शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

आता आदिवासींना पाच वर्षासाठी ‘कोर्ट फी’ माफ, शासनाच्या महसूल व वनविभागाकडून ७ जून रोजी अधिसूचना जारी

By गणेश वासनिक | Updated: June 17, 2024 20:02 IST

पीडित, शोषित आदिवासींना मिळणार न्याय

अमरावती: अनुसूचित जमातीतील व्यक्तींना प्रदेय असलेली महाराष्ट्र न्यायालय फी अधिनियम (१९५९ चा ३६) याच्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचिमध्ये नमूद केलेली संपूर्ण किंवा कोणतीही फी पाच वर्षाच्या कालावधीकरिता माफ करण्यात आलेली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाने ७ जून २०२४ रोजी अधिसूचना जारी केलेली आहे. या योजनेला राज्य शासनाने ‘आदिवासी जननायक बिरसा मुंडा अनुसूचित जमाती न्यायालय फी माफी योजना २०२४ ’ असे नाव दिले आहे.

महाराष्ट्र न्यायालय फी अधिनियम ( १९५९ चा ३६) याच्या कलम ४६ द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि याबाबतीत समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून राज्य सरकारने योजना सुरू केली आहे. कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयात किंवा अर्ध-न्यायिक प्राधिकरणात दाखल करावयाच्या, निष्पादित करावयाच्या किंवा नोंदवावयाच्या, उक्त अधिनियमास जोडलेल्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचिमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही प्रकारच्या दस्तऐवजांच्या बाबतीत प्रदेय असलेली संपूर्ण फी महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या ७ जून २०२४ या दिनांकापासून पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी माफ करण्यात आलेली आहे. याचा फायदा राज्यातील आदिवासी समाज बांधवांना मिळणार आहे......................गरीब, सामान्य आदिवासींना मोठा दिलासाराज्यशासनाने ‘आदिवासी जननायक बिरसा मुंडा अनुसूचित जमाती न्यायालय फी माफी योजना २०२४ ’ लागू केल्यामुळे आदिवासींना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी शेती, घरे, जात वैधता प्रकरण, संपत्तीचे काही विवादित प्रकरणे गरीब, सामान्य आदिवासी कुटुंब पैशाविना न्यायालयाच्या पायऱ्या चढू शकत नव्हते. मात्र आता राज्य शासनाने न्यायालय फी माफी योजना सुरू केल्यामुळे चांद्यापासून तर बांध्यापर्यंत असलेल्या आदिवासी बांधवांना पैसे नाही म्हणून न्यायालयात दाद मागू शकत नाही, ही बाब संपुष्टात आली आहे. राज्य शासन न्यायालयीन फी देणार असल्याने पीडित, शोषित आदिवासींना न्याय मिळेल, अशी माहिती ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रमोद घोडाम यांनी ‘लोकमत’शी बाेलताना दिली.

 

 

टॅग्स :AmravatiअमरावतीCourtन्यायालय