण दाखल असताना मंगळवारी जिल्हा परिषद शाळेतील रुग्णांवर सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपाशीपोटी राहायची वेळ आली.

विशेष म्हणजे, सोमवारी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. अंगणवाडी सेविकेने दाळ, तांदूळ डॉक्टरांजवळ दिले खरे, पण शिजवणार कोण, यावरच घोडे अडले अन् प्रशासनाचा गचाळ कारभार चव्हाट्यावर आला. नशीब, मोबाइल टॉयलेट आले आणि विद्युत बिल न भरता पाणीपुरवठा सुरू झाला.

दैनंदिन शेतीची व रोजंदारीची कामे ठप्प पडली आहेत. गावात आरोग्य, पोलीस, महसूल पाणीपुरवठा, विद्युत, जिल्हा परिषद, सर्व प्रशासन ठाण मांडून आहे. कोयलारी येथील पाणीपुरवठा योजना सात महिन्यांपूर्वी सुरू केली, विहिरीचे खोलीकरण असल्याने टँकरने पाणीपुरवठा झाला त्या मीटरवरून शेतकऱ्यांनी ओलितासाठी पाणी वापरले आणि ५०३४० रुपयांचे बिल आले. त्यासाठी विद्युत वितरण कंपनीने कुठलीच नोटीस न देता पुरवठा खंडित केला. चार जणांचा जीव गेल्यानंतर आता तो पूर्ववत केल्याने प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. आधीच तोडगा काढला असता तर जीव गेले नसते आणि शेकडो लोक आजारीही पडले नसते.

सोमवारी जिल्हाधिकारी पवनित कौर यांनी दौरा केला. शाळेतच रुग्णांच्या जेवणाची सोय करा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. अंगणवाडी केंद्रातून डाळ व तांदूळ देण्यात आले. मात्र, ते शिजवणार कोण, हा प्रश्न होता. अखेर संतापलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांनी स्वत: जेवण दिले. मागील सहा-सात दिवसांपासून येथील नागरिक अतिसारासारख्या आजाराशी झुंज देताहेत. आरोग्य यंत्रणा अहोरात्र राबत असली तरी काही विभाग या प्रकाराला गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे.

मोबाइल टॉयलेट, जनरेटर, पाणीपुरवठा सारे ओक्के!

मंगळवारी मोबाइल टॉयलेट आले, जनरेटरची धूळ साफ झाली. कोयलारी व पाच डोंगरी येथील टाकी भरण्यात आली. नळातून शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरू झाला.

मंगळवारी जिल्हा परिषद शाळेत १२ रुग्ण होते. त्यांच्या जेवणाची व्यवस्थित संदर्भात काल निर्देश दिले होते. परंतु सायंकाळपर्यंत जेवणाचे डबे आले नाहीत. त्यामुळे रुग्ण उपाशीपोटी आहेत.

डॉ. प्रवीण पारिसे, नोडल ऑफिसर पाचडोंगरी

टॅग्स :MelghatमेळघाटHealthआरोग्यGovernmentसरकारfoodअन्न